Sunday, October 12, 2014

दुरावा - ८

 
 रात्रभर इवाच्या डोळ्याला डोळा लागला नाही.  म्हटलं तर चूक तिचीच होती. सर्जीप्रकरण इतकं पुढं गेलं असता तिनं आईला थोडीतरी कल्पना देऊन ठेवावयास हवी होती. आईचं काय? गावात बसून शहरात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही करणार तर मग ती आई कसली? आणि मग तिने आपल्या पद्धतीने आंद्रेई आणि इवाची ओळख करून द्यायचा घाट घातला होता. पहाटेच्या सुमारास इवाला कशीबशी झोप लागली. स्वप्नात सर्जी यावा आणि त्याने असेच आपल्याला उचलून न्यावे अशी तिची फार इच्छा झाली होती. अगदी सर्जीच्या अरसिकपणाला पूर्ण स्वीकारायची तिची आज तयारी होती.
अचानक बाहेरच्या दरवाज्यावरील जोरदार खटखटाने तिची झोप मोडली गेली. खोलीतील घड्याळाकडे तिचे लक्ष गेलं. केवळ सात वाजले होते. "इतक्या सकाळ सकाळी कोण आलं" असा विचार इवाच्या मनात आला. तिने हळूच कानोसा घेतला. आंद्रेई आणि आईचं बोलणं चाललं होतं. आंद्रेईने त्याच्या शेतावर ह्या तिघांना बोलावलं होतं. २० किमी अंतरावर त्याचं गव्हाचं फार मोठं शेत होतं. काही मिनिटात तो निघून गेला. बहुदा त्याला आईने नकार दिला असावा असं समजून इवाला हायसं वाटलं. आणि तिने डोक्यावरून जाडी घोंगडी ओढून घेतली. दोन तीन मिनिटात तिला खोलीत पावलांचा आवाज आला. तरीही तिनं घोंगडी डोक्यावरून बाजूला केली नाही. मग एक मिनिटाने वगैरे "इवा" अशी तिच्या वडिलांची हाक तिच्या कानी आली. वडील आपल्या खोलीत आले हे जाणवताच इवा पटकन उठून बसली. "झोप लागली का पोरी!" वडिलांच्या ह्या प्रेमळ स्वराने तिला अगदी लहानपणाची आठवण झाली. "हो लागली!" वडिलांना बरं वाटावं म्हणून तिने बळेबळे खोटंच उत्तर दिलं. एव्हाना आईचं सुद्धा खोलीत आगमन झालं होतं.

पुढे वाचा …


http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_12.html

 

No comments:

Post a Comment