Tuesday, January 27, 2015

आप यूँ फासलों से ...

 
http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post_28.html 


आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही 


दूर कोठून तरी तू असाच जात होतास, पण माझ्या हृदयात मात्र तुझ्या पावलांचे नाद घुमत राहिले.  

आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही


केवळ तुझ्या चाहुलीने अंधारात आशेचे किरण चमकत राहिले. अशा अनेक रात्री आल्या आणि निघून गेल्या!

पुढे वाचा

http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post_28.html
 

Saturday, January 17, 2015

व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!!

 
मध्यंतरी एका लग्नाच्या मांडवात एक परिचित व्यक्ती भेटली .  "तू या प्रसंगाला दिसला नाहीस .तु त्या ठिकाणी उशिरा आलास. "  अशी तिने नेहमी प्रमाणे माझी हजेरी घेतली. मी काहीतरी बहाणा काढून वेळ मारून नेली.  
काही वेळानंतर ही व्यक्ती एका घोळक्यात बसली होती. ह्या सर्वजणी मांडवातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण करण्यात आणि त्या व्यक्तीवर टिपणी करण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांचे खास लक्ष नवीन पिढीतील लोकांकडे विशेषतः नुकत्याच संसारात पडलेल्या मुलींकडे होते. उपलब्ध माहिती आधारे त्या ह्या सर्वांविषयीची आपली मते अगदी मोकळ्या मनाने मांडत होत्या.
 
http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post_18.html

Saturday, January 10, 2015

अलिप्ततावाद!!

 

मागील शनिवारी विक्रम गोखले ह्यांचं चतुरंग मधील सदर वाचलं. आपल्या वडिलांनी आपल्याला जीवनातील तत्त्वज्ञानाचे धडे कसे दिले हे त्यांनी अगदी सुंदरपणे मांडलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. "पन्नाशीच्या आसपास केव्हातरी अलिप्ततावाद लक्षात आलेला एक पुरुष आहे!" 
ह्या वाक्याने मनात आलेले हे विचार! विक्रम गोखले ह्यांना ह्यातील कोणता अलिप्ततावाद अभिप्रेत होता ह्यावर भाष्य करण्याचं धाडस मी करणार नाही.
लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीत अगदी रस घेत असतो. ह्या नाविन्यपूर्ण जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकण्याची उमेद आपण बाळगून असतो. हळूहळू आपण आयुष्यातील अनुभवाला सामोरे जाऊ लागतो. काही सुखदायक तर काही कटू! प्रत्येकाची हे अनुभव पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना पहिल्या काही कटू अनुभवांतच वैराग्य येतं तर काहीजण संकटाचे, दुःखाचे पहाड पेलून सुद्धा आयुष्यातील उत्साह राखून असतात. 


http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post_10.html 

Sunday, January 4, 2015

नववर्षचिंतन !

 
नवीन वर्षाचा काळ एक मैलाचा दगड असतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरलं. विविध लोक आयुष्याच्या विविध टप्प्यात एकंदरीत आयुष्याची दिशा आणि मार्ग ठरून गेला आहे हे मानतात. निवडलेला नोकरी - व्यवसाय, विवाह हे घटक ह्यात विशेष हातभार लावतात. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत; पण आपल्यातीलच काही लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ह्या विश्वाच्या, पृथ्वीच्या, मानवी जीवनाच्या अगाध पैलुंमधील जमतील तितकी रहस्य उलगडून पाहण्याच्या प्रयत्नात असतात. नवीन वर्षाच्या क्षणी मग मानवाने आखलेल्या पुढील टप्प्यातील म्हणजेच पुढील वर्षातील आपल्याला जमण्यासारखी उद्दिष्टे ठरवतात. 

पुढे वाचा!

http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post.html 

१> शांत राहण्याची सीमा विस्तारित करायचा प्रयत्न करणे. वर्षात अनेक प्रसंग असे येतात जे तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. त्या क्षणानंतर चांगली वाट आपल्यापुढे येईल असा विश्वास मनात बाळगणे आणि ही शांत राहण्याची आपली क्षमता अधिक सक्षम करणे.