Monday, April 26, 2010

जिव्हाळ्याचे बेट

आत्महत्या आणि मानसोपचारतज्ञ याविषयी आज बोलूया. कोणीही आत्महत्येसारखी टोकाची भूमिका अचानक घेत नाही. सुरुवात ही सदैव नैराश्येने होते.

आपण आत्महत्येच्या कारणांचे विविध प्रकार बघूया
१. क्षणिक संताप - अति सवेन्दनशील अथवा अति तापट व्यक्ती क्षणिक संतापाच्या भरात ही कृती करू शकतात. परंतु या व्यक्तीदेखील आपल्या आधीच्या वागण्यातून हे संदेश देत असतात.
क्षणिक रागात अति सवेन्दनशील व्यक्ती ह्या फक्त स्वतःला संपवितात तर अति तापट व्यक्ती या स्वतःबरोबर क्षणिक रागाच्या कारणाला देखील संपवितात. अशा व्यक्ती ओळखणे आणि त्यांच्याभोवातालची परिस्थिती स्फोटक होऊ न देणे ही त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रपरिवाराची जबाबदारी आहे.

२. दीर्घकालीन कारणे
अ> आजार
ब> आर्थिक समस्या
क> घरातील, कार्यालयातील अथवा सार्वजनिक जीवनात होणारा छळ
ड> एक दुजे के लिये

यातील कारण ड हे सर्वसामान्य जनतेच्या पलीकडचे आहे! आपण प्रकार २ मधील बाकी सर्व कारणांचा उहापोह करूया.
प्रत्यक्ष दुःखापेक्षा त्याचा विचार हा अधिक क्लेशदायी असतो. मानसोपचार तज्ञ आपली दुखी परिस्थिती तर बदलू शकत नाही, तो आपल्याला या दुखी विचारांवर नियंत्रण मिळविण्यास शिकवतो.

मनाचे विकार आणि शरीराचे विकार याची तुलना होऊ शकते. शरीरात विषारी द्रव्य जमा झाली कि आपणास शारीरिक विकार होतात. हीच द्रव्य जर वेळच्या वेळी बाहेर फेकली गेली तर व्यक्ती निरोगी राहते. हेच आपल्या मनाचे आहे. आपल्या मनातील वैफल्य, नैराश्य हे नियमित पणे आपण दुसर्यांबरोबर चर्चिली तर त्यांची तीव्रता कमी होते. माझे तर असे मत आहे कि जगात सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकास काहीना काही दुःख आहे. मी एकटाच दुःखी नाही, माझ्याबरोबर बाकीचेही आहेत हे एकदा जाणवले कि त्या दुखाची तीव्रता कमी होते. आता आपल्या सुख दुःखाची चर्चा करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जिव्हाळ्याची बेटे निर्माण करणे. आपला मित्रपरिवार हे जिव्हाळ्याचे बेट होऊ शकते. आपल्या परिवाराशी सुसंवाद साधून आपण हेच साधू शकतो.

मानसोपचार तज्ञ हा शेवटचा उपाय आहे. त्याआधी सुद्धा उपाय आहेत आणि ते आपल्याच आजूबाजूला सहजपणे उपलब्ध आहेत. गरज आहे ती डोळे उघडे ठेवून बघण्याची आणि आजू बाजूला आपणच उभारलेल्या भिंती पाडण्याची!

1 comment: