Saturday, April 24, 2010

जगू आनंदाने

जगू आनंदाने
२६ जानेवारीला आपल्या १९८८ च्या ब्याच च स्नेहसंमेलन झालं आणि दरवर्षी एकत्र जमण्यासाठी हि तारीख नक्कीही झाली. पण हे काय वर्षातून फक्त एकदाच भेटायचं? पण त्यासाठीच तर आपल्या ब्याच च्या मुलांनी (?) आपल्याला अधून मधून एकत्र आणण्यासाठी हा स्कूल ब्लॉग तयार केला. आदित्य नेहमी लिहितो . मीही खूप दिवसांपासून लिहूया अस ठरवत होते. पण मुलीची परीक्षा, काम ह्या मूळे राहून जायचं . खरच किती escuses घेत असतो आपण हे जाणवल आणि लिहायला घेतलं.
स्नेहसंमेलनाला लहान मुलांमधील ताण-तणाव यावर दोन शब्द बोलले. चार दिवसांपूर्वी पेपरात एक बातमी वाचली. ठाण्यातील IPH (Institute of Psychological Health) मध्ये counciler च काम करणार्र्या कविताने केलेल्या आत्महत्येविषयी. वाचून मन उद्विग्न झाल . शेवटी ताण-तणाव कोणालाच चुकले नाहीत हेच खर. अगदी दुसर्याना मार्गदर्शन करणाया सल्लागारांना सुद्धा. पण त्यावर जीव देण हा पर्याय असू शकतो ? मला नाही पटत. थोडसं बोट भाजलं तरी आपण हात चटकन मागे घेतो. मग मनाची अशी कोणती अवस्था असते जी आपल्याला जीव द्यायला भाग पाडते. एवढ टोकच frustration असताना त्यावर वेळीच औषधोपचार का केला जात नाही. याच एक कारण हे असू शकत कि मानसोपचारतज्ञाकडे फक्त वेडी माणस जातात हि लोकांची असलेली मानसिकता . जर Heart truble असेल तर लोक डॉक्टरांकडे जातात .पण मानसिक तणावासाठी लोक डॉक्टरांकडे जाण टाळतात . अशा extreme तणावासाठी औषधोपचार घ्यायला डॉक्टरांकडे जरूर जाव मनात इच्छा बाळगूनच कि ह्या तणावातून लवकर बाहेर पडेन आणि फारसं औषधांवर अवलंबून न राहता चांगल आयुष्य जगेन. शेवटी आपण किती मोठ आयुष्य जगतो त्यापेक्षा आपण ते किती चांगल आणि आनंदाने जगतो याला मी फार महत्व देते .हे सर्व झालं मोठ्या समस्यांविषयी. पण काही जणांना अडचणींचा फार बाऊ करायची सवयच असते. ते सतत अडचणीचा पाढाच वाचत असतात. छोट्या-छोट्या प्रश्नांनी गांजलेले असतात. त्यांना सांगावस वाटत छोट्या गोष्टीच काय टेन्शन घ्यायचं. देव आहेन आपली काळजी घायला. एक चांगली श्रद्धा मनाशी बाळगावी. Three ideats चित्रपटात आमीर खान ने all is well हा सांगितलेला मंत्र कित्ती छान आहे
tenstion free आयुष्य जगायला.

1 comment: