Saturday, November 28, 2015

व्यावसायिक मनाचा वेध!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_28.html

व्यावसायिक जीवनात यशस्वी होणाऱ्या किंबहुना वरिष्ठ पदे भूषविणाऱ्या लोकांसाठी स्वतःविषयीची स्वतःच्या मनात असणारी प्रतिमा उंचावर असणे आवश्यक असते. जितकं क्षेत्र अधिक क्लिष्ट तितकी ही गरज जास्त असते. 

आता ह्याविषयी कारण काय असावं ? कोणी उघडपणे ही बाब चर्चित नसलं तरी प्रत्येक थरावर असणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या लगेचच असणाऱ्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही थरावरील माणसांची तुलना होत असते. म्हणजे हा आपल्या बॉसची जागा घेऊ शकेल काय किंवा ह्याची जागा ह्याच्याखालचा कर्मचारी घेऊ शकेल काय वगैरे वगैरे. ही तुलना केवळ वर्षाअखेरीस होणाऱ्या मुल्यमापनाच्या वेळीच होत नाही तर दररोज कार्यालयात होणाऱ्या मिटींग्स, ह्या माणसाने दिलेल्या भाषण आणि ई - मेल ह्यामधून प्रकट होणारं त्याचं ज्ञान, लोकांना सांभाळून घेण्याची त्याची / तिची वृत्ती ह्या सगळ्या घटकांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोंद ह्या व्यावसायिकाचे केवळ बॉसच नव्हे तर एकंदरीत सर्व कर्मचारी घेत असतात. कळत नकळत ह्या व्यावसायिकाची एक प्रतिमा निर्माण झालेली असते जी निर्माण करण्यात त्या व्यावसायिकाच्या दैनंदिन वर्तणुकीचा मोठा वाटा असतो.

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_28.html 

अश्रू - वि. स. खांडेकर

 

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_21.html

पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post_21.html 

 

हूल - भालचंद्र नेमाडे

 
 http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html


पुस्तकाची कथा चांगदेव ह्या नायकाभोवती फिरते. पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक बनलेला चांगदेव मुंबईतील जीवनाला कंटाळून एका गावातील कॉलेजात नोकरी स्वीकारतो. ह्यात बराच आदर्शवाद असतो. आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे, आपल्याकडे योग्य ते शिक्षण आहे तर मग आपण ह्या देशात कोठेही नोकरी करू शकतो हा तो आदर्शवाद! अडीचशे रुपये पगार - पगार मिळविण्यासाठी सर्व काही सहन करावी लागण्याची मनोवृत्तीअधूनमधून चांगदेवाला मनाला लागून राहत असते. पगार कितीही वाढला तरी हल्लीच्या युगातसुद्धा आपल्या सर्वांना हीच भावना सलत असते ही मात्र खरी गोष्ट!  

सुरुवातीलाच ह्या आदर्शवादाला तडा देणाऱ्या घटना घडत जातात. लेक्चरच्या वेळापत्रकाची आखणी करताना पर्यवेक्षक स्वतःसाठी आणि स्त्री प्राध्यापकांसाठी सोयीच्या वेळा आखून घेतो तर चांगदेवला सकाळचे पहिली आणि सायंकाळची सर्वात शेवटची तासिका देण्यात येते. एखाद्या विषयासाठी पुस्तके लावताना सुद्धा खास ओळखीतील प्राध्यापकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात. बदमाश मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्गावरील तासिका चांगदेवला दिल्या जातात. मुलांना मार्क्स मिळायला सोपे जावे म्हणून नोट्स देण्यास चांगदेवचा तत्वतः विरोध असतो. वर्गात फारच थोडी मुले अशी असतात ज्यांना शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात रस असतो. बाकीची सर्व मुले वर्गात प्रचंड गोंधळ करीत असतात.

http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html