Friday, April 10, 2015

मन मोकळं!

 
http://patil2011.blogspot.in/2015/04/blog-post_11.html 

अनोखी रात्र कथा संपली! संपली एकदाची असं वाचणाऱ्या बहुतेक सर्वांनी म्हटलं असणार! कायच्या काय पकवतो हा असे ही काहीच्या मनात आलं असणार. आणि खरं तर एकाने प्रतिक्रिया लिहून कळवलं सुद्धा तसं! पण निनावी राहून त्याने / तिने  प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला म्हणून ती प्रतिक्रिया मी प्रसिद्ध केली नाही. मग पुढचे भाग कृपया लिहू नका (बहुदा तिसऱ्या भागानंतर) असा सल्ला द्यायला तो अथवा ती विसरला /ली नाही. मी हल्ली प्रत्येक पोस्टविषयी जास्त भावुक व्हायचं टाळतो त्यामुळे ही प्रतिक्रिया तसं पाहिलं तर मला आवडली! 

मी पूर्वी स्वतःला बराच आदर्शवादी मानत असे. आत्मपरीक्षणाची प्रक्रिया कार्यालयात सुरु होत मग ती वैयक्तिक जीवनात येऊन पोहोचली. आदर्शवादाची मानलेली बरीचशी पुटं(असा शब्द आहे का नाही ह्याविषयी काहीशी साशंकता!) गळून पडली. आत्मपरीक्षण करावं की नाही, केल्यास ते कितपत करावं? आत्मपरीक्षणाने आत्मसन्मान प्रत्येक वेळी गळून पडावाच का? हे माझ्या मनात घोळत असलेले सध्याचे काही प्रश्न!   

http://patil2011.blogspot.in/2015/04/blog-post_11.html


 

No comments:

Post a Comment