Saturday, June 27, 2015

WELCOME जिंदगी!!

 
http://patil2011.blogspot.in/2015/06/welcome.html 

चित्रपटाची कथा फिरते ती आपल्या आयुष्यातील समस्यांना कंटाळून झोपेच्या गोळ्यांनी आपलं आयुष्य संपवायचा प्रयत्न करणाऱ्या नायिकेभोवती! काही वर्षापूर्वी आई गेली, मग वडिलांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच तरुण असणाऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि आता कळस म्हणून आपलं ज्याच्याशी लग्न केलं त्यानं आपल्याला फसवलं ह्या सर्वाचा परिणाम म्हणून एका कमकुवत क्षणी नायिका हा निर्णय घेते. तिची ही अवस्था पाहतो तो चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, जो तिला घेऊन जातो तो आत्महत्येचा प्रयत्न पूर्ण तयारीनिशी कसा करायचा हे शिकवणाऱ्या संस्थेत ! 

पुढील भाग वाचा!!

http://patil2011.blogspot.in/2015/06/welcome.html 

Saturday, June 20, 2015

ज्युरासिक वर्ल्ड !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html

ज्यात जैवशास्त्रीय बदल घडवून आणून त्याला महाकाय शक्ती प्रदान करण्यात आली आहे असा एक डायनासोर मोकळा सुटतो. त्यामागे सुद्धा त्याची विकसित झालेली बुद्धी असावी असा तर्क करायला वाव असतो. त्या डायनासोरच्या विध्वंसात मग ही मुले सापडतात. पण काही वेळातच आपली सुटका करून घेण्यात यश मिळवतात. प्रेक्षक जितका वेळ लहान मुलं एकटी संकटाचा मुकाबला करत असतात ततोवर जीव कंठाशी आणून चित्रपटाशी एकरूप असतात. पण मग ती मोठ्या माणसांना मिळाल्यानंतर आपल्या मनावरील दडपण आपसूकच कमी होतं. परदेशी सिनेमातील संवाद काळजीपूर्वक ऐकायची आपल्याला सवय विकसित करावी लागते. लहान लहान प्रसंगातून आपल्यासमोर विविध पात्रांच्या व्यक्तिरेखा उलगडत जातात. लहान भावाच्या मनात आपले आई वडील एकमेकांपासून वेगळे होण्याचं असलेलं भय, त्यांच्या आई आणि मावशीच्या संवादातून आपल्यासमोर येणारं त्यांच्या नात्याची झलक वगैरे वगैरे!! मावशीबाई अगदी मोठ्या हुद्द्यावर असतात आणि त्यांचं एक प्रेमपात्र चार गोंडस (?) डायनासोरना प्रशिक्षित करीत असते. ह्या प्रेमपात्राचे आणि मावशीबाईचे काहीसं बिनसलेलं असल्याने ते फक्त व्यावसायिक संबंध राखून असतात. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर कोणत्याही (विवाहित / अविवाहित ) जोडप्यातील संबंध ताणलेलेच असायला हवेत आणि जर ते सुरळीत व्हायला हवे असतील तर एखादी आपत्ती यायला हवी असा काहीसा समज चित्रपट पाहून होऊ शकतो. पण खरे आणि चित्रपटातील जीवन वेगवेगळ असते हे लक्षात असून द्यात!!

पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html 

Friday, June 12, 2015

सुज्ञता !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html

हळूहळू वयाने मोठेपण येत जातं. जर तुमच्यासोबत एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांना लाभतं इतकं सुदैव असेल तर तुम्हांला महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत मुत्सद्दीपणा अंगी बाणवायची गरज भासत नाही. नाही म्हणजे तुम्ही ह्या काळात प्रेमात वगैरे पडलात तर मात्र काहीसा मुत्सद्दीपणा बाणवावा लागतो. एकदा का तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचं लग्न झालं की तुमच्या आयुष्यात अनेक नवीन लोक प्रवेश करतात. शिक्षणाचा कालावधी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेली लोक आणि त्यानंतर आलेली लोक ह्यात एक मुलभूत फरक असतो. पहिल्या टप्प्यातील लोक एकतर लहानपणापासून तुम्हांला ओळखत असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्याशी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नसते. त्यामुळे ह्या टप्प्यात तुम्हांला तुमच्या मुलभूत अवतारात वागणं बऱ्यापैकी शक्य असते. नंतर मात्र आयुष्य क्लिष्ट होतं जातं. कार्यालयात तुम्ही व्यावसायिक यशाच्या शिड्या झपाट्याने चढून जाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या स्पर्धा करीत असता. आपण ज्या कंपनीसाठी काम करतो तिच्या भल्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे समान ध्येय असलं तरी त्यात स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html 

Sunday, June 7, 2015

कालबाह्य !!!

 

आजकाल समाज हा बऱ्याच गोष्टींना फारच झपाट्याने कालबाहय ठरवतोय असे मला वाटत आहेत. हा भ्रम असेल तर किती बरे असे मी वारंवार मनाला समजावत असतो.
काही शालेय संस्था कालबाहय होतांना दिसतात. शालेय शिक्षणाचे माध्यम कालबाहय झाले असावे असा व्यापक समज असतो. पण माध्यमापेक्षा एखाद्या संस्थेची तात्कालीन प्रस्थापित समाजातील मुलांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने त्या कालबाहय होतात. शालेय संस्थातील शिक्षकांचा दर्जा जर काळास सुसंगत असा ठेवला तर संस्था कालबाहय होण्याचे भय बऱ्याच प्रमाणात टळू शकते.  


पुढे वाचा

http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post.html 

Saturday, June 6, 2015

Multitasking

 

http://patil2011.blogspot.in/2015/06/multitasking.html

हल्ली बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान "तुम्ही बरीच कामे एका वेळी सक्षमपणे हाताळू शकता का? " असा प्रश्न विचारला जातो. आणि मग तो होतकरू उमेदवारसुद्धा उत्साहाच्या भरात हो म्हणून जातो. 
Multi-tasking चा नक्की अर्थ काय ह्याचं आपण थोडं विश्लेषण करूयात. सर्वांना समजेल अथवा आवडेल असे गृहिणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून! सकाळी उठून तिच्या डोळ्यासमोर अनेक कामे असतात. स्वतःची, मुलांची तयारी करणे; सर्वांच्या न्याहाऱ्या बनविणे, सर्वांचे डबे बनविणे आणि भरून देणे. ह्यातच घरात कामवाली आल्यास तिला सुचना देणे इत्यादी इत्यादी. हल्ली त्यात whatsapp चे मेसेज बघणे ह्याची भर पडली आहे. 


http://patil2011.blogspot.in/2015/06/multitasking.html