Sunday, March 13, 2011

आत्मकेंद्रित


आताच एक फेसबुकवर स्टेटस वाचले
प्रत्येकजण आत्मकेंद्रित असतो
फक्त वर्तुळाच्या त्रिज्या मात्र बदलत असतात!

अप्रतिम, लाजबाब
आपण आपल्या कळत नकळत आपल्याभोवती एक आपल्या सुखकारक वातावरणाचे वर्तुळ आखून घेतो. त्या आरामदायीपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यक्ती, समारंभ, स्थळ यांनाच ह्या वर्तुळात प्रवेश असतो. जसजसा माणुस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत जातो तसतसा तो ह्या वर्तुळाच्या निवडीविषयी एकदम चोखंदळ होत जातो. काही माणसे मात्र आपली त्रिज्या फार मोठी आखतात, वसुधैव कुटुम्बकम् अशीच त्यांची धारणा असते. आजकाल अशी निस्वार्थी माणसे मिळणे जरा दुर्मिळच झाले आहे.

हीच कल्पना पुढे नेत असा विचार करूया की दैनंदिन जीवन प्रत्येकजण आपले हे वर्तुळ घेवून फिरत असतो. ज्या ज्या वेळी व्यक्तीच्या ह्या वर्तुळात एखाद्या आगन्तुकाचे आगमन होते त्यावेळी संघर्ष निर्माण होतो! बाकी फेसबुकाचे मात्र बरे आहे, आपले वर्तुळही आपणच आखायचे आणि या वर्तुळातील कोणी मनाजोगता वागला नाही तर त्याला unfriend करून टाकायचे!

No comments:

Post a Comment