Friday, April 9, 2010

बालपण आमचे आणि त्यांचे

माझे बरेचसे blog हे निराशावादाकडे झुकणारे असतात असे मला मधेच जाणवले. पण काय करणार उपाय नाही
तर मग आज बोलूया आपल्या बालपणाविषयी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या बालपणाविषयी. आपले बालपण संस्मरणीय क्षणांनी भरलेले गेले. त्यासाठी कोणास काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. वातावरणच तसे होते. मराठी माध्यमाची कौटुंबिक वातावरणातील शाळा, गावातील ओळखणारे बहुतांशी लोक यामुळे अनोळखी लोकांशी येणारा कमीत कमी संबंध! क्रिकेट, पोहणे, आंबे पाडणे यात संपून जाणारया सुट्ट्या. बाल्यावास्थ्तेत असणारे दूरदर्शन यामुळे बराचसा काल हा जिवंत लोकांशी बोलण्या चालण्यात जायचा.

आजची बालमंडळी मात्र काहीशा वेगळ्या वातावरणात वाढत आहे. त्यांच्या पालकांचा म्हणजेच आपला जनसंपर्क बर्याच टक्क्यांनी कमी झाला आहे. नातेवाईकांचे येणे जाणे बरेच कमी झाले आहे. दूरदर्शन, संगणक यांनी त्यांचा बराच वेळ व्यापून टाकला आहे. नैसर्गिक माध्यमातून आलेले आनंदाचे क्षण त्यांच्यासाठी बरेच कमी झाले आहेत. त्यांचा आनंद Mcdonald , Pizza Hut , Tom & Jerry यांनी व्यापलेला आहे. आजच्या वातावरणाचा या बाल पिढीवर कसा परिणाम होत आहे, ते ज्या वेळी मोठे होतील त्यावेळी त्यांची भावनिक सक्षमता किती असणार याचा आपणास अजिबात अंदाज नाही.

यात आपली जबाबदारी काय? तर त्यांना नैसर्गिक आनंदाचे क्षण देणे. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याबरोबर समुद्रकिनारी जाऊन वाळूचा किल्ला बांधा. त्यांना असे क्षण द्या जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहतील. बंध बांधा संस्मरणीय क्षणाचे आणि बनवा त्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम!

No comments:

Post a Comment