Thursday, February 28, 2013

मनुष्यवस्तीलायक नवीन ग्रह - काय वाटेल ते!


समजा मानवजातीला वास्तव्य करण्यायोग्य नवीन ग्रह सापडला तर? ह्यात काही गोष्टींचा विचार करावा लागेल.
१> पृथ्वीपासून त्या ग्रहाचे प्रकाशवर्षे अंतर. समजा तो ग्रह २० - ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे (ही शक्यता कमी कारण असे असते तर हा ग्रह आतापर्यंत सापडला असता). तरी सुद्धा २०-३० प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहावर पाठवायला लोकांची निवड प्रक्रिया घेण्यात आली असती. कारण यानांची संख्या मर्यादित असेल. आता प्रश्न असा येईल की केवळ आपण बुद्धिमान लोकांचीच निवड करू का? आता ह्या निवडप्रक्रियेचे निकष ठरविणे हा फार संवेदनशील मुद्दा बनू शकतो. राष्ट्र, खंड, धर्म, विविध क्षेत्र ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील माणसे निवडावी लागतील. आणि जरी यानाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी २०-३० वर्षाच्या प्रवासाचा ह्या लोकांवर काय परिणाम होईल? बहुदा आपल्यास १० - २० वर्षे वयोगटातील मुलेच पाठवावी लागतील. त्यांना त्यांच्या प्रवासात शिक्षणाची सोय करून द्यावी लागेल. माझ्या मते १ -२ वर्षांच्या फरकाने अशी अनेक याने पाठवावी लागतील आणि मध्ये अंतराळ स्थानके उभारावी लागतील. जिथे हे प्रवासी लोक विश्रांती घेतील.
२> हा नवीन ग्रह किती मोठा असेल? बहुदा पृथ्वीच्या १० -२० पट मोठा असलेला बरा! मग तिथल्या मालमत्तेचे वाटप कसे होईल? नक्कीच जे पहिले प्रवासी जातील त्यांना आपल्या मालकीहक्काच्या जागेवर खांब ठोकण्यास परवानगी असावी. जर अशी निवडप्रक्रियेसाठी जाहिरात आली तर त्यात सहभागी व्हायची माझी मनोमन इच्छा असेल. परंतु माझा मुलगा तिथे आला नाही तर? मग तिथल्या मालमत्तेचा वारसाहक्क कोणाला?
३> त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या कितीपट असेल हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथले हवामान कसे असावे? आपल्याकडे पर्याय असेल तर कॅलिफोर्नियाच्या हवामानासारखे असावे. तिथे सर्व क्षेत्रातील माणसे न्यावी लागतील, रस्ते बांधावे लागतील, शेती करावी लागेल, इस्पितळे लागतील आणि शाळासुद्धा उभाराव्या लागतील. परंतु ह्या सर्व क्षेत्रातील ज्ञान जसेच्या तसे अमलात आणता येणार नाही, तिथले भौतिक / रसायन / स्थापत्य / जीव / वैद्यकीय क्षेत्रातील नियम आपल्यापेक्षा वेगळे असतील. मग पृथ्वी आणि त्या नवी ग्रहावरील ह्या क्षेत्रातील नियमांची तुलना करणारे नवीन तज्ञ उदयास येतील. तिथे नवीन प्रकारचे संगीत उदयास येईल. त्या ग्रहावरील आणि पृथ्वीवरील संवादासाठी अधिक विकसित इंटरनेट बनवावे लागेल. तिथला पुरुष आणि पृथ्वीवरील स्त्री प्रेमात पडल्यास धमाल येईल! प्रेमभंग झाल्यास गाण्यासाठी 'तेरी दुनिया से हो के मजबूर में चला, में बहुत दूर चला' हे गाणे खूप मागणीत येईल!
४> काही काळाने पृथ्वी आणि त्या ग्रहात क्रीडा सामने सुरु होतील. परंतु गुरुत्वाकर्षण वेगवेगळे असल्याने पाहुणा संघास अडचणी येतील. ह्या ग्रहाचे नाव काय ठेवावे ह्यावर बरीच चर्चा होईल!
५> थोडे दिवसांनी तिथे स्थानिक आणि परग्रहीय असा संघर्ष सुरु होईल. काय सांगावे युद्ध सुद्धा होईल.
असो थांबतो इथे! परंतु ही एकदमच वेडगळ कल्पना म्हणून सोडून देवू नका. येत्या १००-२०० किंवा ५००-१००० वर्षात हे असे काही होणार आहे. आणि त्या साठी तयारी करणे हे अखिल मानवजातीचे कर्तव्य आहे.  

Wednesday, February 27, 2013

समुद्रकिनारा


निसर्गातील काही ठिकाणे माणसाला कधी नतमस्तक बनवितात तर कधी भावूक. नित्य जीवनात कधी आपणास गर्व झाला असेल अथवा कधी आपण अगदी निराश / दुःखी झालो असू तर ही ठिकाणे आपणास आपल्या ह्या भावनांचा योग्य असल्यास क्षुल्लकपणा दाखवितात तर कधी ह्या भावनांच्या खरोखरीच्या गहनतेतून बाहेर निघण्यास मदत करतात. उंच पर्वतावरून घेतलेले पृथ्वीचे मनोहर दर्शन, दाट जंगलात केलेली पायवाट, एखाद्या गावाच्या छोट्या घरातून चांदण्या रात्री केलेले चंद्राशी, चांदण्यांशी मनोगत अशी ही अनेक ठिकाणे आहेत. आजचा हा विषय आहे सागरकिनारा!
समुद्र आणि मनुष्याचा संबंध लहानपणी येतो. आता हे विधान समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना बहुतांशी लागू होते. वाळूचे किल्ले बनविणे, भरतीच्या वेळी आपल्या मागे पुढे करणाऱ्या लाटांशी खेळणे ह्यात मनमुराद आनंद लुटणे ह्या वाक्याचा प्रत्यय येतो. माझ्या एका मित्राच्या भाषेत बोलायचे तर य मजा येते. घराभोवती खेळतांना सुद्धा तसे थोडेफार निर्बंध असतात ह्यातील बरेचसे सागरकिनारी लागू होत नाहीत. ह्यातील मुख्य म्हणजे पडण्याची भिती. वाळूत पडणे हा देखील एक सुखद अनुभव असतो. ओल्या वाळूचा पायाला होणारा सुखद स्पर्श सुखाची एक लहर मनाच्या त्या बिंदूपर्यंत घेऊन जातो.
बालपण हळूहळू संपते. परीक्षारूपी सैतान आपले जीवन व्यापून टाकतो. परीक्षेच्या आदल्या संध्याकाळी शांत समुद्रकिनारी बसून आपल्या मनाच्या अभ्यासू कोपऱ्याशी संवाद साधल्यास फार बरे वाटते. ही अशी मोठी परीक्षा आटोपल्यावर हा समुद्रकिनारा पुन्हा आपणास वेगळा भासतो. आपल्याला धीर दिल्याबद्दल त्याचे आभार मानायची अनावर इच्छा मनात होते.
प्रेमात पडलेल्यांचा तर हा समुद्रकिनारा एक मोठा आधार असतो. डूबत्या सूर्याच्या लालसर सोनेरी किरणांच्या साक्षीने हातात हात घेवून ज्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्यांच्यासारखे सुदैवी तेच. कवीजनांना तर हा समुद्रकिनारा आणि डुबता सूर्य कायमच प्रेरणा देतो.
कोणाच्या आयुष्यात दुर्दैवी प्रसंग येऊन जवळची व्यक्ती सोडून गेली असल्यास हा किनारा त्या व्यक्तीच्या आठवणीचा चलतचित्रपट डोळ्यासमोर उभा करतो. त्या व्यक्तीच्या प्रतिमा त्या भावुक वातावरणात डोळ्यासमोर उभ्या राहतात.
तरुणपणात आपल्या भवितव्याच्या सर्व चिंता आपण ह्या सागराशी शेअर करतो. आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी ह्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळतात.
परदेशीचा समुद्रकिनारा सुरुवातीला थोडा अनोळखी भासतो. परंतु एकदा का त्याची आणि आपली नाळ जुळली की सर्व बंध तुटून पडतात. आपल्या तोकड्या भौगोलिक ज्ञानाच्या जोरावर हे पाणी कुठेतरी लांबवर जावून वसईच्या किनाऱ्याशी पोहचत असेल असा विचार आल्याशिवाय राहत नाही. आणि मग आठवतात ते सावरकर आणि त्यांची ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता!
ह्या समुद्रकिनाऱ्याची एकच दुःखद आठवण! ९२ साली महाविद्यालयीन सहल केळवे येथे गेली होती. दुपारपर्यंत सुंदर फलंदाजी करणारा ललित भोजनानंतर माझ्या मनगटावर आपले घड्याळ बांधून पोहायला गेला तो कायमचाच! हा ललित आणि रात्रभर समुद्रकिनारी बसून त्याची वाट पाहणारा नारायण, कायमचेच स्मरणात राहतील!
असा हा आपला सखा  सागरकिनारा!

 

Monday, February 25, 2013

सुमेर ग्रह - अंतिम भाग?


सुमेर ग्रह - अंतिम भाग?
निरंजन-१ विरुद्ध मानवजात,कच, मिहिर, बोस आणि नासाचे शास्त्रज्ञ असा लढा जोमाने चालू होता. हा लढा जसा सुमेर ग्रहावरील दोन वसाहतींच्या नियंत्रणासाठी होता तसाच मानवजातीच्यासुद्धा! ह्या लढ्यातील मानवजातीच्या बाजूचे अग्रगण्य खेळाडू होते मिहिर आणि बोस! संगणकाव्यतिरिक्त एकही क्षण घालविण्याची सवय नसलेल्या मानवजातीला हे मधले निरंजन-१ च्या वर्चस्वाचे क्षण फार कठीण जात होते. खरे तर त्यांचेही प्याद्यात रुपांतर व्हायचेच परंतु मिहिर आणि बोस ह्यांच्या अथक प्रयत्नाने आतापर्यंत हा लढा थोपविला गेला होता. निरंजन-० सुद्धा निरंजन-१ वर मात देण्याचा प्रयत्न करीत होता.
निरंजन-१ पृथ्वीवरील सर्व माहितीजालांचे निरीक्षण करीत होता. अचानक त्याचे लक्ष http://nes1988.blogspot.in/2013/02/blog-post_25.html ह्या संकेतस्थळाकडे गेले.
.
.
.
.
.
.
.
अरेरे हे काय होत आहे! कोणीतरी माझा (आदित्यचा) ताबा घेऊ पाहत आहे.........

Friday, February 22, 2013

सुमेर ग्रह भाग ९


निरंजन आता एकदम थबकून गेला होता. आपल्या मेंदूतील विचारप्रक्रियेवर कोणीतरी नियंत्रण करू पाहत आहे हे त्याला पूर्णपणे जाणवत होते. त्या शक्तीशी करण्याचा त्याचे अंतर्मन आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु सध्यातरी त्याचा मेंदू त्या शक्तीने ताब्यात घेतला होता. आता निरंजन-१ कार्यान्वित झाला होता.
निरंजन-१ ने पृथ्वीवरील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला. सर्वप्रथम फटका बसला तो दूरसंवेदन उपग्रह सेवेला. ती ठप्प करण्यात आली. त्यानंतर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. मिहिर, बोस आणि नासाचे सर्व तंत्रज्ञ थक्क होवून हा खेळ पाहत होते. आतापर्यंत अशा घटना केवळ हॉलीवूडच्या सिनेमात पाहण्याचीच सर्वांना सवय होती. निरंजन-१ च्या मेंदूत लक्षावधी प्रतिमा अफाट वेगाने फिरवल्या जात होत्या. आता भूतलावरील प्रतिमांचा रोख भारताकडे वळला होता. अचानक ह्या लक्षावधी प्रतिमेतील एका प्रतिमेकडे पाहून निरंजन-१ अडखळला. विदिशाच्या गावातील पुरातन वाड्यात तिच्या पूर्वजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिमा निरंजनचीच होती. निरंजन-१ च्या ह्या एका दुबळ्या क्षणाचा मूळ निरंजनने फायदा उठवत आपल्या मेंदूवर पुन्हा कब्जा मिळविला. आता निरंजन-० कार्यान्वित झाला होता. अचानक दूरसंवेदन उपग्रह आणि इंटरनेट सेवा सुरु होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. निरंजन-० ने मिहिर, बोस, कच ह्यांच्या मेंदूत आपली ज्ञानसंपदा घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला. आपले हे स्वत्व किती काळ टिकणार ह्याची त्याला शास्वती नव्हती. त्याचा हा अंदाज खरा ठरला. निरंजन-१ काही सेकंदातच पुन्हा कार्यान्वित झाला होता. परंतु निरंजन-० ने आपले काम अंशतः पार पाडले होते. आपल्या मेंदूतील बुद्धिमत्तेचा काही भाग intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित करण्यात त्याने यश मिळविले होते.
निरंजन-१ पुन्हा आता सर्व ठप्प करण्याच्या मागे लागला होता परंतु ह्यावेळी त्यापुढे आव्हान होते ते intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित झालेल्या निरंजन-० च्या बुद्धिमत्तेचे. त्यामुळे निरंजन-१ काहीसा गोंधळून गेला. त्याचवेळी मिहिरने ह्या सर्व घडामोडींची कल्पना बोस आणि वरिष्ठ अधिकार्यांना दिली. आणीबाणीच्या वेळी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा चालू करण्यात आली. अतिमहत्त्वाचे संगणक माहितीमाया जाळापासून वेगळे करण्यात आले आणि त्यात फक्त १-२ व्यक्तींना शिरकाव करता येईल अशी सोय करण्यात आली.
इथे आपल्याला मिळालेल्या अधिक बुद्धिमत्तेवर कच खुश झाला होता. पण त्याला एकंदरीत परिस्थितीची कल्पना नव्हती त्याचे लक्ष निलोतम्मावरच होते. आपल्या मिळालेल्या ह्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो निलोतम्माला आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू लागला होता. इथे मिहिरच्या डोक्यात सुद्धा असलेच विचार चालले होते. सामक आणि निलोतम्माला उपग्रहात बसवून पृथ्वीवर आणण्याचा त्याचा मानस होता. ह्या सर्वात बोस एकच वस्तुनिष्ठ विचार करणारे होते. निरंजन-० ची बुद्धिमत्ता त्यांच्यात आल्याने त्यांनाही सर्व पात्रांची ओळख झाली होती. त्यांच्याकडे सर्वात जास्त अधिकार असल्याने शेवटी सामक, नीलोतम्मा, कच ह्यांना सुमेर ग्रहाजवळ गेलेल्या उपग्रहात जवळजवळ कोंबण्यात आले. आणि ह्या उपग्रहाचा परतीचा प्रवास सुरु झाला. ह्या उपग्रहाने सुमेर ग्रहाजवळ पोहोचण्यात बरीच वर्षे लावली होती. परंतु आपल्या नंव्याने प्राप्त झालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बोस आणि मिहिर ह्यांनी हा परतीचा प्रवास केवळ एका दिवसात होईल अशी तजवीज केली होती. ह्या उपग्रहाचे पृथ्वीवर आगमन अगदी गुप्त ठेवण्यात आले होते. 

Wednesday, February 20, 2013

अदृश्य शक्ती आणि पालकत्व


कोणत्याही दोन व्यक्ती, समाज, राष्ट्र ह्यांचा एकमेकात संवाद, क्रिया - प्रतिक्रिया सुरु असतात. बहुदा ह्यातील एक घटक हा दुसऱ्या घटकापेक्षा सामर्थ्यवान असतो. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तो दुसऱ्या घटकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवावयास पाहतो. ह्या दोघांतील संबंधांच्या प्राथमिक पातळीत सामर्थ्यवान घटक आपल्या शक्तीचे थेट प्रदर्शन करतो आणि कमकुवत घटकास आपणास हवे तसे करण्यास भाग पाडतो. परंतु असा संबंध दीर्घकाळ टिकण्यास बऱ्याच अडचणी येतात. कमकुवत घटकाच्या मनात निर्माण होणारा असंतोष आणि त्याचे वाढणारे बळ ह्या दोन मुख्य अडचणी होत. मग सामर्थ्यवान घटक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या तत्वाचा वापर करू पाहतो. कमकुवत घटकाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे अशा प्रकारे नियंत्रण करावे की त्याने आपल्यास हवे तसे वागावे हे धोरण स्वीकारले जाते. ह्यामध्ये कमकुवत घटकाच्या वागणुकीवर सतत नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारली जाते. ही वागणूक नियंत्रणापलीकडे गेल्यास लगेच धोक्याचा संदेश निर्माण केला जातो आणि बलवान घटक प्रत्यक्ष कृती करतो.
ह्याची व्यवहारात उदाहरणे द्यायची झाली तर हुकुमशाही राजवट ज्यात नागरिकांच्या वर्तनावर बिग ब्रदर लक्ष ठेवून असतो. मीना प्रभूंच्या चीनी माती ह्या पुस्तकात काही काळापूर्वीच्या आणि काही प्रमाणात आताच्याही चीनमधील नागरिकांच्या ह्या स्थितीचे वर्णन आहे. स्थानिक माफिया जे सर्व सामान्य लोकांच्या वागणुकीवर लक्ष ठेवतात.
आता आपण बालक पालक ह्या नात्याकडे वळूया. पूर्वीच्या पिढीत पालक ठोकशाही, हुकुमशाही तत्वाचा वापर करायचे. आजचे काही पालक त्यावेळी बालक ह्या नात्यात असल्याने त्यांना हे असेच तत्व वापरायचे असे वाटणे साहजिक आहे. परंतु काळ बदलल्याने पालकांनी अदृश्य शक्ती तत्वाचा वापर करणे आवश्यक आहे. घरातील परिस्थितीला असे नियंत्रित करा की बालक आपल्याला हवे तसे वागेल. ह्यात बरीच वैचारिक गुंतवणूक आणि स्वयंशिस्तीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पालकांनी स्वतःच्या वागणुकीद्वारे बालकांचे formatting (जडणघडण) करणे हा ही एक उपाय असू शकतो.

 ह्यातही एक मेख आहेच हल्लीची बालक पिढी भावनिक दृष्ट्या बरीच पुढे गेली आहे त्यामुळे काही काळात त्यांना ह्या तत्वाचा उलगडा होईल. आणि मग ह्या तत्वाचा वापर आपल्यावर केला जाईल.

हे तत्व अमलात आणण्यासाठी पालकत्व हे सर्वात प्राथमिक पातळीवरचे नाते आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवरील अनेक नात्यांत हे तत्व अमलात आणले जावू शकते. पण त्याच्या समीकरणाची क्लिष्टता मात्र वाढत जाते.
 

Tuesday, February 19, 2013

सुमेर ग्रह भाग ८


निरंजन आपल्या दीर्घ निद्रावस्थेतून हळूहळू जागा झाला. आज्ञावलीमध्ये कुण्या आगंतुक व्यक्तीचा प्रवेश झाल्यास आपली निद्रा भंग होईल ह्याची त्याने तजवीज करूनच ठेवली होती. आपला महा महासंगणक सुरु करताच त्याला एकंदरीत सर्व परिस्थितीचा उलगडा होण्यास फारसा काही वेळ लागला नाही. आपली मनुष्यजात आपल्यापर्यंत येऊन पोहोचली ह्याचा त्याला सखेद आनंद झाला. सखेद ह्यासाठी की ही भेट काही शांत असणार नाही हे ते जाणून होता.
निरंजनचे मन आपसूकच २०० वर्षांपूर्वीच्या घटनांकडे गेले. अंतराळातील निघालेल्या ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटताच निरंजन एकदम कावराबावरा झाला होता. आता हे यान कोठे जाईल, आपण असेच अंतराळात भरकटून आपला अभागी अंत होणार अशा नको नको त्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले. असेच काही दिवस गेले. यानातील इंधनाचा साठा आता संपण्याच्या मार्गावर होता. परंतु आता निरंजन ह्या सर्व गोष्टींची चिंता करण्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या मनावर एका निरंतन शांततेने कब्जा केला होता. हळूहळू निरंजन एका दीर्घ निद्रेत गेला होता.
निरंजनची निद्रा ज्यावेळी भंग झाली त्यावेळी एका वेगळ्याच ठिकाणी असल्याचे त्याला आढळून आले. हे स्थळ समुद्राच्या खोल तळाशी होते. तिथे निरंजन सोडून कोणीच नव्हते आणि निरंजनच्या खाण्यापिण्याच्या गरजा अत्यंत मामुली स्वरूपाच्या राहिल्या होत्या. आपला मेंदू अत्यंत प्रगतावस्थेत गेला आहे हे काही दिवसातच निरंजनला जाणवले. कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा विचार मनात आल्यास त्या विषयाची इत्यंभूत माहिती मेंदू आपल्यासमोर सादर करतो हे निरंजनला कळून चुकले होते. संगणकावरील खेळाची निरंजनला फार आवड होती. असाच काही खेळ आपण निर्माण करावा असा विचार त्याच्या मनात आला. पण संगणक होता कोठे? असा विचार मनात येताच अत्याधुनिक संगणक निर्माण करण्याच्या सर्व सूचना मेंदूने त्याच्या समोर सादर केल्या अगदी त्याला लागणाऱ्या साधनसामुग्रीसकट. हे सर्व अतर्क्य घडत आहे हे निरंजनला समजत होते परंतु असे का घडत आहे हे हयची त्याला आता चिंता करावीशी वाटत नव्हती. एकंदरीत मनुष्यजातीने आतापर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान आपल्या डोक्यात शिरले आहे असा एकंदरीत त्याचा ग्रह होऊ लागला होता.
संगणकावरील खेळात नेहमी प्राथमिक Basic, Intermediate आणि Advanced अशा तीन पातळ्या असायच्या. आपल्या खेळात सुद्धा अशा पातळ्या बनवाव्यात असा निग्रह निरंजनने केला. पण खेळ कसला? निरंजनला हल्ली काहीसे एकटे वाटू लागले होते. आपल्या अवतीभोवती सजीव असावेत अशी इच्छा त्याच्या मनात रुजू लागली होती. असा विचार यायची खोटी, गणकांची संपूर्ण संरचना त्याच्यासमोर सादर झाली होती. मग निर्माण झाले होते वेताळ - म्हणजेच intermediate level. ह्या सर्व गडबडीत निरंजनला थोडासा थकवा आला होता. आणि त्यामुळे त्याने ही निद्रा घेतली होती. आता त्याच्या मनात अतिप्रगत पातळीचा शोध चालू झाला होता. अरे वेड्या अतिप्रगत पातळी तर स्वतःहून तुझ्यापुढे चालून आली आहे, त्याच्या मनाने त्याला सांगितले. प्रथमच निरंजनच्या मनात थोडी खळबळ माजली होती. ह्या सर्वाचा कर्ता करविता कोण ह्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे प्रथमच त्याला वाटू लागले. 

Saturday, February 16, 2013

Informed Decision - माहिती उपलब्ध करून घेतलेला निर्णय


व्यावसायिक जीवनातील हल्ली नव्याने आवडलेला शब्द म्हणजे 'Informed Decision'. प्रथम ज्यावेळी हा शब्द ऐकला तेव्हा आपल्या टीमला असा निर्णय घेण्यात सक्षम करण्यात व्यवस्थापकाने कशी महत्त्वाची भूमिका बजाविली पाहिजे असा चर्चेचा रोख होता. नेहमीप्रमाणे माझी गाडी आपल्या वैयक्तिक जीवनाकडे वळली. ह्यातील विविध टप्पे असे असावेत.
१> सर्वप्रथम मी मला 'Informed Decision' घ्यायचा आहे की नाही ह्याचा निर्णय घेतो. Informed Decision म्हणजे मेंदूचा सहभाग आला. पण माझ्या प्रत्येक निर्णयात मला मेंदू सहभागी करून घ्यायचा आहे की नाही हा माझा निर्णय! मी आर्थिक गुंतवणूक करतो त्यातील काही भाग माझ्या मित्रांच्या कंपन्यात करतो कारण तिथे मला माझी मैत्री महत्वाची असते. लग्न करताना काही लोक Informed Decision घेतात तर काही हृदयाचे म्हणणे ऐकून!
२> एकदा का मी 'Informed Decision' घेण्याचा निर्णय घेतला की मी माहितीचे योग्य स्त्रोत माहित करून घेणे अत्यावश्यक बनते. हल्ली माहितीचे खूप स्त्रोत उपलब्ध असल्याने मला त्यातील योग्य स्त्रोत निवडणे आवश्यक असते. मग मी गरज पडल्यास जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
३> समजा मी सुदैवी असेन आणि मला योग्य जाणकार भेटला आणि त्याने मला विविध पर्याय सुचविले. आतापर्यंत आपणास जाणविले असेल की लेखाचा एकंदरीत रोख आर्थिक गुंतवणुकीकडे किंवा नोकरी धंद्यातील एखाद्या निर्णयाकडे आहे. आता जाणकाराने सुचविलेल्या पर्यायांचे दोन गुणधर्म असतात. पहिला म्हणजे त्यातील फायद्याचे प्रमाण आणि दुसरा म्हणजे त्या पर्यायाची खात्रीलायकता! मग मी माझ्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार उपलब्ध पर्यायांच्या ह्या दोन्ही गुणधर्मांचे मुल्यमापन करून त्यातील मला योग्य वाटणारा निर्णय घेतो.
बघा पुढच्या वेळी कोणता निर्णय घेताना तो 'Informed Decision' आहे की नाही!  

सुमेर ग्रह पूर्वभाग आणि भाग ७


प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.
सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.
वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.
सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.

भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.
इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.
कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.
सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!
नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
भौमिक आणि कच पूर्णपणे गोंधळून गेले होते आज्ञावली आता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेली होती. कोण्या अज्ञात व्यक्तीने त्यावर नियंत्रण मिळविले होते आणि कच आणि भौमिक ह्यांचा ह्या आज्ञावलीतील प्रवेश बंद करून टाकला होता. इथे नासा आणि बोस ह्यांची बैठक जोरात चालू होती. ह्या दोन्ही मनुष्य सदृश्य जीवसमूहांचे पुढे काय करायचे ह्याविषयी ह्या बैठकीत एकमत होत नव्हते. बहुसंख्य लोकांचे मत होते की त्यांना सद्यपरिस्थितीप्रमाणे राहू द्यावे. परंतु ही बातमी आतापर्यंत बाहेरील बड्या कंपन्याच्या वरच्या वर्तुळात पोहोचली होती. त्यातील पर्यंटन आणि वैद्यकीय कंपन्यांना ह्या ग्रहाविषयी आणि इथल्या सजीवाविषयी व्यावसायिक आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी ह्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही लोकांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. ही फितूर मंडळी मानवाने ह्या ग्रहावर आधिपत्य गाजवावे ह्या विचाराचा पुरस्कार करीत होती.
मिहिर मात्र आपल्या प्रयोगात अधिकाधिक अचूकता आणण्याच्या मागे लागला होता. निलोतम्माचा स्वभाव आपल्याला समजलेल्या विदिशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने बनविला खरा पण खरी मेख त्यातच होती. विदिशाचा स्वभाव त्याला पूर्णपणे त्याला कळला थोडाच होता आणि आजूबाजूच्या घटकांचे काय? त्यामुळे त्याने अजून एक धाडशी निर्णय घेतला आणि ह्या दोन पात्रांव्यतिरिक्त अजून काही पात्रे आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे त्याने ठरविले.
पर्वतराजीत बसलेल्या कचने आनंदाने एक उडी मारली. अथक प्रयत्नानंतर त्याला पुन्हा आज्ञावलीत प्रवेश करता आला होता. आपल्या आज्ञावलीचे पूर्ण बदलेले रूप पाहून तो थक्क झाला. वेताळांचे नियंत्रण करणारा आज्ञावलीचा भाग कच आणि भौमिक ह्यांच्या पलीकडचा होता. तिथे प्रवेश केल्यास वेताळ आपले स्वत्व गमावून बसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा भाग नियंत्रित करतो तरी कोण असा प्रश्न एकदा वैतागून कचाने भौमिकला केला होता. वेताळापेक्षा वेगळी अशी अतिवयस्क व्यक्ती जी प्रयोगशाळेच्या आतल्या कक्षात बसून असते ती भाग नियंत्रित करते अशी वदंता होती. परंतु ह्या वयस्क व्यक्तीला सद्य वेताळापैकी कोणी पाहिले नव्हते.
बोस आणि नासा ह्यांच्या बैठकीत नेमका तोच मुद्दा चर्चिला जात होता. ह्या वसाहतीचा कर्ता करविता कोण. सह्याद्रीतील वैज्ञानिकांचे लक्ष राहून राहून दोनशे वर्षांपूर्वी अंतराळात गायब झालेल्या यानाकडे जात होते. त्यात निरंजन नावाचा अतिबुद्धिमान वैज्ञानिक अंतराळात गायब झाला होता. पुढे एक दोन वर्षे हे यान चर्चेत राहिले पण नंतर सर्वजण त्याला विसरून गेले होते. आता अचानक त्या यानाचा संभाव्य मार्ग तपासून पाहिला जावू लागला.

Wednesday, February 13, 2013

सुमेर ग्रह भाग ६


नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
 

Tuesday, February 12, 2013

सुमेर ग्रह भाग पाच

 
भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.


इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.

कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.

सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!

Monday, February 11, 2013

सुमेर ग्रह भाग पाच


भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.
इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.
कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.
सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत  आलाच!

Saturday, February 9, 2013

मी आणि मी - एक संवाद


माझे स्वतःचे माझ्याविषयी मत काय असतं? प्रत्येक क्षणाला हे मत निर्माण होत असत आणि बदलत राहते. ह्या स्वतःविषयीच्या माझ्या मताबरोबर अजून काही भावनांचा कल्लोळ मनात चालू असतो. मी दररोज काही उद्दिष्ट ठरवून दिवस सुरु करतो. काही वैयक्तिक तर काही व्यावसायिक. काही परम महत्वाची तर काही कमी महत्वाची. जसजसा दिवस पुढे जातो तसतसा माझा त्या दिवसांच्या भावनांचा रंग काहीसा ठरविला जातो, महत्वाची कामे झाल्यास मी खुश होत जातो. आता ह्या खुशीच्या क्षणी मी काहीसा बेफिकीर होऊन बाकीची कर्तव्य विसरू शकतो किंवा एकदम जोरात येवून बाकीची कामे आटोपण्याचा धडाका लावू शकतो. आता महत्वाची कामे झाल्यास माझे बाह्य स्वरूप आतल्या माझ्यावर खुश असतो. मी स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो.
दुनियेला माझे फक्त बाह्य रूप दिसते. माझे हे बाह्य रूप माझ्या बोलण्या चालण्यातून, लिहिण्यातून प्रकट होत असते. पण माझ्या अंतर्रुपापर्यंत पोहोचण्याची फक्त मलाच संधी मिळते. माझे हे अंतर्रुप मी कितपत ओळखले ह्याचा मला कधीच थांगपत्ता लागू शकत नाही. तसा ह्या गोष्टीवर फार कमीवेळा मी विचार करतो.
ह्या अंतर्रुपात आनंद, दुःख, प्रेम, क्रोध, मत्सर, लोभ अशा अनेक भावना गोंधळ घालीत असतात. एकंदरीत माणसाच्या अंतर्रुपात जी भावना दीर्घकाळ वास्तव्य करून राहते त्यानुसार त्याचा स्वभाव बाह्यजगत ठरविते. माझ्या बाह्यरुपाचा जगाशी जो संवाद होतो त्यानुसार हे बाह्यरूप माझ्या अंतर्रूपाशी संवाद साधते. ह्या संवादानुसार वर उल्लेखलेल्या भावनेतील एखादी भावना उचल खाते. आता ही भावना किती काळ टिकते हे एकतर बाह्यरूपाने पाठविलेल्या दुसर्या संदेशावर ठरते किंवा माझ्या मनःशक्तीवर! मला त्रासदायक ठरणारी भावना लवकरात लवकर घालविण्यासाठी एकतर मी अनुकूल वातावरणात जाणे आवश्यक असते किंवा माझ्या मनःशक्तीला आव्हान करणे आवश्यक असते.
माझ्या बाह्यरूपाला खुश करण्यासाठी मी चमचमीत अन्न घेतो, वातानुकुलीत खोलीत झोपतो, दूरदर्शन पाहतो, समाजात मिसळतो. परंतु आपण आपल्या ह्या अंतर्मनाची फार कमी वेळा काळजी घेतो, त्याचे लाड करतो. अंतर्रूपाला खुश करण्यासाठी फार कमी मार्ग असतात. हल्ली शास्त्रीय संगीत ऐकल्यावर कुठेतरी अंतर्मन शांत झाल्यासारखे वाटते. शनिवारी रात्री अंधारात केवळ श्रवणेद्रियांना जागृत ठेवून हे शास्त्रीय संगीत ऐकावे, सुब्बलक्ष्मी, भीमसेन ऐकावेत. राम मराठे ह्यांचे मंदारमाला नाटकातील जयोस्तुते उषा देवते ऐकावे. प्रत्येकाचे अंतर्मनाला खुश करण्याचे मार्ग वेगळे. कोणाला जंगल खोऱ्यात जायला आवडते. प्रत्येकाने आपला मार्ग ओळखावा आणि त्या मार्गाने प्रवास करावा.

हे अंतर्मन जरूर पडेल तेव्हा तुमची सर्वोत्तम क्षमता बाहेर काढू शकते. त्यावेळी ते तुमच्या बाह्यमनाला आदेश देते की बाबारे आता सर्वोत्तम कामगिरीची गरज आहे. मेंदू, शरीर एका तन्मय स्थितीत जाते. आपली ही सर्वोत्तम स्थिती अंतर्मन लक्षात ठेवून देते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ह्या स्थितीत तत्काळ नेण्यास मदत करते.

Friday, February 8, 2013

इराणी चषक सामना - रोहित शर्मा, अभिषेक नायर आणि सचिन!


लहानपणी मला अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले होते. मी वसईला मोठा होत असताना मध्येच गल्लीत एखाद्या दिवशी चांगली फलंदाजी केली की मी अनेक मनोरथे रचित असे. त्यात मला एक प्रश्न पडे की मी समजा रणजी दर्जापर्यंत पोहोचलो की माझी निवड महाराष्ट्राच्या संघात की मुंबईच्या? ह्या प्रश्नावर माझी बरीच उर्जा खर्च झाल्याने मी रणजी दर्जापर्यंत पोहोचलो नाही ही गोष्ट वेगळी!
सध्या इराणी चषक सामना चालू आहे. क्रिकइन्फोवर ह्या सामन्याचे धावते वर्णन वाचणे हा एक ज्ञानवर्धक आणि मनोरंजक अनुभव असतो. संपूर्ण भारत आणि जगभरातील रसिक आपली टिपण्णी पाठवत असतात आणि त्यातील निवडक टिपण्या आपणास वाचता येतात.
२०११ च्या इंग्लंड दौऱ्यापासून मी सचिनने निवृत्त व्हावे अशा विचाराच्या टिपण्या जमेल तिथे प्रसिद्ध करीत आहे. परंतु हल्ली माझे पुन्हा मतपरिवर्तन होऊ लागले आहे. कालचाच सामना पहा! रोहित शर्मा आणि अभिषेक नायर ह्या दोघांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुवर्णसंधी होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आपला खेळ आणि संयमी मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी संपूर्ण वानखेडे मैदान आणि समोर सचिन उपलब्ध अशी आदर्श स्थिती होती. पण दोघेही बेजबाबदार फटका मारून बाद झाले. एका रसिकाने ह्यावर एक मार्मिक प्रतिक्रिया दिली. 'आपल्या विकेटचे मुल्य रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यात सुद्धा कळले नाही. ह्याउलट सचिनकडे पहा तो कसा राष्ट्रीय पातळीच्या सामन्यात सुद्धा कधीच आपली विकेट फेकत नाही.' पुढे तो रसिक म्हणाला ' स्थानिक पातळीवर रोहितच्या जवळपास गुणवत्तेचे अनेक असे खेळाडू आहेत ज्यांना एकही संधी मिळत नाही, त्यांच्याविषयी मला वाईट वाटते.' अगदी बरोबर म्हणाला तो रसिक!
सचिन असो वा जाफर, दोघे जुन्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. संयम भरभरून आहे त्यांच्यात, तीच गोष्ट नव्या पिढीच्या अजिंक्य रहाणेची. पण सर्वसाधारण नवीन पिढीचे काय? आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी ज्यांची केवळ स्वप्ने मागच्या पिढीने बघितली अशा गोष्टी अगदी आरामात आज बहुसंख्य नवीन पिढीस उपलब्ध आहेत. पण जे आरामात मिळते त्याचे मुल्य कळावयास कठीण जाते. तीच गोष्ट काहीशी रोहितच्या बाबतीत झाली आहे. तीच गोष्ट प्रवीणकुमार ह्या गोलंदाजाची! कालच बातमी वाचली की त्याने स्थानिक सामन्यात बेजबाबदारपणे वागण्यास सुरवात केली आहे. IPL चा पैसा त्याच्या डोक्यात गेला आहे असे त्याच्या स्थानिक सहकाऱ्याचे मत आहे.
एकंदरीत काय नवीन पिढीतील बऱ्याच जणांचे सर्व लक्ष तरुणपणातील वर्षांकडे आणि त्यातील मौज मस्तीकडे आहे. पण आयुष्य मात्र केवळ तरुणाईचेच नाही हा मुद्दा कोठेतरी विसरला जात आहे.
असो बाकी सचिनने तळाचे फलंदाज समोर असताना स्वतःकडे फलंदाजी ठेवण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. बहुदा तुमच्या बेजबाबदारीची मी पूर्ण जबाबदारी घेणार नाही असेच काही त्याला सूचित करायचे असेल! बघूया आज मुंबई आपला लढाऊ बाणा दाखविते का?

Monday, February 4, 2013

मुसाफिर - अच्युत गोडबोले


बोरिवलीमध्ये शब्द ह्या पुस्तकालयात सवलतीच्या दरात पुस्तकविक्री सुरु आहे म्हणून कुतूहलाने गेलो. रविवार संध्याकाळ आणि सवलतीच्या दरात पुस्तके ह्याचा परिणाम म्हणून माझ्यासारखे अनेकजण तिथं आले होते. ज्या प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात होती ती काही मला झेपली नाहीत. अपवाद फक्त सावरकरांच्या दोन पुस्तकांचा 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने' आणि '१८५७ चे स्वातंत्र्यसमर'. ही पुस्तके निवडून मग मी मोर्चा इतर पुस्तकांकडे वळविला. मीना प्रभू ह्याच्या प्रवासवर्णनाची 'मेक्सिकोपर्व', 'माझे लंडन', 'चीनी माती', दक्षिण रंग', 'इजीप्तायन' ही पाच पुस्तके मला खुणावू लागली. तिही मी उचलली. माझा मित्र दर्शन वर्तक ह्याने मीना प्रभू ह्यांच्या पुस्तकांचे परीक्षण केले होते त्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. तसेच मग इंदिरा संत ह्याच्या मृद्गंध ह्या पुस्तकाने लक्ष वेधले. तेही उचलले. माझी ही पुस्तक खरेदी पाहून मुलाने देखील सापाचे आणि बाकी गोष्टींची पुस्तके घेतली.
अचानक माझे लक्ष अच्युत गोडबोले ह्यांच्या मुसाफिर ह्या पुस्तकाने वेधले. अच्युत गोडबोले ह्यांनी बर्याच काळापासून मला प्रभावित केले आहे. १९९८ साली सिंटेल मध्ये मी प्रवेश केला त्याच्या आसपास त्यांनी ही कंपनी प्रमुख अधिकारी पदावरून सोडली होती. एका मराठी माणसाने ह्या कंपनीत इतके मोठे पद भूषवावे ह्याचा मला त्यावेळी खूप अभिमान वाटला होता. त्यानंतर त्यांची भेट लोकसत्तेतील लेखामधून होत राहिली. प्रत्येक वेळी त्यांनी मला अधिकाधिक प्रभावित केले. सगळ्या पुस्तन्काची किंमत २००० च्या आसपास झाली. मॉलच्या रविवारीच्या लगेच विसरता येण्याजोग्या एका भेटीचा सरासरी खर्च. परंतु ह्याच पैशात किती अमुल्य ठेवा खरीदला होता मी.
रात्री हे पुस्तक चाळण्यास सुरुवात केली. अच्युत गोडबोले ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके बहुविध रंग वाचून मी थक्क झालो. पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. सोलापूरचे वर्णन, आयआयटी मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या कारवाया, भीमसेन जोशी सारख्या मान्यवर कलावंताबरोबरचे अनुभव, सामाजिक चळवळीत त्यांचे झोकून देणे, काहीसा भ्रमनिरास झाल्यावर परत व्यावसायिक जगतात प्रवेश आणि मग तेथून घेतलेली गगनभरारी. हे पुस्तक फक्त वरवर चाळून इतके थक्क व्हायला होते. देवाने एकाच माणसाच्या अंगी इतकी गुणवत्ता द्यावी जी एका जन्मात वापरणे कठीण जावे? बुद्धिमत्तेचे पण बघा कसे असते, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती माणसाला धोपटमार्गाने जावू देते पण त्याच्यापलीकडील बुद्धिमत्ता माणसाच्या अंगात तुफान निर्माण करते. असा माणूस कोणती क्षेत्र पालथी घालील त्याचा त्या माणसाला देखील अंदाज नसतो. असेच काही अच्युत गोडबोले ह्यांच्या बाबतीत म्हणता येईल. खंत एकाच गोष्टीची, आपण / आपला देश अशा गुणी माणसांचा काहीच उपयोग करून घेत नाही. अरे रस्त्यावर पोस्टर लावायची तर अशा लोकांची लावा जी नव्या पिढिला आदर्श दाखवतील!
असो, ह्या पुस्तकाला मान्यवरांनी ज्या प्रस्तावना दिल्या आहेत त्याही वाचण्याजोग्या आहेत. त्यावर मी काही भर घालू शकणार नाही. फक्त पुस्तकातील एक लक्षात राहिलेला क्षण. व्यावसायिक क्षेत्रात पुनरागमन केल्यावर गोडबोले ह्यांच्या वैयक्तिक जीवनात कठीण प्रसंग येतो, बचतही जवळपास शून्य आणि व्यावसायिक जीवनावरही काही प्रभुत्व नाही, अशा क्षणी सामान्य माणूस डगमगून गेला असता परंतु गोडबोले ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुस्तकवाचनाचा झपाटा लावला, तंत्रज्ञानावरील असंख्य पुस्तके वाचून काढली आणि अल्पावधीत त्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळविले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. जर कोणी निराश झाले असेल त्यांनी हा भाग जरूर वाचवा. एकूणच नक्की वाचण्याजोगे पुस्तक! Must Read!

Sunday, February 3, 2013

सुमेर ग्रह भाग ४



सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.

Saturday, February 2, 2013

सुमेर ग्रह भाग ३


वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.

Friday, February 1, 2013

सुमेर ग्रह भाग २


सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.