Wednesday, December 30, 2015

भावनाकल्लोळ!

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

  आयुष्यात पंचविशी - तिशीपर्यंत कसा अगदी उत्साहपूर्ण काल असतो. आपल्याजवळ आयुष्यात भव्य दिव्य करण्यासाठी अगदी अफाट वेळ आहे अशी भावना मनात व्यापून राहिलेली असते.त्यामुळे एक विशिष्ट मार्गच धरून ठेवायला पाहिजे असला विचार क्वचितच मनात येतो. त्यामुळे ह्या कालावधीत मनाला आवडतील असे निर्णय घेतले जातात. थोड्या कालावधीत एखादा निर्णय न आवडल्यास त्याहून पूर्णपणे वेगळा असा दुसरा निर्णय सुद्धा घेतला जातो. पण त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत आयुष्याच्या तिशीच्या आसपास किंवा विवाहानंतर काहीसा बदल घडून येतो. माणसाचे प्रथम प्राधान्य हळूहळू स्थैर्याच्या शोधाकडे वळत जातं. काही कलंदर लोक असतात ती आयुष्यभर आपल्या मर्जीने वागत राहतात.



http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

No comments:

Post a Comment