Wednesday, December 30, 2015

भावनाकल्लोळ!

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

  आयुष्यात पंचविशी - तिशीपर्यंत कसा अगदी उत्साहपूर्ण काल असतो. आपल्याजवळ आयुष्यात भव्य दिव्य करण्यासाठी अगदी अफाट वेळ आहे अशी भावना मनात व्यापून राहिलेली असते.त्यामुळे एक विशिष्ट मार्गच धरून ठेवायला पाहिजे असला विचार क्वचितच मनात येतो. त्यामुळे ह्या कालावधीत मनाला आवडतील असे निर्णय घेतले जातात. थोड्या कालावधीत एखादा निर्णय न आवडल्यास त्याहून पूर्णपणे वेगळा असा दुसरा निर्णय सुद्धा घेतला जातो. पण त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत आयुष्याच्या तिशीच्या आसपास किंवा विवाहानंतर काहीसा बदल घडून येतो. माणसाचे प्रथम प्राधान्य हळूहळू स्थैर्याच्या शोधाकडे वळत जातं. काही कलंदर लोक असतात ती आयुष्यभर आपल्या मर्जीने वागत राहतात.



http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

केळीचे सुकले बाग

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_28.html

एखाद्या बाह्यरूपाने सुखी दिसणाऱ्या संसारात अंतर्मनाने दुःखी असणाऱ्या स्त्रीची व्यथा सांगणारं हे गीत आहे हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी केवळ तिला घर, पैसा, कपडालत्ता देऊन भागत नाही तर तिच्या मनाला समजून घेणारा साथीदार हवा असा हा ह्या गीताचा आशय! 


पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_28.html 
 

Saturday, December 26, 2015

वारसदार - अंतिम भाग

 
 http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_26.html

कुलकर्णीनी आपलं मित्तल संशोधन अभियान मोठ्या जोरात चालूच ठेवलं होतं. ह्यात पुरावे तसे मिळत होते पण असल्या पुराव्यांविरुद्ध वर्षोनुवर्षे खटले चालू ठेवण्याची क्षमता मित्तल बाळगून असणार ह्याच्याविषयी कुलकर्णी आणि राव ह्यांच्यात एकमत होतं. त्यामुळे त्यांना शोध होता एखाद्या अगदी ठोस पुराव्याचा! गेले काही दिवस हे दोघं रावांच्या घरी बसूनच उपलब्ध कागदपत्रांचा अगदी बारकाईने तपास घेत होते. सुशांतदेखील सध्या बंगलोरात असल्याने त्यांना वेळेचं कसलंच बंधन नव्हतं. 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_26.html 

कट्यार काळजात घुसली!!

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_19.html


चित्रपट निव्वळ अप्रतिम! ह्या चित्रपटाचं सौंदर्य अनेक निकषांवर खरं ठरणारं ! चित्रपटातील वातावरणनिर्मिती ज्याप्रकारे केली ते सुंदर आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये जे एक सुसंस्कृत वैभव / श्रीमंती दाखवली गेली ती मनाला मोहवून गेली. चित्रपटाचा आरंभच "सूर निरागस होवो गणपती" ह्या शंकर महादेवन ह्यांच्या अप्रतिम गीतानं होतो. ह्या गीताचे सुरेल सूर कानात साठवावेत की की त्या सुंदर नृत्याला आणि श्रीमंती वैभवाला नयनात साठवून घ्यावं हा पडलेला प्रश्न!

पुढे वाचा 


http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_19.html 

Saturday, November 28, 2015

व्यावसायिक मनाचा वेध!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_28.html

व्यावसायिक जीवनात यशस्वी होणाऱ्या किंबहुना वरिष्ठ पदे भूषविणाऱ्या लोकांसाठी स्वतःविषयीची स्वतःच्या मनात असणारी प्रतिमा उंचावर असणे आवश्यक असते. जितकं क्षेत्र अधिक क्लिष्ट तितकी ही गरज जास्त असते. 

आता ह्याविषयी कारण काय असावं ? कोणी उघडपणे ही बाब चर्चित नसलं तरी प्रत्येक थरावर असणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या लगेचच असणाऱ्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही थरावरील माणसांची तुलना होत असते. म्हणजे हा आपल्या बॉसची जागा घेऊ शकेल काय किंवा ह्याची जागा ह्याच्याखालचा कर्मचारी घेऊ शकेल काय वगैरे वगैरे. ही तुलना केवळ वर्षाअखेरीस होणाऱ्या मुल्यमापनाच्या वेळीच होत नाही तर दररोज कार्यालयात होणाऱ्या मिटींग्स, ह्या माणसाने दिलेल्या भाषण आणि ई - मेल ह्यामधून प्रकट होणारं त्याचं ज्ञान, लोकांना सांभाळून घेण्याची त्याची / तिची वृत्ती ह्या सगळ्या घटकांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोंद ह्या व्यावसायिकाचे केवळ बॉसच नव्हे तर एकंदरीत सर्व कर्मचारी घेत असतात. कळत नकळत ह्या व्यावसायिकाची एक प्रतिमा निर्माण झालेली असते जी निर्माण करण्यात त्या व्यावसायिकाच्या दैनंदिन वर्तणुकीचा मोठा वाटा असतो.

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_28.html 

अश्रू - वि. स. खांडेकर

 

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_21.html

पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_21.html 

 

हूल - भालचंद्र नेमाडे

 
 http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html


पुस्तकाची कथा चांगदेव ह्या नायकाभोवती फिरते. पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक बनलेला चांगदेव मुंबईतील जीवनाला कंटाळून एका गावातील कॉलेजात नोकरी स्वीकारतो. ह्यात बराच आदर्शवाद असतो. आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे, आपल्याकडे योग्य ते शिक्षण आहे तर मग आपण ह्या देशात कोठेही नोकरी करू शकतो हा तो आदर्शवाद! अडीचशे रुपये पगार - पगार मिळविण्यासाठी सर्व काही सहन करावी लागण्याची मनोवृत्तीअधूनमधून चांगदेवाला मनाला लागून राहत असते. पगार कितीही वाढला तरी हल्लीच्या युगातसुद्धा आपल्या सर्वांना हीच भावना सलत असते ही मात्र खरी गोष्ट!  

सुरुवातीलाच ह्या आदर्शवादाला तडा देणाऱ्या घटना घडत जातात. लेक्चरच्या वेळापत्रकाची आखणी करताना पर्यवेक्षक स्वतःसाठी आणि स्त्री प्राध्यापकांसाठी सोयीच्या वेळा आखून घेतो तर चांगदेवला सकाळचे पहिली आणि सायंकाळची सर्वात शेवटची तासिका देण्यात येते. एखाद्या विषयासाठी पुस्तके लावताना सुद्धा खास ओळखीतील प्राध्यापकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात. बदमाश मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्गावरील तासिका चांगदेवला दिल्या जातात. मुलांना मार्क्स मिळायला सोपे जावे म्हणून नोट्स देण्यास चांगदेवचा तत्वतः विरोध असतो. वर्गात फारच थोडी मुले अशी असतात ज्यांना शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात रस असतो. बाकीची सर्व मुले वर्गात प्रचंड गोंधळ करीत असतात.

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html 

Sunday, October 25, 2015

शोध स्वः त्वाचा !!

 

हल्ली चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याला जनांच्या नजरेतून फारशी किंमत राहिली नाही. जे काही करायचे ते स्वानंदासाठी, स्वतःच्या विकासासाठी. ह्या विकासातून कुटुंबाचा आर्थिक विकास साधला जातो आणि मग कुटुंबातील अन्य सदस्यांचा बाकीचा विकास आपोआप साधला जाईल अशी हल्लीची सर्वमान्य विचारधारणा आहे. मी बराच काळ ह्याला वैचारिक विरोध केला. कालबाह्य म्हणून सतत गणना केली जाऊ लागल्यावर मी माझे मत सार्वजनिकरित्या मांडणे हल्ली सोडून दिले आहे किंवा अगदी कमी केले आहे. 
काल अचानक पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता वाचनात आली. 


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
 
http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post_26.html  

सरमिसळ - २०१५ !!

 

गेल्या वर्षी मी whatsapp वर का नाही अशी पोस्ट लिहिली आणि ह्या वर्षी whatsapp ला सामील झालो. मी आदर्शवादी उरलो नाही की whatsapp ला सामील झालो ह्याचे खास स्पष्टीकरण द्यावे. गेल्या चार पाच महिन्यातील माझ्या संचारानंतर काही जाणवलेल्या गोष्टी.

१) इथे गैरसमज, मानापमान ह्या गोष्टींना खूप वाव आहे. आपल्याच ग्रुप मधला एखादा आपल्या अपडेट्सना मुद्दाम लाईक करत नाही, आपण एखादा महत्त्वाचा अपडेट टाकला की मुद्दाम दुसराच अपडेट टाकून बाकीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो वगैरे वगैरे. 


पुढे वाचा  

http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post_11.html 

Saturday, October 3, 2015

वारसदार - भाग ८

 

http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html 

"कुलकर्णींना सांगा मी निवडणूक लढवायला तयार आहे!" रात्री आईबाबा आणि नीला असे सर्वजण जेवायला बसले असताना नीला सहजपणे म्हणाली. दोघांच्याही तोंडातला घास तोंडातच राहिला. आपली पोरगी इतका मोठा निर्णय इतक्या लगेच घेईल ह्यावर विश्वास ठेवणं त्यांना काहीसं कठीण जात होतं.  पुढचे काही दिवस अगदी धामधुमीत गेले. एका २१ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला मुख्य राजकीय पक्षाने तिकीट देण्याची बातमी राज्यपातळीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे नीलाने अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मीडियाचे बरेच लोक हजर राहिले. नशिबाने निवडणूक एक महिन्यावर होती. त्यामुळे अर्ज भरून आल्यावर नीला थेट अभ्यासात गुंतली. तिने पुन्हा एकदा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. आठव्याचे पेपर चांगले गेले. म्हणजे अजूनही चांगले जाऊ शकले असते पण इतक्या सगळ्या व्यवधानाकडे पाहता ठीक गेले.  आणि मग मात्र तिने प्रचारात स्वतःला झोकून दिलं. पक्षाची यंत्रणा अगदी सुसज्ज होतीच आणि एका तरुण चेहऱ्याला तिकीट मिळालं म्हणून सर्व तरुणाई अगदी बेहद्द खुष होती. फेसबुक, whatsapp वरील प्रचार खुद्द नीला सांभाळत होती आणि पारंपारिक प्रचार कुलकर्णी सांभाळत असल्याचं चित्र दिसत

पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html 

Saturday, September 26, 2015

वारसदार - भाग ७

 
 http://patil2011.blogspot.in/2015/09/blog-post.html

  "जामीन मिळवण्यात मात्र सहजासहजी यश मिळणार नाही!" कुलकर्णी रावांना सांगत होते. उद्योगपती मित्तलने आपलं जाळे अगदी काळजीपूर्वक विणले होते. सध्यातरी रावांचा नाईलाज होता. 
रावांसाठी आणि गीताताईसाठी दिवस अगदी कष्टमय चालले होते. सुशांतसाठी सुद्धा काही फारसं सोपं नव्हतं आपल्या आईवडिलांची ही स्थिती पाहणे! तरीही त्याने नेटाने आठव्या सत्राचा अभ्यास सुरु ठेवलाच होता. नीलाची मनःस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. मनावर ताबा न राहून ती एके दिवशी सुशांत कॉलेजात असतानाची संधी साधून गीता ताईंना भेटण्यास गेली होती. त्यावेळी तिला अगदी जवळ घेऊन त्या हमसाहमशी रडल्या होत्या. "मला ह्यावेळी अगदी राहून राहून वाटत मला एक मुलगी हवी होती!" त्यांच्या ह्या उद्गाराने नीलाला सुद्धा अगदी गहिवरून आलं होतं.


पुढे वाचा खालील लिंक वर …  


http://http://patil2011.blogspot.in/2015/09/blog-post.html 

Saturday, August 29, 2015

वारसदार - भाग ६

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html

दारची बेल वाजली तेव्हा नीलाची आई काहीशी आश्चर्यचकित झाली. नीला कॉलेजात गेली होती आणि बाबा ऑफिसात! अशा वेळी घरी कोण येणार अशा विचारातच तिनं दरवाजा उघडला. समोर शलाकाला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. "हिला आज कॉलेज वगैरे कसं नाही!" अशा विचारातच त्यांनी तिचं स्वागत केलं. "ये ना शलाका! आज किती दिवसांनी येतेस तू!" त्यांनी शलाकाला म्हटलं. शलाका हॉलमध्ये खुर्चीवर बसली. "आज माझं किनई माझ्या चुलत मावशीकडे काम होतं म्हणून मी आज दांडी मारली कॉलेजला!" नीलाच्या आईची साशंक नजर चुकवायचा प्रयत्न करीत शलाका बोलत होती. "हो का! सहजच  काम निघालं वाटतं मावशीकडे !" आई म्हणाली. शलाकाने एक दीर्घ श्वास घेतला. "मावशी, मला खास तुमच्याशीच बोलायचं होतं! म्हणून कॉलेजात न जाता मी थेट आज इथे आले!" शलाकाने थेट मुद्द्यालाच हात घातला. 

पुढील जवळजवळ दीड तासभर दोघी बोलत होत्या, नीला आणि सुशांतबद्दल! नीलाला सुशांत मनापासून आवडला आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून शलाकाने गेलं वर्षभर पाहिलं होतं. पण आता ज्या प्रकारे रावांचे शत्रू जिथे संधी मिळेल तिथे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे नीलाला खूपच मानसिक त्रास होत होता. आणि त्यामुळेच तिनं स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. "मावशी, तिला बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत जाऊन देऊ नका! म्हणजे जिथं सुशांत जाईल तिथं नको! त्या दोघांचं भलं होईल अशीच माझी मनापासून इच्छा आहे पण हे राजकारणी लोक आपापसातल्या वैरापायी उगाच ह्या दोघांचा बळी घायला नकोत!" शलाका अगदी कळकळीने सांगत होती. आईला तिचं म्हणणं बऱ्यापैकी पटत होतं पण नीलाला समजवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. शेवटी मग मी बाबांशी बोलून बघते असं म्हणत आईने शलाकाचा निरोप घेतला. रात्री मग बाबांशी आईने हा विषय काढल्यावर ते ही चिंतेत पडले.
पुढे वाचा खालील लिंक वर …  


http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html 

Sunday, August 23, 2015

वारसदार - भाग ५

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html 

पुढील तास दोन तासभर नीलाची समजूत घालण्यात गेले. "राजकारणी लोकांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही असं म्हणतात ते काही उगीच नाही!" बाबा म्हणत होते. "तसं म्हटलं तर फार काय मोठं घडलं नाही आणि जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही!" नीलाची समजूत घालण्यात आईने सुद्धा पुढाकार घेतला होता. दोघांच्या वास्तववादी बोलण्यानं नीला मात्र बरीच सावरली होती. अभ्यासाची बरीच मजल मारायची होती. ह्या घटनेने निराश होऊन बसण्यात काही अर्थ नव्हता. तिने आपल्या अभ्यासिकेत स्वतःला दोन तासभर कोंडून घेतलं. सुरुवातीच्या काही वेळानंतर अभ्यासात तिची चांगलीच लिंक लागली. दोन तासाभराचा अभ्यास झाल्यावर काहीशा प्रसन्न मनाने ती बाहेर हॉलमध्ये येण्यासाठी दार उघडायला गेली तर बाबा हळू आवाजात कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. खरंतर असं लपून ऐकायची तिला सवय नव्हती पण नक्कीच ज्या अर्थी बाबा हळू आवाजात बोलत आहेत म्हणजे हा फोन सकाळच्या घटनेशी संबंधित असणार अशी अटकळ तिने बांधली. 

पुढे वाचा 


http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html

Saturday, August 15, 2015

वारसदार - भाग ४

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html 

कॉलेजात गेल्यावर मात्र तिची निराशाच झाली. सगळीकडे अगदी सामसूम होती. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील काही मुलं लायब्ररीमध्ये चर्चेला बसली होती तितकंच! पण तिच्या वर्गातील कोणी दृष्टीला पडलं नव्हतं. आणि अचानक तिची नजर विकीवर पडली. विकी तोच तो ज्याने रावांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा प्रश्न उगाचच विचारून खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. विकी एकटा नव्हता तर त्याच्या सोबत त्याचा टवाळ कंपू सुद्धा होता. "A.T.K.T. कमी करायचा जोरदार प्रयत्न चालू आहे वाटतं!" नीला मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. तिला पाहताच विकीच्या नजरेत मात्र अगदी चमक भरली. नीलाच्या तडफदार उत्तराने त्याचा भर सभागृहात पाणउतारा झाला होता. खरतर असा प्रश्न विचारून गडबड करण्याचा त्याचा पिंड नव्हता. म्हणजे त्याचा पिंड मुळचा बदमाशगिरीचाच पण व्याख्यानात प्रश्न विचारणे वगैरे प्रकार त्याला झेपण्यासारखे नव्हते. पण त्याने हा प्रश्न विचारला तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून! हा कोणीतरी होता सत्ताधारी पक्षाचा ओमकार शर्मा ! रावांना उगाचच कॉलेजात भाव मिळतोय हे शर्माला रुचलं नव्हतं आणि म्हणून त्याने विकीला हाताशी धरलं होतं. पण नीलाने हा डाव हाणून पाडला होता आणि उलट त्यामुळे रावांना अधिकच प्रसिद्धी मिळाली होती. 

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html 

Sunday, August 9, 2015

वारसदार - भाग ३

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html 

सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी बाजू मांडून झाल्यावर सुधीरराव एकूण चर्चेचा आढावा घेण्यासाठी म्हणून पुन्हा व्यासपीठावर आले. त्यांचे आढावा घेण्याचे काम सुरु असतानाच कॉलेजातील विघ्नसंतोषी मुलांपैकी एक अचानक उठला आणि "इथे सर्व पक्ष जरी सुधारकांचा आव आणत असले तरी जोवर भ्रष्टाचारी लोक सर्व पक्षांत ठासून भरले आहेत तोवर ह्या देशाचे काही भले होणार नाही !" असे अगदी जोरात ओरडला. अगदी दृष्ट लागण्यासारख्या झालेल्या कार्यक्रमाला हे असं गालबोट लागणं म्हणजे अगदी दुर्देवी घटना होती. सुधीररावांचा चेहरा रागाने अगदी लालेलाल झाला होता. नीलाच्या ध्यानात हे सारं काही आलं. तात्काळ धावत जाऊन ती सुधीररावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " आपल्या कॉलेजात आलेल्या माननीय पाहुण्यांसोबत असा अनादर व्यक्त करणारी मुलं आपल्या कॉलेजात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट! पण ज्याप्रमाणे अशा मुलांच्या उपस्थितीमुळे आपल्या कॉलेजच्या प्रगतीत जशी बाधा न येता आपलं कॉलेज प्रगतीची शिखरं गाठत आहे त्याचप्रमाणे देशातील मोजक्या भ्रष्टाचारी लोकांच्या अस्तित्वाने आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा येणार नाही!" नीलाच्या ह्या करारी बोलण्याने वातावरण अगदी पालटून गेलं. सभागृहातील मुलांनी एव्हाना त्या खट्याळ कार्ट्याला आणि त्याच्या साथीदारांना सभागृहाबाहेर पिटाळून लावलं होतं. सुधीरराव मोठ्या कौतुकाने नीलाकडे पाहत होते. इतक्यात मग एका अभ्यासू मुलाने FDI वर  प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

पुढे वाचा 

 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html



 

Saturday, August 8, 2015

वारसदार - भाग २

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html

"आई, हा आमच्या कॉलेजातील सुशांत बरं का! अगदी स्कॉलर मुलगा आहे!" नीला मोठ्या कौतुकाने आईशी सुशांतची ओळख करून देत होती. तिचे बाबा मात्र शांतपणे आपल्या डिशचा आस्वाद घेण्यात दंग होते. "नमस्कार!" सुशांतने हात जोडून नीलाच्या आईला प्रणाम केला. "हिचे वडील थोडे खाष्टच दिसतात!" चिकन लेगचा आस्वाद घेण्यात मग्न असलेल्या तिच्या बाबांकडे नजरेचा कटाक्ष टाकत सुशांत मनातल्या मनात पुटपुटतो इतक्यात "हाऊ आर यु यंग मॅन !" म्हणत त्यांनी त्याला त्यांच्यात सामील होण्याची विनंती केली. "आणि हो त्या दिवशी नीलाला कॉलेजात लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद!" बाबांच्या ह्या मनमोकळ्या बोलण्याने आपण उगाचच ह्यांच्याविषयी मत बनविण्याची घाई करत होतो ह्याचा सुशांतला मनातल्या मनात पश्चात्ताप झाला. 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html 

Tuesday, August 4, 2015

वारसदार - भाग १

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html

 सुधीररावांच्या आक्रस्ताळपणाकडे दुर्लक्ष करून सुशांतने आपला अभ्यास सुरूच ठेवला. "असली पुस्तकं वाचत बसलो असतो तर हा बंगला, ही जमीन कधीच मिळवता आली नसती!" सुधीररावांनी आपला संताप सुरूच ठेवला तसा न राहवून सुशांत म्हणाला, "हवीय कोणाला तुम्हांला तुमची संपत्ती!" त्यांच्या वाक्याने होऊ घातलेला सुधीररावांच्या संतापाचा स्फोट बाहेरून येणाऱ्या SUV च्या दर्शनाने त्यांना आवरता घ्यावा लागला. 

पुढे वाचा …

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html 

 

Thursday, July 23, 2015

वेगवान मार्गिका !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post_24.html

पुन्हा एक रविवार संध्याकाळ, पुन्हा एक वसईहून बोरीवली परतीचा प्रवास! दहिसर चेकनाक्याच्या साधारणतः १ किमी आधीपासूनच वाहनांची कोंडी! मग कोणती मार्गिका पकडायची हा नेहमी सतावणारा प्रश्न ! मध्येच एक उजवीकडे वळायचा सिग्नल येतो. तिथे बऱ्याच वेळा वाहनं खोळंबून राहतात हे अनुभवाने मिळालेलं ज्ञान! त्यामुळे आपण ही मार्गिका टाळायची हे आधीपासून ठरविलेलं! परंतु प्रत्येक वेळी हा अनुभव, हा ज्ञान प्रथमच अनुभवणारा कोणीतरी ह्या मार्गिकेत असतोच आणि मग त्याची आणि त्याची गाडीची नाक खुपसून बाजूच्या मार्गिकेत घुसण्याची धडपड! 


डिस्कवरी वाहिनीवर एक तासाचा कार्यक्रम अशाच संबंधित विषयावर दाखविला गेला होता. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका मोठ्या वाहतूक कोंडीत सापडतो. "पुढे एखादं वाहन बिघडून बंद पडलं असेल किंवा खड्डा पडला असेल!" असेच काही विचार करीत वाहन चालवत राहतो आणि मग ज्या ठिकाणापर्यंत वाहतूककोंडी झाली असेल तिथे पोहोचतो.  आणि पाहतो तर काय अहो आश्चर्यम! 

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post_24.html 

Monday, July 13, 2015

रम्य ते बालपण - ४

 
 
http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post_14.html 

मोठी आईचे माहेर मुळगावचे. तिच्या माहेरून आलेला बाबुराव पण घरी काही काळ होता. हा अगदी रंगात आला की "अपलम चपलम" , "तू गंगा की मौज मै यमुना का धारा!!" अशी ठेवणीतील गाणे गाऊ लागे. मग दिदीच्या नेतृत्वाखाली बच्चेमंडळी त्याची फिरकी घ्यायला सज्ज होत. 


दीपकची मस्ती दिदीला फार खटकायची. एकदा तिचा राग अनावर होऊन तिने त्याला पूर्ण अंगभर बाम चोळला. त्यामुळे कासावीस झालेल्या दीपकला पाहून गुलाबकाकू नाराज झाली होती. 

http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post_14.html  

Saturday, July 4, 2015

रम्य ते बालपण - ३

 

http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post.html 

आमच्या गल्लीत जॉनी अंकल राहतात. माझे वडील भाई, काका दाजी आणि जॉनी अंकल बऱ्याच वेळा ऑफिससाठी एकत्र निघत. जॉनी अंकल हे अनेक विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये निष्णात आहेत. मी त्यांना ८० सालांपासून आमच्या घरी विविध उपकरणे दुरुस्त करताना पाहतो. ते अजूनही जमेल तसे येतात. दाजींकडे एक शंख असायचा. थोड्या दूर घर असलेल्या जॉनी अंकलना बोलावयाचे झाले की मग दाजी ह्या शंखाचा विशिष्ट नाद करीत. मग जॉनी अंकलना हा संदेश मिळून ते घरी येत. 

वसई स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वालीव ह्या गावी आमची शेती होती. पावसाळा आला की तिथे भाताची लागवड केली जात असे. तिथे एक बेडं होतं. तिथे अण्णा, मोठी आई, बाबा (मधल्या क्रमाकांचे काका) ह्या पावसाळ्याच्या काळात बऱ्याच वेळा जाऊन राहत. तिथे विद्युतपुरवठा वगैरे काहीच नसे. त्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहत असे. त्या ओढ्याचे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला सुद्धा वापरलं जात असावं अशी माझी आठवण आहे. शुद्धता ती पण किती!! आज घराच्या बाजूला असलेल्या विहिरीतील पाणी थेट पिताना जीव धास्तावतो. भाई मग रविवारी वगैरे ह्या शेतावर जात.


पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/07/blog-post.html 

Thursday, July 2, 2015

व्यावसायिक संज्ञा !!!

 
http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_25.html

व्यावसायिक जगात कानावर पडणाऱ्या अनेक संज्ञा उपयुक्त असतात. त्यातील काहींचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!!
१> Seat At the Table
व्यावसायिक जगतातील महत्वाचे निर्णय ज्या बैठकीत घेतले जातात त्या बैठकीला उपस्थित राहायला मिळणे हा एक सन्मान आणि महत्वाची जबाबदारी असते.


  • ज्या टीमचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या टीमची सर्व माहिती तुम्हांला असणे आवश्यक असते. 
  • बैठकीतील चर्चा बऱ्याच वेळा अनपेक्षित वळण घेते अशा वेळी आपल्या टीमला न्याय देईल असा निर्णय घेण्याची क्षमता अशा व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. 
  • ह्या व्यक्तीला केवळ आपल्या संघाचेच हित लक्षात घेऊन चालत नाही तर संघटनेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने एखादा निर्णय घेतला जात असेल तर प्रसंगी आपल्या संघाचे हित बाजूला ठेवावं लागतं आणि मग बैठकीनंतर आपल्या संघाला हे पटवून द्यावं लागतं. 


पुढे वाचा 
 

Saturday, June 27, 2015

WELCOME जिंदगी!!

 
http://patil2011.blogspot.in/2015/06/welcome.html 

चित्रपटाची कथा फिरते ती आपल्या आयुष्यातील समस्यांना कंटाळून झोपेच्या गोळ्यांनी आपलं आयुष्य संपवायचा प्रयत्न करणाऱ्या नायिकेभोवती! काही वर्षापूर्वी आई गेली, मग वडिलांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच तरुण असणाऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि आता कळस म्हणून आपलं ज्याच्याशी लग्न केलं त्यानं आपल्याला फसवलं ह्या सर्वाचा परिणाम म्हणून एका कमकुवत क्षणी नायिका हा निर्णय घेते. तिची ही अवस्था पाहतो तो चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, जो तिला घेऊन जातो तो आत्महत्येचा प्रयत्न पूर्ण तयारीनिशी कसा करायचा हे शिकवणाऱ्या संस्थेत ! 

पुढील भाग वाचा!!

http://patil2011.blogspot.in/2015/06/welcome.html 

Saturday, June 20, 2015

ज्युरासिक वर्ल्ड !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html

ज्यात जैवशास्त्रीय बदल घडवून आणून त्याला महाकाय शक्ती प्रदान करण्यात आली आहे असा एक डायनासोर मोकळा सुटतो. त्यामागे सुद्धा त्याची विकसित झालेली बुद्धी असावी असा तर्क करायला वाव असतो. त्या डायनासोरच्या विध्वंसात मग ही मुले सापडतात. पण काही वेळातच आपली सुटका करून घेण्यात यश मिळवतात. प्रेक्षक जितका वेळ लहान मुलं एकटी संकटाचा मुकाबला करत असतात ततोवर जीव कंठाशी आणून चित्रपटाशी एकरूप असतात. पण मग ती मोठ्या माणसांना मिळाल्यानंतर आपल्या मनावरील दडपण आपसूकच कमी होतं. परदेशी सिनेमातील संवाद काळजीपूर्वक ऐकायची आपल्याला सवय विकसित करावी लागते. लहान लहान प्रसंगातून आपल्यासमोर विविध पात्रांच्या व्यक्तिरेखा उलगडत जातात. लहान भावाच्या मनात आपले आई वडील एकमेकांपासून वेगळे होण्याचं असलेलं भय, त्यांच्या आई आणि मावशीच्या संवादातून आपल्यासमोर येणारं त्यांच्या नात्याची झलक वगैरे वगैरे!! मावशीबाई अगदी मोठ्या हुद्द्यावर असतात आणि त्यांचं एक प्रेमपात्र चार गोंडस (?) डायनासोरना प्रशिक्षित करीत असते. ह्या प्रेमपात्राचे आणि मावशीबाईचे काहीसं बिनसलेलं असल्याने ते फक्त व्यावसायिक संबंध राखून असतात. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर कोणत्याही (विवाहित / अविवाहित ) जोडप्यातील संबंध ताणलेलेच असायला हवेत आणि जर ते सुरळीत व्हायला हवे असतील तर एखादी आपत्ती यायला हवी असा काहीसा समज चित्रपट पाहून होऊ शकतो. पण खरे आणि चित्रपटातील जीवन वेगवेगळ असते हे लक्षात असून द्यात!!

पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html 

Friday, June 12, 2015

सुज्ञता !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html

हळूहळू वयाने मोठेपण येत जातं. जर तुमच्यासोबत एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांना लाभतं इतकं सुदैव असेल तर तुम्हांला महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत मुत्सद्दीपणा अंगी बाणवायची गरज भासत नाही. नाही म्हणजे तुम्ही ह्या काळात प्रेमात वगैरे पडलात तर मात्र काहीसा मुत्सद्दीपणा बाणवावा लागतो. एकदा का तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचं लग्न झालं की तुमच्या आयुष्यात अनेक नवीन लोक प्रवेश करतात. शिक्षणाचा कालावधी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेली लोक आणि त्यानंतर आलेली लोक ह्यात एक मुलभूत फरक असतो. पहिल्या टप्प्यातील लोक एकतर लहानपणापासून तुम्हांला ओळखत असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्याशी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नसते. त्यामुळे ह्या टप्प्यात तुम्हांला तुमच्या मुलभूत अवतारात वागणं बऱ्यापैकी शक्य असते. नंतर मात्र आयुष्य क्लिष्ट होतं जातं. कार्यालयात तुम्ही व्यावसायिक यशाच्या शिड्या झपाट्याने चढून जाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या स्पर्धा करीत असता. आपण ज्या कंपनीसाठी काम करतो तिच्या भल्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे समान ध्येय असलं तरी त्यात स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html 

Sunday, June 7, 2015

कालबाह्य !!!

 

आजकाल समाज हा बऱ्याच गोष्टींना फारच झपाट्याने कालबाहय ठरवतोय असे मला वाटत आहेत. हा भ्रम असेल तर किती बरे असे मी वारंवार मनाला समजावत असतो.
काही शालेय संस्था कालबाहय होतांना दिसतात. शालेय शिक्षणाचे माध्यम कालबाहय झाले असावे असा व्यापक समज असतो. पण माध्यमापेक्षा एखाद्या संस्थेची तात्कालीन प्रस्थापित समाजातील मुलांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने त्या कालबाहय होतात. शालेय संस्थातील शिक्षकांचा दर्जा जर काळास सुसंगत असा ठेवला तर संस्था कालबाहय होण्याचे भय बऱ्याच प्रमाणात टळू शकते.  


पुढे वाचा

http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post.html 

Saturday, June 6, 2015

Multitasking

 

http://patil2011.blogspot.in/2015/06/multitasking.html

हल्ली बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान "तुम्ही बरीच कामे एका वेळी सक्षमपणे हाताळू शकता का? " असा प्रश्न विचारला जातो. आणि मग तो होतकरू उमेदवारसुद्धा उत्साहाच्या भरात हो म्हणून जातो. 
Multi-tasking चा नक्की अर्थ काय ह्याचं आपण थोडं विश्लेषण करूयात. सर्वांना समजेल अथवा आवडेल असे गृहिणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून! सकाळी उठून तिच्या डोळ्यासमोर अनेक कामे असतात. स्वतःची, मुलांची तयारी करणे; सर्वांच्या न्याहाऱ्या बनविणे, सर्वांचे डबे बनविणे आणि भरून देणे. ह्यातच घरात कामवाली आल्यास तिला सुचना देणे इत्यादी इत्यादी. हल्ली त्यात whatsapp चे मेसेज बघणे ह्याची भर पडली आहे. 


http://patil2011.blogspot.in/2015/06/multitasking.html 
 

Saturday, May 30, 2015

तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवास!!

 
http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_30.html

चित्रपटाची सुरुवात इंग्लंड मधल्या एका ढगाळ, उदास वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विवाहित जोडप्यांच्या समुपदेशन केंद्रात ! विवाहानंतरच्या चार वर्षात ह्या जोडप्यातील मतभेद पराकोटीला गेले आहेत. हे दोघं आपल्या वैयक्तिक संबंधांची चिरफाड ह्या समुपदेशकासमोर अगदी उघडपणे करताना आढळतात. आपल्या सर्वांना चांगलाच माहित असलेला आणि मी बऱ्याच वेळा मांडलेला मुद्दा! दोन माणसं ती नवरा बायको का असेनात ज्या वेळी सतत एकत्र असतात तेव्हा एकमेकांचे गुण दोष अगदी जवळून दिसतात. पूर्वी पतीला जे परमेश्वराचे रूप दिले जायचे त्यामुळे तो परीक्षणापासून वाचला जायचा. आज असं काही होत नाही, पतीचे थेट परीक्षण होतं अगदी त्याला ८० किलोचं पोतं म्हणेपर्यंत! पती सर्वगुणसंपन्न वा गुणसंपन्न केव्हाच नव्हते. परंतु त्यांना पूर्वी विवाहसंस्थेतील पती ह्या संस्थेचे कवच होते. आज हे कवच नाहीसे झालंय. ह्या प्रसंगात संवाद अगदी उघडपणे, कसलीही भीडभाड न बाळगता बोलले जातात. बहुदा हे आपल्या समाजाने आता पूर्णपणे स्वीकारलं आहे. ह्या पुढे जी आपली नैतिक प्रगती व्हायची ती आजच्या ह्या पातळीला प्रमाण मानून! 

http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_30.html 

Friday, May 29, 2015

वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!

 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html

वसईतील शेतीउद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या 
१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण 
२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
३>  शेतमजुरांची टंचाई 

ह्या तिन्ही समस्यांचा आपण सविस्तरपणे उहापोह करूयात. 

१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण
साधारणतः १९३० - ४० च्या सुमारास वसईतील शेतकऱ्यांकडे दरडोई बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात शेती होती. ह्या शेतीची देखभाल करण्यासाठी म्हणा वा इतर कारणांमुळे ह्या सुमारास कुटुंबाचा आकार सर्वसाधारणपणे मोठा ठेवण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे त्यावेळी शेतीची देखभाल करण्यास जरी घरचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी कालांतराने ह्या सर्वांना शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणे कठीण होऊ लागले. आणि त्यामुळे हळूहळू शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचा कल शेतकरी समाजात दिसून येऊ लागला.
आज बहुतांशी सर्व शेतकरी कुटुंबात तरुण पिढी शेतकी व्यवसायापासून दूर गेली आहे.ह्यातील जे जे लोक आपल्या पर्यायी व्यवसायात यशस्वी झाले त्यांना आपल्या वाट्याच्या शेतीच्या तुकड्यात एक छंद म्हणून काही लागवड करण्याची चैन परवडू शकते. 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html 

Saturday, May 23, 2015

अघटित - भाग २

 
http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_24.html 

"ह्या सर्व देशांच्या क्षमतेची बेरीज करून सुद्धा आपली ह्या उल्केचा नाश करण्याची शक्यता १० टक्क्याच्या वर जाणार नाही!" गिल्बर्ट ह्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच घोषणा केली. त्यांच्या ह्या वाक्याने विल्यम्स ह्यांच्या चर्चेवर भयाची स्पष्ट छटा उमटून गेली. जॉन्सनच्या चेहऱ्यावर मात्र ह्या वाक्याने फारसा काही फरक पडला नाही कारण आधीपासूनच अगदी गंभीर चेहऱ्याने ते ह्या बैठकीत आले होते. अभियान चंदन सक्रिय करण्याचा निर्णय त्यांनी बैठकीपूर्वीच्या काही मिनिटात मनातल्या मनात जवळपास घेतलाच होता. गिल्बर्ट ह्यांच्या ह्या वाक्याने त्यावर केवळ शिक्कामोर्तब झाले होतं. सर्वसाधारण परिस्थितीत अभियान चंदन सक्रिय करण्यासाठी नासा, अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि गुंतवणूकदार ह्यांची संमती घेण्याची एक प्रक्रिया ठरवून देण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया सद्यस्थितीत पाळणे शक्य नव्हते म्हणजे दीडशे लोकांच्या यादीवर एकमत होणे शक्य नव्हते. आणि मग सगळाच गदारोळ माजला असता. मग आता ही यादी ठरवायची तरी कशी हा मोठा गहन प्रश्न होता. नैतिकदृष्ट्या विचार केला तर हा मनुष्यजातीच्या पुढील प्रवासाचा प्रश्न असल्याने सर्व राष्ट्रांतील सर्व वंशाच्या लोकांना ह्या यादीत प्रतिनिधित्व देणे योग्य होते. परंतु पुढील आठवड्याच्या कालावधीत ह्या सर्व लोकांची गुप्तरित्या निवड करून त्यांना उड्डाण स्थळापर्यंत आणणे केवळ अशक्य काम होते. त्यामुळे जॉन्सन ह्यांनी मनातल्या मनात हा पर्याय रद्द करून टाकला. आता त्यांचा मेंदू अतिशय वेगाने काम करू लागला. आपण अभियान चंदन सक्रिय करत आहोत हे ज्यांच्याशिवाय हे अभियान तडीस नेणे शक्य नाही त्या लोकांव्यतिरिक्त कोणालाच कळून न देण्याचं त्यांनी ठरविले. त्याचवेळी ही माहिती ज्या लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यांना कोणत्या तरी पर्यायी मार्गाच्या तयारीत गुंतवून ठेवणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जॉन्सन ह्यांना उल्काविनाश मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. हा मार्ग अगदी गांभीर्याने आपण घेत आहोत असे भासवायचे आणि त्याचवेळी चंदन अभियानामार्फत आपले कुटुंबीय, विश्वासू मित्रमंडळी आणि खासे अमेरिकन ह्यांना त्या ग्रहापर्यंत पोहोचवायची तयारी पूर्ण करायची अशी त्यांची योजना तयारसुद्धा झाली होती.  

http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_24.html 

(क्रमशः)

अघटित - भाग १

 

"सभ्य गृहस्थहो!" राष्ट्राध्यक्षांनी आपल्या धीरगंभीर स्वरात बोलण्यास सुरुवात केली. "ही महाकाय उल्का जर आपण संशोधित केलेल्या मार्गाने आणि अंदाजित वेगाने प्रवास करीत राहिली तर बरोबर १६५ व्या तासाला पृथ्वीवर आदळेल. तिच्या आकाराच्या आणि द्रव्याच्या घनतेचा विचार करता आपली भूमाता ह्या धक्क्यातून वाचण्याची शक्यता शून्य आहे." त्यांचे हे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे शेकडो लोकांचा जमाव नसून केवळ नासाचे अध्यक्ष विल्यम्स आणि अमेरिका सेनाप्रमुख गिल्बर्ट हे दोघेच होते. 

 

Friday, May 15, 2015

Generic Medicine - चर्चासत्र

 

वसईतील जागरूक नागरिक संस्था आणि सुविचार मंच ह्यांच्या विद्यमाने वसईतील बंगली येथील लोकसेवा मंडळ हॉल इथे रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता जेनेरिक मेडिसिन ह्या विषयावर एक परिसंवाद योजण्यात आला होता. ह्या परिसंवादात डॉक्टर, केमिस्ट आणि शासन ह्या तीन महत्वाच्या संस्थांच्या प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. डॉक्टर वर्गाचे प्रतिनिधित्व वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी, केमिस्ट वर्गाचे प्रतिनिधित्व पालघर जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. अनीस शेख ह्यांनी तर शासनाचे प्रतिनिधित्व श्री. गिरीश हुकरे ह्यांनी केलं. ह्या परिसंवादात चर्चिल्या गेलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना ह्या परिसंवादाच्या आरंभी आपले विचार मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सक्रियपणे औषध क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध, पाडल्या जाणाऱ्या चुकीच्या रूढीविषयी आवाज उठविण्याचे आव्हान केले. जर आपण संघटितपणे ह्या विषयी आवाज उठवला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

त्यानंतर डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी आपले विचार मांडले. 
डॉक्टर संयोगिता तवकर
आपल्या डॉक्टरच्या कंपाउंडरने कधीकाळी आपणास जर पुड्यांमध्ये बांधून औषध दिली असतील तर ती आपली जेनेरिक औषधांशी पहिली ओळख. प्रत्येक औषधास तीन प्रकारची नावे असतात असे आपण म्हणू शकतो. 

  • त्या औषधाच्या molecular structure वरून त्याचे पडलेले रासायनिक नाव. 
  • ज्या वेळी एखादे औषध एका विशिष्ट देशातील मानद संस्थेच्या प्रमाणास पात्र ठरते तेव्हा ती संस्था त्या औषधास जे नाव देते त्यास जेनेरिक नाव म्हटले जाते.  
  • ज्या वेळी एखादी कंपनी ह्या औषधाचे पेटंट मिळविते त्यावेळी त्या कंपनीने उत्पादित केलेल्या नावास BRANDED नावाने ओळखले जाते. 
उदाहरण द्यायचे झाले तर क्रोसिन हे एक branded नाव असून PARACETAMOL हे त्याचे जेनेरिक नाव आहे. ह्याचे रासायनिक सूत्र C44H64O24 हे आहे. 
 
ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीत बरीच तफावत आपणास आढळून येते. ह्या मागील कारण -
कंपनीला अचूक रासायनिक सूत्र शोधून काढण्यासाठी बऱ्याच वर्षाचे संशोधन करावे लागते. ह्या संशोधनामध्ये लक्षावधी डॉलर्स खर्च होतात. इतक्या अथक परिश्रमानंतर त्या ब्रैंडेड औषधाच्या जाहिरातीवर सुद्धा बराच पैसा खर्च करावा लागतो. ह्या मुळे ही कंपनी ज्या वेळी आपले उत्पादन विक्रीस काढते त्यावेळी त्याची किंमत बरीच जास्त असते. ह्या सर्व बाबी लक्षात घेता पेटंट मिळालेल्या कंपनीला पुढील काही वर्षे ह्या औषधाच्या उत्पादनाचा अनिभिषिक्त हक्क दिला जातो. 
पेटंटचा कालावधी संपल्यानंतर बाकीच्या कंपन्या ह्या औषधाचे उत्पादन करू शकतात त्यावेळी ती जेनेरिक ह्या नावाने ओळखली जातात. त्यांना संशोधनावर पैसा खर्च करावा न लागल्याने ह्या औषधांच्या किंमती तुलनेने कमी असतात. 
त्यानंतर डॉक्टर संयोगिता ह्यांनी जेनेरिक औषधाची व्याख्या सांगितली. ह्या औषधाचे गुणधर्म हे मूळ औषधाच्या गुणधर्मासारखेच असायला हवेत. FDA चा प्रमाणित करण्याचा निकष हा ब्रैंडेड आणि जेनेरिक ह्या दोन्हीसाठी सारखाच असतो. 
गोरेगाव येथील प्रबोधन औषधपेढी ही जेनेरिक औषधांची विक्री करते. जेनेरिक औषधांचा वापर केल्यास वयस्क माणसांच्या उपचाराचा खर्च जवळजवळ २० टक्क्यावर आल्याचे (८० टक्क्यांनी कमी) आढळून आले आहे.
सध्या अमेरिका जेनेरिक औषधांवर जवळपास ३०० बिलियन डॉलर्स खर्च करते. अमेरिकेच्या FDA ह्या मानद संस्थेने २९० जेनेरिक औषधांचा वापर प्रमाणित केला आहे; त्यातील ११० औषधे नामांकित भारतीय औषध कंपन्या उत्पादित करतात आणि ती मग अमेरिकेत जेनेरिक म्हणून विकली जातात. 
Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मात्र जेनेरिक औषधांचा वापर करताना दक्षता घ्यावी लागते. अशा प्रकारच्या औषधात अगदी तीव्र संहितेचा कमी मात्रेतील डोस दिला जातो. त्यामुळे ह्या औषधांच्या रासायनिक संरचनेत १००% अचूकता अपेक्षित असते. जेनेरिक औषधांना ह्या बाबतीत काही टक्क्यांमध्ये फरक असल्याची मुभा असल्याने हा फरक Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मान्य केला जात नाही. 
 
अनिस शेख (केमिस्ट संघटना अध्यक्ष)
 
अमीर खान ह्यांच्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमाने जेनेरिक औषधाविषयी जागृती निर्माण केली. आपल्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये औषधे मिळावी असाच केमिस्ट लोकांचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. भारतातील औषध कायद्यानुसार डॉक्टरांनी लिहून दिलेलेच औषध देणे केमिस्टवर बंधनकारक असते. त्यामुळे आम्हांवर सुद्धा मर्यादा येतात. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचा आता फॅमिली फार्मासिस्ट (Pharmacist) असायला हवा जो आपणास योग्य जेनेरिक औषध सुचित करू शकेल. जेनेरिक औषधांच्या वापराने सामान्य नागरिकाचा उपचारांवरील खर्च नक्कीच कमी होईल. 
 
गिरीष हुकरे 
 
आपणांपैकी कितीजणांस अन्न आणि औषध प्रशासनाविषयी माहित आहे असा प्रश्न विचारून त्यांनी आपल्या भाषणांची सुरुवात केली. दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टींच्या दर्जाची जबाबदारी माझी / माझ्या गटाची आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे उलटून गेली तरी दुसऱ्यास दोष देण्याचा खेळ आपण खेळत आहोत. आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा ताबा घेतला पाहिजे. त्यासाठी सम्यक विचारांचा आपणास आधार घ्यावा लागेल. भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जात. जगातील १० टक्के औषधे भारतात उत्पादित होतात. IT क्षेत्रानंतर परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमाकांचे क्षेत्र आहे. ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीतील तफावतीबाबत बोलताना डॉक्टर संयोगिता ह्यांनी सांगितलेल्या कारणांबरोबरच मेडिकल प्रतिनिधी, डॉक्टरांना पुरस्कृत केल्या जाणाऱ्या विविध सवलती ह्या खर्चाचा सुद्धा ब्रैंडेडऔषधांच्या किमती वाढीस लागण्यास हातभार लागतो. ६५% भारतीय औषधांच्या उच्च किंमतींमुळे उपचारांपासून वंचित राहतात. औषधउपचारांवरील खर्च हे भारतीय लोक कर्जबाजारी होण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतीय लोक भावनिक असतात, उपचारासाठी सोने, शेतजमीन वगैरे गहाण टाकण्याची आपली मनोवृत्ती असते. भारतात आरोग्यविमा ही संकल्पना अजूनही फारशी प्रचलित नाही त्यामुळे ७९% टक्के भारतीय हे उपचारांचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. केमिस्ट लोक ब्रैंडेडऔषधांच्या विक्रीतून जो फायदा कमावतात त्यातील काही हिस्सा त्यांनी सामान्य लोकांसोबत विभागून घ्यायला हवा. कोणत्याही उपचारपद्धतीत तीन D महत्त्वाचे आहेत ते म्हणजे Doctor, Diagnostic and Drug. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांची जेनेरिक औषधांविषयीची जाणीव वाढविण्याचे आव्हान केले. केवळ जेनेरिक औषधे कमी किंमतीत मिळतात म्हणून ती कमी दर्जाची आहेत असे समजू नकात. बऱ्याच वेळा ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधे एकाच ठिकाणी उत्पादित होतात पण ती रुग्णांपर्यंत दोन वेगळ्या मार्गांनी पोहोचतात. केवळ केमिस्टने डॉक्टरने सूचित केलेल्या औषधापेक्षा दुसरे औषध दिले म्हणून त्यावर कारवाई केली जात नाही; बऱ्याच वेळा रुग्णास चुकीच्या औषधामुळे झालेला त्रास हा ह्या कारवाईमागचा मुख्य घटक असतो. काही चुकीचं घडलं म्हणून रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी  डॉक्टरांविरुद्ध प्रक्षोभक प्रतिक्रिया देण्याचे टाळावे असे आव्हान त्यांनी केलं. 
 
 
 
प्रश्नोत्तरे 
 
१> मी तुम्हांला ब्रैंडेड औषध लिहून दिलं आहे. जर तुम्हांला जेनेरिक औषध घ्यायचं असेल तर ते तुमच्या जोखमीवर घ्या असे डॉक्टरनी सांगितल्यास काय करावे?

उत्तर - ह्या मागे बऱ्याच वेळा डॉक्टरचे अज्ञान असू शकते. आजच्या परिसंवादासारखा परिसंवाद डॉक्टर वर्गासाठी सुद्धा आयोजित केला जावा असे आव्हान डॉक्टर संयोगिता ह्यांनी केले. 
 
२> ब्रैंडेडऔषधाचा पुरस्कार करण्यामागे डॉक्टरांचा आर्थिक फायदा हे कारण असू शकते काय? (काहीसा नाजूक प्रश्न)
 
उत्तर - ही शक्यता कमी असते. जेनेरिक औषधाच्या उपलब्धतेविषयी डॉक्टरचे अज्ञान हा बराच वेळा मुख्य घटक असतो. 
 
डॉक्टर आणि रुग्ण ह्यांच्यातील सुसंवाद, विश्वास हा मुख्य घटक आहे जो जेनेरिक औषधांच्या वापरास चालना देऊ शकेल. आपले prescription स्वतःहून नुतनीकरण करण्याची जी वृत्ती असते तिचा जनतेने त्याग करावा. मेडिकल दुकानात prescription  शिवाय जाऊन केवळ आपल्या ज्ञानाच्या जोरावर औषधे घेणे टाळावे. ह्या सर्व गोष्टीवर अन्न आणि प्रशासन विभाग लक्ष ठेऊ शकत नाही. 
 
काही वेळा रुग्ण डॉक्टरची फी द्यायच्या परिस्थितीत नसतो. अशा वेळी त्यांना आम्ही Over The Counter  औषधे देतो असे शेख म्हणाले.  
 
खरेतर औषधे ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच विकली जावीत. जनतेने इन्स्पेक्टरची भूमिका बजावत दुकानात फार्मासिस्ट कोठे आहे असा प्रश्न विचारावा. ज्याचा फोटो दुकानात फार्मासिस्टलावला आहे तो आणि विक्री करणारा हे दोघेही सारखे असल्याची पडताळणी करून घ्यावी. आपणास प्रश्न विचारायला शिकायला हवे असे श्री. हुकरे म्हणाले. 
 
३> सध्या भ्रमणध्वनीवर एक नवीन अँप विकसित करण्यात आले आहे. अन्न आणि प्रशासन विभागाची त्यास मान्यता आहे काय?
उत्तर - ह्याला कायदेशीर मान्यता द्यायचा सध्यातरी विचार नाही. स्पेलिंग लिहिण्यात रुग्णाने केलेली चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून औषध घेऊ नये. 
 
४> Bio availability and Bio equivalence - ह्या विषयीचे भारतातील स्थिती काय आहे?
उत्तर - भारतात ह्या विषयावर संशोधन सुरु आहे. 
 
५>  ब्रैंडेडऔषधे MRP लाच का विकली जातात? त्यावर सूट का मिळत नाही?
 
उत्तर - केमिस्ट वर्गाला ब्रैंडेडऔषधाच्या विक्रीतून भरमसाट फायदा मिळतो हा गैरसमज आहे. केमिस्ट वर्गाला १६ - २०% टक्के फायदा मिळतो. बाकीचा खर्च वगळल्यास हे प्रमाण अगदी नगण्य राहते. फायद्याचा मोठा हिस्सा उत्पादन करणारी कंपनी घेते आणि म्हणून सूट देणे केमिस्टला परवडत नाही 
 
चिन्मयने वसईतील एका इंग्लंडहून शिकून आलेल्या आणि तिथे सराव केलेल्या डॉक्टरचा अनुभव सांगितला. १९६० - ७० च्या सुमारास अगदी प्रभावी असलेल्या औषधाचे कालांतराने जेनेरिक रूप बाजारात आले आणि मग ह्या औषधाची प्रभावितता इतकी कमी झाली की हल्ली ते बाजारात कोणास ठाऊक सुद्धा नाही. ह्या अनुभवावर आपली प्रतिक्रिया देताना तज्ञांनी अनेक औषध कंपन्याचे फुटलेले पेव हे ह्या मागचं कारण असू शकतं असं प्रतिपादन केले. नामांकित औषध कंपन्या अजूनही चांगली उत्पादने निर्मित करीत असल्याचा अनुभव आहे. 
 
६> Anti Biotics (बहुदा प्रतिजैविक हा मराठी शब्द) औषधांचा प्रभावीपणा कालांतराने कमी होत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांना २० वर्षाचे वगैरे पेटंट देणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न करण्यात आला. 
 
बाकी शेवटी मग तज्ञांनी काही साध्या पण महत्वाच्या सूचना केल्या. आपले आजार डॉक्टरपासून लपून ठेवू नयेत. चुकीचे औषध स्वतःहून घेतल्यास त्याचे भयंकर दुष्परिणाम होतात त्यामुळे ते टाळावे. आपल्याला ताप वगैरे आल्यास त्याच्या वेळेनुसार नोंदी ठेवाव्यात; योग्य औषध लिहून द्यायला डॉक्टरला मदत होते. औषधांची वैधता कितीपर्यंत आहे हे नक्की पाहावे. चिन्मयने वसईतील डॉक्टरना prescription कसे द्यावे ह्यासाठी एक standard form तयार केला गेला असल्याची घोषणा करून डॉक्टरांना तो वापरण्याची विनंती केली. 
 
शेवटी आभारप्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.