Friday, May 29, 2015

वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!

 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html

वसईतील शेतीउद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या 
१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण 
२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
३>  शेतमजुरांची टंचाई 

ह्या तिन्ही समस्यांचा आपण सविस्तरपणे उहापोह करूयात. 

१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण
साधारणतः १९३० - ४० च्या सुमारास वसईतील शेतकऱ्यांकडे दरडोई बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात शेती होती. ह्या शेतीची देखभाल करण्यासाठी म्हणा वा इतर कारणांमुळे ह्या सुमारास कुटुंबाचा आकार सर्वसाधारणपणे मोठा ठेवण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे त्यावेळी शेतीची देखभाल करण्यास जरी घरचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी कालांतराने ह्या सर्वांना शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणे कठीण होऊ लागले. आणि त्यामुळे हळूहळू शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचा कल शेतकरी समाजात दिसून येऊ लागला.
आज बहुतांशी सर्व शेतकरी कुटुंबात तरुण पिढी शेतकी व्यवसायापासून दूर गेली आहे.ह्यातील जे जे लोक आपल्या पर्यायी व्यवसायात यशस्वी झाले त्यांना आपल्या वाट्याच्या शेतीच्या तुकड्यात एक छंद म्हणून काही लागवड करण्याची चैन परवडू शकते. 


http://patil2011.blogspot.in/2015/05/blog-post_26.html 

No comments:

Post a Comment