Sunday, January 27, 2013

बुद्धिभेद



हल्ली सर्वसामान्य लोकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्यात माझाही समावेश आहे. विषय बर्याच वेळा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, प्रदूषण, लग्नातील नातेसंबंध ह्याविषयी फिरताना आढळतात. पण प्रत्यक्ष कृती शून्य! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील विषय हे राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीऐवजी ह्या विषयांभोवतीच घुटमळताना दिसतात. वर्तमानपत्र आणि केबल वाहिन्या ह्यांवरील ह्या समस्यांचे चित्रण थोड्या थोड्या कालावधीने फिरत असते. एक महिना भ्रष्टाचार मग प्रदूषण मग स्त्रियांवरील अत्याचार असे हे चक्र फिरत असते. त्यात आपण मध्यमवर्गीय गुरफटून जातो पुन्हा नवीन विषयाकडे आपले लक्ष वेधले जाते. मूळ समस्या तशाच राहतात. कोणीतरी चाणक्य बसला आहे तिथे आपला बुद्धिभेद करायला

 

No comments:

Post a Comment