Wednesday, February 27, 2013

समुद्रकिनारा


निसर्गातील काही ठिकाणे माणसाला कधी नतमस्तक बनवितात तर कधी भावूक. नित्य जीवनात कधी आपणास गर्व झाला असेल अथवा कधी आपण अगदी निराश / दुःखी झालो असू तर ही ठिकाणे आपणास आपल्या ह्या भावनांचा योग्य असल्यास क्षुल्लकपणा दाखवितात तर कधी ह्या भावनांच्या खरोखरीच्या गहनतेतून बाहेर निघण्यास मदत करतात. उंच पर्वतावरून घेतलेले पृथ्वीचे मनोहर दर्शन, दाट जंगलात केलेली पायवाट, एखाद्या गावाच्या छोट्या घरातून चांदण्या रात्री केलेले चंद्राशी, चांदण्यांशी मनोगत अशी ही अनेक ठिकाणे आहेत. आजचा हा विषय आहे सागरकिनारा!
समुद्र आणि मनुष्याचा संबंध लहानपणी येतो. आता हे विधान समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना बहुतांशी लागू होते. वाळूचे किल्ले बनविणे, भरतीच्या वेळी आपल्या मागे पुढे करणाऱ्या लाटांशी खेळणे ह्यात मनमुराद आनंद लुटणे ह्या वाक्याचा प्रत्यय येतो. माझ्या एका मित्राच्या भाषेत बोलायचे तर य मजा येते. घराभोवती खेळतांना सुद्धा तसे थोडेफार निर्बंध असतात ह्यातील बरेचसे सागरकिनारी लागू होत नाहीत. ह्यातील मुख्य म्हणजे पडण्याची भिती. वाळूत पडणे हा देखील एक सुखद अनुभव असतो. ओल्या वाळूचा पायाला होणारा सुखद स्पर्श सुखाची एक लहर मनाच्या त्या बिंदूपर्यंत घेऊन जातो.
बालपण हळूहळू संपते. परीक्षारूपी सैतान आपले जीवन व्यापून टाकतो. परीक्षेच्या आदल्या संध्याकाळी शांत समुद्रकिनारी बसून आपल्या मनाच्या अभ्यासू कोपऱ्याशी संवाद साधल्यास फार बरे वाटते. ही अशी मोठी परीक्षा आटोपल्यावर हा समुद्रकिनारा पुन्हा आपणास वेगळा भासतो. आपल्याला धीर दिल्याबद्दल त्याचे आभार मानायची अनावर इच्छा मनात होते.
प्रेमात पडलेल्यांचा तर हा समुद्रकिनारा एक मोठा आधार असतो. डूबत्या सूर्याच्या लालसर सोनेरी किरणांच्या साक्षीने हातात हात घेवून ज्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्यांच्यासारखे सुदैवी तेच. कवीजनांना तर हा समुद्रकिनारा आणि डुबता सूर्य कायमच प्रेरणा देतो.
कोणाच्या आयुष्यात दुर्दैवी प्रसंग येऊन जवळची व्यक्ती सोडून गेली असल्यास हा किनारा त्या व्यक्तीच्या आठवणीचा चलतचित्रपट डोळ्यासमोर उभा करतो. त्या व्यक्तीच्या प्रतिमा त्या भावुक वातावरणात डोळ्यासमोर उभ्या राहतात.
तरुणपणात आपल्या भवितव्याच्या सर्व चिंता आपण ह्या सागराशी शेअर करतो. आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी ह्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळतात.
परदेशीचा समुद्रकिनारा सुरुवातीला थोडा अनोळखी भासतो. परंतु एकदा का त्याची आणि आपली नाळ जुळली की सर्व बंध तुटून पडतात. आपल्या तोकड्या भौगोलिक ज्ञानाच्या जोरावर हे पाणी कुठेतरी लांबवर जावून वसईच्या किनाऱ्याशी पोहचत असेल असा विचार आल्याशिवाय राहत नाही. आणि मग आठवतात ते सावरकर आणि त्यांची ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता!
ह्या समुद्रकिनाऱ्याची एकच दुःखद आठवण! ९२ साली महाविद्यालयीन सहल केळवे येथे गेली होती. दुपारपर्यंत सुंदर फलंदाजी करणारा ललित भोजनानंतर माझ्या मनगटावर आपले घड्याळ बांधून पोहायला गेला तो कायमचाच! हा ललित आणि रात्रभर समुद्रकिनारी बसून त्याची वाट पाहणारा नारायण, कायमचेच स्मरणात राहतील!
असा हा आपला सखा  सागरकिनारा!

 

Monday, February 25, 2013

सुमेर ग्रह - अंतिम भाग?


सुमेर ग्रह - अंतिम भाग?
निरंजन-१ विरुद्ध मानवजात,कच, मिहिर, बोस आणि नासाचे शास्त्रज्ञ असा लढा जोमाने चालू होता. हा लढा जसा सुमेर ग्रहावरील दोन वसाहतींच्या नियंत्रणासाठी होता तसाच मानवजातीच्यासुद्धा! ह्या लढ्यातील मानवजातीच्या बाजूचे अग्रगण्य खेळाडू होते मिहिर आणि बोस! संगणकाव्यतिरिक्त एकही क्षण घालविण्याची सवय नसलेल्या मानवजातीला हे मधले निरंजन-१ च्या वर्चस्वाचे क्षण फार कठीण जात होते. खरे तर त्यांचेही प्याद्यात रुपांतर व्हायचेच परंतु मिहिर आणि बोस ह्यांच्या अथक प्रयत्नाने आतापर्यंत हा लढा थोपविला गेला होता. निरंजन-० सुद्धा निरंजन-१ वर मात देण्याचा प्रयत्न करीत होता.
निरंजन-१ पृथ्वीवरील सर्व माहितीजालांचे निरीक्षण करीत होता. अचानक त्याचे लक्ष http://nes1988.blogspot.in/2013/02/blog-post_25.html ह्या संकेतस्थळाकडे गेले.
.
.
.
.
.
.
.
अरेरे हे काय होत आहे! कोणीतरी माझा (आदित्यचा) ताबा घेऊ पाहत आहे.........

Friday, February 22, 2013

सुमेर ग्रह भाग ९


निरंजन आता एकदम थबकून गेला होता. आपल्या मेंदूतील विचारप्रक्रियेवर कोणीतरी नियंत्रण करू पाहत आहे हे त्याला पूर्णपणे जाणवत होते. त्या शक्तीशी करण्याचा त्याचे अंतर्मन आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु सध्यातरी त्याचा मेंदू त्या शक्तीने ताब्यात घेतला होता. आता निरंजन-१ कार्यान्वित झाला होता.
निरंजन-१ ने पृथ्वीवरील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला. सर्वप्रथम फटका बसला तो दूरसंवेदन उपग्रह सेवेला. ती ठप्प करण्यात आली. त्यानंतर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. मिहिर, बोस आणि नासाचे सर्व तंत्रज्ञ थक्क होवून हा खेळ पाहत होते. आतापर्यंत अशा घटना केवळ हॉलीवूडच्या सिनेमात पाहण्याचीच सर्वांना सवय होती. निरंजन-१ च्या मेंदूत लक्षावधी प्रतिमा अफाट वेगाने फिरवल्या जात होत्या. आता भूतलावरील प्रतिमांचा रोख भारताकडे वळला होता. अचानक ह्या लक्षावधी प्रतिमेतील एका प्रतिमेकडे पाहून निरंजन-१ अडखळला. विदिशाच्या गावातील पुरातन वाड्यात तिच्या पूर्वजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिमा निरंजनचीच होती. निरंजन-१ च्या ह्या एका दुबळ्या क्षणाचा मूळ निरंजनने फायदा उठवत आपल्या मेंदूवर पुन्हा कब्जा मिळविला. आता निरंजन-० कार्यान्वित झाला होता. अचानक दूरसंवेदन उपग्रह आणि इंटरनेट सेवा सुरु होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. निरंजन-० ने मिहिर, बोस, कच ह्यांच्या मेंदूत आपली ज्ञानसंपदा घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला. आपले हे स्वत्व किती काळ टिकणार ह्याची त्याला शास्वती नव्हती. त्याचा हा अंदाज खरा ठरला. निरंजन-१ काही सेकंदातच पुन्हा कार्यान्वित झाला होता. परंतु निरंजन-० ने आपले काम अंशतः पार पाडले होते. आपल्या मेंदूतील बुद्धिमत्तेचा काही भाग intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित करण्यात त्याने यश मिळविले होते.
निरंजन-१ पुन्हा आता सर्व ठप्प करण्याच्या मागे लागला होता परंतु ह्यावेळी त्यापुढे आव्हान होते ते intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित झालेल्या निरंजन-० च्या बुद्धिमत्तेचे. त्यामुळे निरंजन-१ काहीसा गोंधळून गेला. त्याचवेळी मिहिरने ह्या सर्व घडामोडींची कल्पना बोस आणि वरिष्ठ अधिकार्यांना दिली. आणीबाणीच्या वेळी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा चालू करण्यात आली. अतिमहत्त्वाचे संगणक माहितीमाया जाळापासून वेगळे करण्यात आले आणि त्यात फक्त १-२ व्यक्तींना शिरकाव करता येईल अशी सोय करण्यात आली.
इथे आपल्याला मिळालेल्या अधिक बुद्धिमत्तेवर कच खुश झाला होता. पण त्याला एकंदरीत परिस्थितीची कल्पना नव्हती त्याचे लक्ष निलोतम्मावरच होते. आपल्या मिळालेल्या ह्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो निलोतम्माला आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू लागला होता. इथे मिहिरच्या डोक्यात सुद्धा असलेच विचार चालले होते. सामक आणि निलोतम्माला उपग्रहात बसवून पृथ्वीवर आणण्याचा त्याचा मानस होता. ह्या सर्वात बोस एकच वस्तुनिष्ठ विचार करणारे होते. निरंजन-० ची बुद्धिमत्ता त्यांच्यात आल्याने त्यांनाही सर्व पात्रांची ओळख झाली होती. त्यांच्याकडे सर्वात जास्त अधिकार असल्याने शेवटी सामक, नीलोतम्मा, कच ह्यांना सुमेर ग्रहाजवळ गेलेल्या उपग्रहात जवळजवळ कोंबण्यात आले. आणि ह्या उपग्रहाचा परतीचा प्रवास सुरु झाला. ह्या उपग्रहाने सुमेर ग्रहाजवळ पोहोचण्यात बरीच वर्षे लावली होती. परंतु आपल्या नंव्याने प्राप्त झालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बोस आणि मिहिर ह्यांनी हा परतीचा प्रवास केवळ एका दिवसात होईल अशी तजवीज केली होती. ह्या उपग्रहाचे पृथ्वीवर आगमन अगदी गुप्त ठेवण्यात आले होते. 

Wednesday, February 20, 2013

अदृश्य शक्ती आणि पालकत्व


कोणत्याही दोन व्यक्ती, समाज, राष्ट्र ह्यांचा एकमेकात संवाद, क्रिया - प्रतिक्रिया सुरु असतात. बहुदा ह्यातील एक घटक हा दुसऱ्या घटकापेक्षा सामर्थ्यवान असतो. आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तो दुसऱ्या घटकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवावयास पाहतो. ह्या दोघांतील संबंधांच्या प्राथमिक पातळीत सामर्थ्यवान घटक आपल्या शक्तीचे थेट प्रदर्शन करतो आणि कमकुवत घटकास आपणास हवे तसे करण्यास भाग पाडतो. परंतु असा संबंध दीर्घकाळ टिकण्यास बऱ्याच अडचणी येतात. कमकुवत घटकाच्या मनात निर्माण होणारा असंतोष आणि त्याचे वाढणारे बळ ह्या दोन मुख्य अडचणी होत. मग सामर्थ्यवान घटक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या तत्वाचा वापर करू पाहतो. कमकुवत घटकाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे अशा प्रकारे नियंत्रण करावे की त्याने आपल्यास हवे तसे वागावे हे धोरण स्वीकारले जाते. ह्यामध्ये कमकुवत घटकाच्या वागणुकीवर सतत नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारली जाते. ही वागणूक नियंत्रणापलीकडे गेल्यास लगेच धोक्याचा संदेश निर्माण केला जातो आणि बलवान घटक प्रत्यक्ष कृती करतो.
ह्याची व्यवहारात उदाहरणे द्यायची झाली तर हुकुमशाही राजवट ज्यात नागरिकांच्या वर्तनावर बिग ब्रदर लक्ष ठेवून असतो. मीना प्रभूंच्या चीनी माती ह्या पुस्तकात काही काळापूर्वीच्या आणि काही प्रमाणात आताच्याही चीनमधील नागरिकांच्या ह्या स्थितीचे वर्णन आहे. स्थानिक माफिया जे सर्व सामान्य लोकांच्या वागणुकीवर लक्ष ठेवतात.
आता आपण बालक पालक ह्या नात्याकडे वळूया. पूर्वीच्या पिढीत पालक ठोकशाही, हुकुमशाही तत्वाचा वापर करायचे. आजचे काही पालक त्यावेळी बालक ह्या नात्यात असल्याने त्यांना हे असेच तत्व वापरायचे असे वाटणे साहजिक आहे. परंतु काळ बदलल्याने पालकांनी अदृश्य शक्ती तत्वाचा वापर करणे आवश्यक आहे. घरातील परिस्थितीला असे नियंत्रित करा की बालक आपल्याला हवे तसे वागेल. ह्यात बरीच वैचारिक गुंतवणूक आणि स्वयंशिस्तीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पालकांनी स्वतःच्या वागणुकीद्वारे बालकांचे formatting (जडणघडण) करणे हा ही एक उपाय असू शकतो.

 ह्यातही एक मेख आहेच हल्लीची बालक पिढी भावनिक दृष्ट्या बरीच पुढे गेली आहे त्यामुळे काही काळात त्यांना ह्या तत्वाचा उलगडा होईल. आणि मग ह्या तत्वाचा वापर आपल्यावर केला जाईल.

हे तत्व अमलात आणण्यासाठी पालकत्व हे सर्वात प्राथमिक पातळीवरचे नाते आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवरील अनेक नात्यांत हे तत्व अमलात आणले जावू शकते. पण त्याच्या समीकरणाची क्लिष्टता मात्र वाढत जाते.
 

Tuesday, February 19, 2013

सुमेर ग्रह भाग ८


निरंजन आपल्या दीर्घ निद्रावस्थेतून हळूहळू जागा झाला. आज्ञावलीमध्ये कुण्या आगंतुक व्यक्तीचा प्रवेश झाल्यास आपली निद्रा भंग होईल ह्याची त्याने तजवीज करूनच ठेवली होती. आपला महा महासंगणक सुरु करताच त्याला एकंदरीत सर्व परिस्थितीचा उलगडा होण्यास फारसा काही वेळ लागला नाही. आपली मनुष्यजात आपल्यापर्यंत येऊन पोहोचली ह्याचा त्याला सखेद आनंद झाला. सखेद ह्यासाठी की ही भेट काही शांत असणार नाही हे ते जाणून होता.
निरंजनचे मन आपसूकच २०० वर्षांपूर्वीच्या घटनांकडे गेले. अंतराळातील निघालेल्या ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटताच निरंजन एकदम कावराबावरा झाला होता. आता हे यान कोठे जाईल, आपण असेच अंतराळात भरकटून आपला अभागी अंत होणार अशा नको नको त्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले. असेच काही दिवस गेले. यानातील इंधनाचा साठा आता संपण्याच्या मार्गावर होता. परंतु आता निरंजन ह्या सर्व गोष्टींची चिंता करण्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या मनावर एका निरंतन शांततेने कब्जा केला होता. हळूहळू निरंजन एका दीर्घ निद्रेत गेला होता.
निरंजनची निद्रा ज्यावेळी भंग झाली त्यावेळी एका वेगळ्याच ठिकाणी असल्याचे त्याला आढळून आले. हे स्थळ समुद्राच्या खोल तळाशी होते. तिथे निरंजन सोडून कोणीच नव्हते आणि निरंजनच्या खाण्यापिण्याच्या गरजा अत्यंत मामुली स्वरूपाच्या राहिल्या होत्या. आपला मेंदू अत्यंत प्रगतावस्थेत गेला आहे हे काही दिवसातच निरंजनला जाणवले. कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा विचार मनात आल्यास त्या विषयाची इत्यंभूत माहिती मेंदू आपल्यासमोर सादर करतो हे निरंजनला कळून चुकले होते. संगणकावरील खेळाची निरंजनला फार आवड होती. असाच काही खेळ आपण निर्माण करावा असा विचार त्याच्या मनात आला. पण संगणक होता कोठे? असा विचार मनात येताच अत्याधुनिक संगणक निर्माण करण्याच्या सर्व सूचना मेंदूने त्याच्या समोर सादर केल्या अगदी त्याला लागणाऱ्या साधनसामुग्रीसकट. हे सर्व अतर्क्य घडत आहे हे निरंजनला समजत होते परंतु असे का घडत आहे हे हयची त्याला आता चिंता करावीशी वाटत नव्हती. एकंदरीत मनुष्यजातीने आतापर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान आपल्या डोक्यात शिरले आहे असा एकंदरीत त्याचा ग्रह होऊ लागला होता.
संगणकावरील खेळात नेहमी प्राथमिक Basic, Intermediate आणि Advanced अशा तीन पातळ्या असायच्या. आपल्या खेळात सुद्धा अशा पातळ्या बनवाव्यात असा निग्रह निरंजनने केला. पण खेळ कसला? निरंजनला हल्ली काहीसे एकटे वाटू लागले होते. आपल्या अवतीभोवती सजीव असावेत अशी इच्छा त्याच्या मनात रुजू लागली होती. असा विचार यायची खोटी, गणकांची संपूर्ण संरचना त्याच्यासमोर सादर झाली होती. मग निर्माण झाले होते वेताळ - म्हणजेच intermediate level. ह्या सर्व गडबडीत निरंजनला थोडासा थकवा आला होता. आणि त्यामुळे त्याने ही निद्रा घेतली होती. आता त्याच्या मनात अतिप्रगत पातळीचा शोध चालू झाला होता. अरे वेड्या अतिप्रगत पातळी तर स्वतःहून तुझ्यापुढे चालून आली आहे, त्याच्या मनाने त्याला सांगितले. प्रथमच निरंजनच्या मनात थोडी खळबळ माजली होती. ह्या सर्वाचा कर्ता करविता कोण ह्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे प्रथमच त्याला वाटू लागले. 

Saturday, February 16, 2013

Informed Decision - माहिती उपलब्ध करून घेतलेला निर्णय


व्यावसायिक जीवनातील हल्ली नव्याने आवडलेला शब्द म्हणजे 'Informed Decision'. प्रथम ज्यावेळी हा शब्द ऐकला तेव्हा आपल्या टीमला असा निर्णय घेण्यात सक्षम करण्यात व्यवस्थापकाने कशी महत्त्वाची भूमिका बजाविली पाहिजे असा चर्चेचा रोख होता. नेहमीप्रमाणे माझी गाडी आपल्या वैयक्तिक जीवनाकडे वळली. ह्यातील विविध टप्पे असे असावेत.
१> सर्वप्रथम मी मला 'Informed Decision' घ्यायचा आहे की नाही ह्याचा निर्णय घेतो. Informed Decision म्हणजे मेंदूचा सहभाग आला. पण माझ्या प्रत्येक निर्णयात मला मेंदू सहभागी करून घ्यायचा आहे की नाही हा माझा निर्णय! मी आर्थिक गुंतवणूक करतो त्यातील काही भाग माझ्या मित्रांच्या कंपन्यात करतो कारण तिथे मला माझी मैत्री महत्वाची असते. लग्न करताना काही लोक Informed Decision घेतात तर काही हृदयाचे म्हणणे ऐकून!
२> एकदा का मी 'Informed Decision' घेण्याचा निर्णय घेतला की मी माहितीचे योग्य स्त्रोत माहित करून घेणे अत्यावश्यक बनते. हल्ली माहितीचे खूप स्त्रोत उपलब्ध असल्याने मला त्यातील योग्य स्त्रोत निवडणे आवश्यक असते. मग मी गरज पडल्यास जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
३> समजा मी सुदैवी असेन आणि मला योग्य जाणकार भेटला आणि त्याने मला विविध पर्याय सुचविले. आतापर्यंत आपणास जाणविले असेल की लेखाचा एकंदरीत रोख आर्थिक गुंतवणुकीकडे किंवा नोकरी धंद्यातील एखाद्या निर्णयाकडे आहे. आता जाणकाराने सुचविलेल्या पर्यायांचे दोन गुणधर्म असतात. पहिला म्हणजे त्यातील फायद्याचे प्रमाण आणि दुसरा म्हणजे त्या पर्यायाची खात्रीलायकता! मग मी माझ्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार उपलब्ध पर्यायांच्या ह्या दोन्ही गुणधर्मांचे मुल्यमापन करून त्यातील मला योग्य वाटणारा निर्णय घेतो.
बघा पुढच्या वेळी कोणता निर्णय घेताना तो 'Informed Decision' आहे की नाही!  

सुमेर ग्रह पूर्वभाग आणि भाग ७


प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.
सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.
वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.
सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.

भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.
इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.
कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.
सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!
नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
भौमिक आणि कच पूर्णपणे गोंधळून गेले होते आज्ञावली आता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेली होती. कोण्या अज्ञात व्यक्तीने त्यावर नियंत्रण मिळविले होते आणि कच आणि भौमिक ह्यांचा ह्या आज्ञावलीतील प्रवेश बंद करून टाकला होता. इथे नासा आणि बोस ह्यांची बैठक जोरात चालू होती. ह्या दोन्ही मनुष्य सदृश्य जीवसमूहांचे पुढे काय करायचे ह्याविषयी ह्या बैठकीत एकमत होत नव्हते. बहुसंख्य लोकांचे मत होते की त्यांना सद्यपरिस्थितीप्रमाणे राहू द्यावे. परंतु ही बातमी आतापर्यंत बाहेरील बड्या कंपन्याच्या वरच्या वर्तुळात पोहोचली होती. त्यातील पर्यंटन आणि वैद्यकीय कंपन्यांना ह्या ग्रहाविषयी आणि इथल्या सजीवाविषयी व्यावसायिक आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी ह्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही लोकांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. ही फितूर मंडळी मानवाने ह्या ग्रहावर आधिपत्य गाजवावे ह्या विचाराचा पुरस्कार करीत होती.
मिहिर मात्र आपल्या प्रयोगात अधिकाधिक अचूकता आणण्याच्या मागे लागला होता. निलोतम्माचा स्वभाव आपल्याला समजलेल्या विदिशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने बनविला खरा पण खरी मेख त्यातच होती. विदिशाचा स्वभाव त्याला पूर्णपणे त्याला कळला थोडाच होता आणि आजूबाजूच्या घटकांचे काय? त्यामुळे त्याने अजून एक धाडशी निर्णय घेतला आणि ह्या दोन पात्रांव्यतिरिक्त अजून काही पात्रे आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे त्याने ठरविले.
पर्वतराजीत बसलेल्या कचने आनंदाने एक उडी मारली. अथक प्रयत्नानंतर त्याला पुन्हा आज्ञावलीत प्रवेश करता आला होता. आपल्या आज्ञावलीचे पूर्ण बदलेले रूप पाहून तो थक्क झाला. वेताळांचे नियंत्रण करणारा आज्ञावलीचा भाग कच आणि भौमिक ह्यांच्या पलीकडचा होता. तिथे प्रवेश केल्यास वेताळ आपले स्वत्व गमावून बसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा भाग नियंत्रित करतो तरी कोण असा प्रश्न एकदा वैतागून कचाने भौमिकला केला होता. वेताळापेक्षा वेगळी अशी अतिवयस्क व्यक्ती जी प्रयोगशाळेच्या आतल्या कक्षात बसून असते ती भाग नियंत्रित करते अशी वदंता होती. परंतु ह्या वयस्क व्यक्तीला सद्य वेताळापैकी कोणी पाहिले नव्हते.
बोस आणि नासा ह्यांच्या बैठकीत नेमका तोच मुद्दा चर्चिला जात होता. ह्या वसाहतीचा कर्ता करविता कोण. सह्याद्रीतील वैज्ञानिकांचे लक्ष राहून राहून दोनशे वर्षांपूर्वी अंतराळात गायब झालेल्या यानाकडे जात होते. त्यात निरंजन नावाचा अतिबुद्धिमान वैज्ञानिक अंतराळात गायब झाला होता. पुढे एक दोन वर्षे हे यान चर्चेत राहिले पण नंतर सर्वजण त्याला विसरून गेले होते. आता अचानक त्या यानाचा संभाव्य मार्ग तपासून पाहिला जावू लागला.

Wednesday, February 13, 2013

सुमेर ग्रह भाग ६


नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता.
मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती.
मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता!
 

Tuesday, February 12, 2013

सुमेर ग्रह भाग पाच

 
भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.


इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.

कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.

सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच!

Monday, February 11, 2013

सुमेर ग्रह भाग पाच


भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता.
इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता.
कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची.
सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत  आलाच!

Saturday, February 9, 2013

मी आणि मी - एक संवाद


माझे स्वतःचे माझ्याविषयी मत काय असतं? प्रत्येक क्षणाला हे मत निर्माण होत असत आणि बदलत राहते. ह्या स्वतःविषयीच्या माझ्या मताबरोबर अजून काही भावनांचा कल्लोळ मनात चालू असतो. मी दररोज काही उद्दिष्ट ठरवून दिवस सुरु करतो. काही वैयक्तिक तर काही व्यावसायिक. काही परम महत्वाची तर काही कमी महत्वाची. जसजसा दिवस पुढे जातो तसतसा माझा त्या दिवसांच्या भावनांचा रंग काहीसा ठरविला जातो, महत्वाची कामे झाल्यास मी खुश होत जातो. आता ह्या खुशीच्या क्षणी मी काहीसा बेफिकीर होऊन बाकीची कर्तव्य विसरू शकतो किंवा एकदम जोरात येवून बाकीची कामे आटोपण्याचा धडाका लावू शकतो. आता महत्वाची कामे झाल्यास माझे बाह्य स्वरूप आतल्या माझ्यावर खुश असतो. मी स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो.
दुनियेला माझे फक्त बाह्य रूप दिसते. माझे हे बाह्य रूप माझ्या बोलण्या चालण्यातून, लिहिण्यातून प्रकट होत असते. पण माझ्या अंतर्रुपापर्यंत पोहोचण्याची फक्त मलाच संधी मिळते. माझे हे अंतर्रुप मी कितपत ओळखले ह्याचा मला कधीच थांगपत्ता लागू शकत नाही. तसा ह्या गोष्टीवर फार कमीवेळा मी विचार करतो.
ह्या अंतर्रुपात आनंद, दुःख, प्रेम, क्रोध, मत्सर, लोभ अशा अनेक भावना गोंधळ घालीत असतात. एकंदरीत माणसाच्या अंतर्रुपात जी भावना दीर्घकाळ वास्तव्य करून राहते त्यानुसार त्याचा स्वभाव बाह्यजगत ठरविते. माझ्या बाह्यरुपाचा जगाशी जो संवाद होतो त्यानुसार हे बाह्यरूप माझ्या अंतर्रूपाशी संवाद साधते. ह्या संवादानुसार वर उल्लेखलेल्या भावनेतील एखादी भावना उचल खाते. आता ही भावना किती काळ टिकते हे एकतर बाह्यरूपाने पाठविलेल्या दुसर्या संदेशावर ठरते किंवा माझ्या मनःशक्तीवर! मला त्रासदायक ठरणारी भावना लवकरात लवकर घालविण्यासाठी एकतर मी अनुकूल वातावरणात जाणे आवश्यक असते किंवा माझ्या मनःशक्तीला आव्हान करणे आवश्यक असते.
माझ्या बाह्यरूपाला खुश करण्यासाठी मी चमचमीत अन्न घेतो, वातानुकुलीत खोलीत झोपतो, दूरदर्शन पाहतो, समाजात मिसळतो. परंतु आपण आपल्या ह्या अंतर्मनाची फार कमी वेळा काळजी घेतो, त्याचे लाड करतो. अंतर्रूपाला खुश करण्यासाठी फार कमी मार्ग असतात. हल्ली शास्त्रीय संगीत ऐकल्यावर कुठेतरी अंतर्मन शांत झाल्यासारखे वाटते. शनिवारी रात्री अंधारात केवळ श्रवणेद्रियांना जागृत ठेवून हे शास्त्रीय संगीत ऐकावे, सुब्बलक्ष्मी, भीमसेन ऐकावेत. राम मराठे ह्यांचे मंदारमाला नाटकातील जयोस्तुते उषा देवते ऐकावे. प्रत्येकाचे अंतर्मनाला खुश करण्याचे मार्ग वेगळे. कोणाला जंगल खोऱ्यात जायला आवडते. प्रत्येकाने आपला मार्ग ओळखावा आणि त्या मार्गाने प्रवास करावा.

हे अंतर्मन जरूर पडेल तेव्हा तुमची सर्वोत्तम क्षमता बाहेर काढू शकते. त्यावेळी ते तुमच्या बाह्यमनाला आदेश देते की बाबारे आता सर्वोत्तम कामगिरीची गरज आहे. मेंदू, शरीर एका तन्मय स्थितीत जाते. आपली ही सर्वोत्तम स्थिती अंतर्मन लक्षात ठेवून देते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ह्या स्थितीत तत्काळ नेण्यास मदत करते.

Friday, February 8, 2013

इराणी चषक सामना - रोहित शर्मा, अभिषेक नायर आणि सचिन!


लहानपणी मला अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले होते. मी वसईला मोठा होत असताना मध्येच गल्लीत एखाद्या दिवशी चांगली फलंदाजी केली की मी अनेक मनोरथे रचित असे. त्यात मला एक प्रश्न पडे की मी समजा रणजी दर्जापर्यंत पोहोचलो की माझी निवड महाराष्ट्राच्या संघात की मुंबईच्या? ह्या प्रश्नावर माझी बरीच उर्जा खर्च झाल्याने मी रणजी दर्जापर्यंत पोहोचलो नाही ही गोष्ट वेगळी!
सध्या इराणी चषक सामना चालू आहे. क्रिकइन्फोवर ह्या सामन्याचे धावते वर्णन वाचणे हा एक ज्ञानवर्धक आणि मनोरंजक अनुभव असतो. संपूर्ण भारत आणि जगभरातील रसिक आपली टिपण्णी पाठवत असतात आणि त्यातील निवडक टिपण्या आपणास वाचता येतात.
२०११ च्या इंग्लंड दौऱ्यापासून मी सचिनने निवृत्त व्हावे अशा विचाराच्या टिपण्या जमेल तिथे प्रसिद्ध करीत आहे. परंतु हल्ली माझे पुन्हा मतपरिवर्तन होऊ लागले आहे. कालचाच सामना पहा! रोहित शर्मा आणि अभिषेक नायर ह्या दोघांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुवर्णसंधी होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आपला खेळ आणि संयमी मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी संपूर्ण वानखेडे मैदान आणि समोर सचिन उपलब्ध अशी आदर्श स्थिती होती. पण दोघेही बेजबाबदार फटका मारून बाद झाले. एका रसिकाने ह्यावर एक मार्मिक प्रतिक्रिया दिली. 'आपल्या विकेटचे मुल्य रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यात सुद्धा कळले नाही. ह्याउलट सचिनकडे पहा तो कसा राष्ट्रीय पातळीच्या सामन्यात सुद्धा कधीच आपली विकेट फेकत नाही.' पुढे तो रसिक म्हणाला ' स्थानिक पातळीवर रोहितच्या जवळपास गुणवत्तेचे अनेक असे खेळाडू आहेत ज्यांना एकही संधी मिळत नाही, त्यांच्याविषयी मला वाईट वाटते.' अगदी बरोबर म्हणाला तो रसिक!
सचिन असो वा जाफर, दोघे जुन्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. संयम भरभरून आहे त्यांच्यात, तीच गोष्ट नव्या पिढीच्या अजिंक्य रहाणेची. पण सर्वसाधारण नवीन पिढीचे काय? आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी ज्यांची केवळ स्वप्ने मागच्या पिढीने बघितली अशा गोष्टी अगदी आरामात आज बहुसंख्य नवीन पिढीस उपलब्ध आहेत. पण जे आरामात मिळते त्याचे मुल्य कळावयास कठीण जाते. तीच गोष्ट काहीशी रोहितच्या बाबतीत झाली आहे. तीच गोष्ट प्रवीणकुमार ह्या गोलंदाजाची! कालच बातमी वाचली की त्याने स्थानिक सामन्यात बेजबाबदारपणे वागण्यास सुरवात केली आहे. IPL चा पैसा त्याच्या डोक्यात गेला आहे असे त्याच्या स्थानिक सहकाऱ्याचे मत आहे.
एकंदरीत काय नवीन पिढीतील बऱ्याच जणांचे सर्व लक्ष तरुणपणातील वर्षांकडे आणि त्यातील मौज मस्तीकडे आहे. पण आयुष्य मात्र केवळ तरुणाईचेच नाही हा मुद्दा कोठेतरी विसरला जात आहे.
असो बाकी सचिनने तळाचे फलंदाज समोर असताना स्वतःकडे फलंदाजी ठेवण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. बहुदा तुमच्या बेजबाबदारीची मी पूर्ण जबाबदारी घेणार नाही असेच काही त्याला सूचित करायचे असेल! बघूया आज मुंबई आपला लढाऊ बाणा दाखविते का?

Monday, February 4, 2013

मुसाफिर - अच्युत गोडबोले


बोरिवलीमध्ये शब्द ह्या पुस्तकालयात सवलतीच्या दरात पुस्तकविक्री सुरु आहे म्हणून कुतूहलाने गेलो. रविवार संध्याकाळ आणि सवलतीच्या दरात पुस्तके ह्याचा परिणाम म्हणून माझ्यासारखे अनेकजण तिथं आले होते. ज्या प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात होती ती काही मला झेपली नाहीत. अपवाद फक्त सावरकरांच्या दोन पुस्तकांचा 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने' आणि '१८५७ चे स्वातंत्र्यसमर'. ही पुस्तके निवडून मग मी मोर्चा इतर पुस्तकांकडे वळविला. मीना प्रभू ह्याच्या प्रवासवर्णनाची 'मेक्सिकोपर्व', 'माझे लंडन', 'चीनी माती', दक्षिण रंग', 'इजीप्तायन' ही पाच पुस्तके मला खुणावू लागली. तिही मी उचलली. माझा मित्र दर्शन वर्तक ह्याने मीना प्रभू ह्यांच्या पुस्तकांचे परीक्षण केले होते त्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. तसेच मग इंदिरा संत ह्याच्या मृद्गंध ह्या पुस्तकाने लक्ष वेधले. तेही उचलले. माझी ही पुस्तक खरेदी पाहून मुलाने देखील सापाचे आणि बाकी गोष्टींची पुस्तके घेतली.
अचानक माझे लक्ष अच्युत गोडबोले ह्यांच्या मुसाफिर ह्या पुस्तकाने वेधले. अच्युत गोडबोले ह्यांनी बर्याच काळापासून मला प्रभावित केले आहे. १९९८ साली सिंटेल मध्ये मी प्रवेश केला त्याच्या आसपास त्यांनी ही कंपनी प्रमुख अधिकारी पदावरून सोडली होती. एका मराठी माणसाने ह्या कंपनीत इतके मोठे पद भूषवावे ह्याचा मला त्यावेळी खूप अभिमान वाटला होता. त्यानंतर त्यांची भेट लोकसत्तेतील लेखामधून होत राहिली. प्रत्येक वेळी त्यांनी मला अधिकाधिक प्रभावित केले. सगळ्या पुस्तन्काची किंमत २००० च्या आसपास झाली. मॉलच्या रविवारीच्या लगेच विसरता येण्याजोग्या एका भेटीचा सरासरी खर्च. परंतु ह्याच पैशात किती अमुल्य ठेवा खरीदला होता मी.
रात्री हे पुस्तक चाळण्यास सुरुवात केली. अच्युत गोडबोले ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके बहुविध रंग वाचून मी थक्क झालो. पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. सोलापूरचे वर्णन, आयआयटी मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या कारवाया, भीमसेन जोशी सारख्या मान्यवर कलावंताबरोबरचे अनुभव, सामाजिक चळवळीत त्यांचे झोकून देणे, काहीसा भ्रमनिरास झाल्यावर परत व्यावसायिक जगतात प्रवेश आणि मग तेथून घेतलेली गगनभरारी. हे पुस्तक फक्त वरवर चाळून इतके थक्क व्हायला होते. देवाने एकाच माणसाच्या अंगी इतकी गुणवत्ता द्यावी जी एका जन्मात वापरणे कठीण जावे? बुद्धिमत्तेचे पण बघा कसे असते, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती माणसाला धोपटमार्गाने जावू देते पण त्याच्यापलीकडील बुद्धिमत्ता माणसाच्या अंगात तुफान निर्माण करते. असा माणूस कोणती क्षेत्र पालथी घालील त्याचा त्या माणसाला देखील अंदाज नसतो. असेच काही अच्युत गोडबोले ह्यांच्या बाबतीत म्हणता येईल. खंत एकाच गोष्टीची, आपण / आपला देश अशा गुणी माणसांचा काहीच उपयोग करून घेत नाही. अरे रस्त्यावर पोस्टर लावायची तर अशा लोकांची लावा जी नव्या पिढिला आदर्श दाखवतील!
असो, ह्या पुस्तकाला मान्यवरांनी ज्या प्रस्तावना दिल्या आहेत त्याही वाचण्याजोग्या आहेत. त्यावर मी काही भर घालू शकणार नाही. फक्त पुस्तकातील एक लक्षात राहिलेला क्षण. व्यावसायिक क्षेत्रात पुनरागमन केल्यावर गोडबोले ह्यांच्या वैयक्तिक जीवनात कठीण प्रसंग येतो, बचतही जवळपास शून्य आणि व्यावसायिक जीवनावरही काही प्रभुत्व नाही, अशा क्षणी सामान्य माणूस डगमगून गेला असता परंतु गोडबोले ह्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुस्तकवाचनाचा झपाटा लावला, तंत्रज्ञानावरील असंख्य पुस्तके वाचून काढली आणि अल्पावधीत त्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळविले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. जर कोणी निराश झाले असेल त्यांनी हा भाग जरूर वाचवा. एकूणच नक्की वाचण्याजोगे पुस्तक! Must Read!

Sunday, February 3, 2013

सुमेर ग्रह भाग ४



सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता.
सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता.
भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता.

Saturday, February 2, 2013

सुमेर ग्रह भाग ३


वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते.
लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले.
असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता.
दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता.

Friday, February 1, 2013

सुमेर ग्रह भाग २


सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही.
वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले.
पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते.
नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली.

Thursday, January 31, 2013

सुमेर ग्रह


प्रस्तावना
ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल.
भाग १
सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा.
काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची.





 

Wednesday, January 30, 2013

मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्ग अपघात


डिसेंबर महिन्यात मराठी कलाजगताने आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे हे गुणी कलाकार मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघातात गमावले. त्यानंतरही हे द्रुष्ट चक्र कायम राहिले आहे. कालच एक बातमी वाचली की अक्षयचा भाऊ तन्मय आणि आनंद ह्यांची मुलगी सानिका ह्यांनी पुढे असे अपघात होऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्यांचे हे प्रयत्न सफल होवोत अशी माझी मनापासूनची इच्छा!
ह्या संदर्भातील काही मुद्दे!
१> रस्ता दुभाजक कसे असावेत? - सिमेंट कॉंक्रिटचे दुभाजक उभारल्यास वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत होवू शकते आणि गाडी आदळून परत आल्यावर ती गाडी दुसर्या वाहनावर पुन्हा आपटून अजून एक अपघात होऊ शकतो. त्यामुळे ब्रायफेन रोप्स (हा काय प्रकार आहे हे मी जाणून घेतोय!) तंत्रज्ञान वापरण्याचा विचार केला जात आहे.
२> एक्स्प्रेस महामार्गावर प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या स्थितीची तपासणी करण्याची यंत्रणा आणि त्यासाठी खास परवाना असण्याची तरतूद.
३> एक्स्प्रेस महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लायसन्सची तरतूद. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लेन कशा वापरायच्या ह्याचे खोल ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्वात उजवी लेन सर्वात जास्त वेगाने जाणार्या वाहनांसाठी आहे ह्याचे भान ह्या चालकास असावे. आपण जर गाडी वेगाने चालवत नसू तर गपचूप मधल्या किंवा डाव्या लेन मध्ये यावे. मागून वेगात येणाऱ्या चालकास वैतागवु नये. मुंबईत उजव्या बाजूने सायकल चालविणाऱ्या अनाडी लोकांना धडा शिकविण्याचा मार्ग अजून मला सापडला नाही. तसेच लेन (मार्गिका) बदलताना घ्यावी लागणारी काळजी (Blind Spot विषयीचे ज्ञान) हे ही आवश्यक आहे.
४> मद्यपी चालक ह्या महामार्गावर शिरूच शकणार नाही ह्याची कडक यंत्रणा!
आता हे सर्व उपाय लागू होण्यास काही काळ जाईल. तोवर ज्यांना बर्याच वेळा ह्या मार्गावरून जावू लागते अशांनी काय करावे?
१> रात्रीचा प्रवास जमेल तितका टाळावा! रात्री माणसांची जागरुकावस्था कमी असते आणि अधिक अनाडी चालक रस्त्यावर असतात. ह्यातील काही चालक संगणकातील गाड्यांच्या खेळांचा रात्री प्रत्यक्ष रस्त्यावर अनुभव घ्यायचा प्रयत्न करीत असतील असा माझा संशय आहे.
२> शक्यतो मोठ्या गाड्यांतून प्रवास करावा.
३> मागून वेगात येणारे वाहन दिसल्यास त्याला शांतपणे पुढे जावून द्यावे. त्याच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करून नये. त्याचप्रमाणे एखादे संथ चालक समोर असल्यास आपण चिडू नये.
बाकी मला ह्या महामार्गावर गाडी चालविण्याचा अनुभव नाही परंतु ज्यांचा आहे त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे असल्यास सर्वांसोबत वाटून घ्यावीत हीच विनंती!
इतके सर्व म्हटले तरी नशीब हा घटक तर असणारच! अजूनही अक्षयच्या दोन वर्षांच्या मुलाचे चित्र मात्र डोळ्यासमोरून जात नाही!

Sunday, January 27, 2013

बुद्धिभेद



हल्ली सर्वसामान्य लोकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्यात माझाही समावेश आहे. विषय बर्याच वेळा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, प्रदूषण, लग्नातील नातेसंबंध ह्याविषयी फिरताना आढळतात. पण प्रत्यक्ष कृती शून्य! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील विषय हे राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीऐवजी ह्या विषयांभोवतीच घुटमळताना दिसतात. वर्तमानपत्र आणि केबल वाहिन्या ह्यांवरील ह्या समस्यांचे चित्रण थोड्या थोड्या कालावधीने फिरत असते. एक महिना भ्रष्टाचार मग प्रदूषण मग स्त्रियांवरील अत्याचार असे हे चक्र फिरत असते. त्यात आपण मध्यमवर्गीय गुरफटून जातो पुन्हा नवीन विषयाकडे आपले लक्ष वेधले जाते. मूळ समस्या तशाच राहतात. कोणीतरी चाणक्य बसला आहे तिथे आपला बुद्धिभेद करायला

 

Sunday, January 20, 2013

होळीबाजार - आनंदठेवा भाग २


विभक्त कुटुंबपद्धतीचा मोठा फटका नवऱ्यांना बसला. एकत्र कुटुंबात सतत उपलब्ध असणाऱ्या आई वडिलांचे संरक्षक कवच काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे नवरे लोकांना उत्क्रांतीमधून जावे लागले. अमेरिकेत जाऊन राहिलेल्या लोकांवर अजून दुर्धर प्रसंग ओढविला. मुलांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, यंत्राने घर साफ करणे, भाजी आणणे असे कामाचे अनेक पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले. आपआपल्या आवडीनुसार नवऱ्यांनी त्यातील काही कामांची निवड केली आणि वेळ निभावून नेली. त्यातील काहीजण परत भारतात आले. त्यावेळी अमेरिकेत अंगी लागलेल्या सवयी एकदम झटकून देणे त्यांना कठीण गेले. आता नवऱ्या-बायकोचे घरगुती कामाच्या बाबतीतील संबंध तसे मजेशीर असतात. ह्या बाबतीत बायकांचा शब्द प्रमाण मानण्याची बर्याच घरात पद्धत असते. त्याच प्रमाणे नवरे एकंदरीत कॉमनसेन्सच्या बाबतीत मठ्ठ असतात असा बर्याच घरात समज असतो. तुम्हास आश्चर्य वाटेल पण हा समज निर्माण करण्यात नवर्यांचा मोठा हात असतो. एकदा आपल्या नवर्याला मठ्ठ ठरविले (म्हणजेच आपणास चतुर), की बायकांच्या अंगात विलक्षण उत्साह संचारतो आणि त्या घरकामे हा हा म्हणता उरकून टाकतात. आता भारतात परत आल्यावर मुलांना सांभाळणे आणि घरसफाई ह्या दोन कामांचा धोका थोडा कमी झाला. राहता राहिली ती स्वयंपाक आणि भाजी आणणे. अमेरिकेत बायका नवर्याच्या हातचा स्वयंपाक खातात कारण तिथे सहज पर्याय नसतो. इथे परतल्यावर त्यांच्या अपेक्षा उंचावितात आणि त्याला तडा जाणारी कामगिरी एक दोन वेळा पार पाडली की हा धोका कायमचा नष्ट होतो. थेट नकार देण्यापेक्षा हा शांततामय उपाय केव्हाहि चांगला. राहता राहिले ते भाजी आणण्याचे काम!
वसईचा होळीबाजार हा ताज्या भाजीसाठी एकदम प्रसिद्ध! आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी कुटुंबातील प्रामुख्याने स्त्रिया आपल्या वाडीतील ताजा भाजीपाला घेवून इथे भल्या पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल होतात. ह्यात पालेभाज्या, दुधी, वांगी, गवार, कोबी, फ्लॉवर, पडवळ, शिराळा, गलका अशा नानाविध भाज्यांचा समावेश होतो. आमचे आधीच्या पिढीपर्यंत शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब, त्यातील आई वडील, काका, काकी ही मंडळी सुद्धा केळीचे लोंगर घेऊन अधून मधून येतात. सकाळच्या प्रसन्न वेळी हा बाजार कसा गर्दीने भरून जातो. भाज्यांचे भावही अगदी स्वस्त असतात. पालकाच्या जुड्या कधी पाच रुपयाला दोन, उन्हाळ्यात १० रुपयाला दोन दुधी अशा अगदी स्वस्त दरात भाज्या उपलब्ध असतात. भाजीचे हे भाव बघून ह्या बिचार्या विक्रेत्या स्त्रियांना काय फायदा होत असेल असा विचार मनात डोकावतो. परंतु ह्या स्त्रिया स्वाभिमानी असतात. आपण एखाद्या भाजीचे ५ - १० रुपये जास्त देऊ केले तर 'तुझ्या पाच रुपयाने मी काय श्रीमंत होणार नाही' असे सुनावून त्या ती नोट परत करतात. मी ह्या बाजारात सहसा भाजीचे भाव करीत नाही. घरी आल्यावर मला किती रुपयाला भाजी आणली हे विचारायचे नाही हा आमचा अलिखित नियम. दहा रुपयाला ओल्या कांद्याच्या दोन जुड्या असा भाव मला सांगताच मी थोडी घासाघीस करीन अशी समोरच्या भाजीवालीची अपेक्षा पण मी सरळ दहा रुपये देवून निघून जाताच, लगेच माझ्या मागे धावत येवून पिशवीत अजून एक जुडी टाकणारी भाजीवाली फक्त इथेच मिळू शकते. बाकी मला साठ वर्षांच्या वरील भाजी विक्रेत्या प्रेमाने अंकल हाक मारतात तेव्हा हल्ली मी जास्त राग मानीत नाही. उलट मला अंकल आठवतो.
होळीच्या आसपास राउत, घरत ही मोठी कुटुंबे. त्या कुटुंबातील बरीच माणसे सकाळी बाजारात दिसतात. त्यामुळे आपल्या सामान्यज्ञानात भर पडते. एकंदरीत नात्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत माझी बोंबच! पण सतत इथे लोकांना बघून माझी थोडीसुधारणा झाली आहे. आज भाई (माझ्या वडिलांचे टोपण नाव) नाही आले वाटते, असे सुरुवातीला मला विचारले जायचे परंतु आता त्यांनाही मला आणि बायकोला बाजारात बघण्याची सवय झाली आहे. समाजातील ताज्या बातम्याही इथे मिळतात, कोणाला प्रशीलच्या दवाखान्यात दाखल केले, कोणाच्या नणंदेच्या दिराचे चिंचणीला लग्न जमले ह्या सर्व बातम्या इथेच मिळू शकतात. लोंगर किती रुपयाला द्यायचे ह्याविषयी आई बाकीच्या ओळखीच्या लोकांशी सल्लामसलत करून मगच उत्तर भारतीय घाऊक विक्रेत्याला विकते. तो पर्यंत वडील बाहेर स्कूटर पार्क करून स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनांवर आपल्या मित्रांसोबत आपली मते नोंदवीत असतात. बाजार संपला की लक्ष्मीविलास, भगवतीविलास मधील गरमागरम वडे आणि जिलब्या ह्यांचा आस्वाद घ्यायला पावले आपसूकच वळतात. आठ वाजता मग हा शेतकऱ्यांचा होळी बाजार आटोपतो आणि मग व्यावसायिक विक्रेते हीच भाजी चढ्या दराने बाजूच्या मार्केट मध्ये विकू लागतात.
मध्येच एकदा वडिलांना शंभर रुपये गड्याला देऊन सकाळच्या थंडीत उठून दीडशे रुपयाचे लोंगर विकण्याचे अर्थशास्त्र समजून देण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले हे अर्थशास्त्राच्या पलीकडचे आहे. मग मला संगत लागली ती ह्या लोंगर किंमतीमागची, पाच रुपयातल्या पालकाच्या २ जुड्यांची. हा असतो इथल्या लोकांचा आनंदठेवा. समाजाशी असलेला त्यांचा संवाद. पैश्याने भले हे लोक श्रीमंत नसतील पण हा बाजार त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. इथे येणारा माणूस प्रसन्न होऊनच जातो. इथल्या लोकांपैकी कोणी जास्त तणावात असतील असे मला वाटत नाही. असे हे होळीबाजार टिकविणे आपले कर्तव्य आहे.

Saturday, January 19, 2013

फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटे

 



२००३ सालची गोष्ट. कंपनीने माझी फ्लोरिडात कामानिमित्त नेमणूक केली होती. मी सहकुटुंब गेलो होतो. अमेरिका हा देश तसा राहण्यासाठी उत्तम परंतु नव्याने जाऊन राहणाऱ्या माणसांना सुरवातीच्या कालावधीत काही कठीण गोष्टींचा मुकाबला करावा लागतो. जसे की क्रेडीट हिस्टरी नसल्याने क्रेडीट कार्ड न मिळणे, स्वतःचे घर लगेच मिळते परंतु ते पूर्णपणे रिकामी असणे वगैरे वगैरे. त्यात अजून एका बाबीचा समावेश करता येईल आणि ती म्हणजे स्वतःचे वाहन आणि लायसन्स मिळण्यास वेळ लागणे.



थोडे विषयांतर, अमेरिकेत एकोणीसशे साठ - सत्तरीच्या आसपास स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या जीवनावर अपर्णा वेलणकर ह्यांचे एक सुंदर पुस्तक 'फोर हिअर ओर टू गो' हे मी माझ्या मित्राच्या शिफारसीमुळे वाचले. मध्यमवर्गातून आर्थिक अडचणीचा मुकाबला करणारी मराठी पिढी हिम्मत करून अमेरिकेत पोहोचते. कष्ट करण्यास बिलकुल मागे न पाहणाऱ्या ह्या पिढीच्या विविध यशोगाथा लेखिकेने समर्थपणे रेखाटल्या आहेत. ह्यात जसे नोकरीत यशस्वी झालेले लोक आहेत तसे व्यवसायातील सुद्धा. नियमाला अपवाद म्हणून अमेरिकेत व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी झालेल्या कुटुंबाची कथाही लेखिकेने वर्णिली आहे. मुले मोठी होतानाची ह्या पिढीचा मानसिक संघर्षही आपल्याला वाचायला मिळतो. लक्षात राहिली ती एका अत्यंत यशस्वी व्यावसायिकाच्या पत्नीने लेखिकेकडे व्यक्त केलेली खंत! सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात नवरा एकदम साधा, रसिक होता. परसदारी मोगरीचे रोप लावून पहिल्या घरात गृहप्रवेश करण्याइतका रसिक. पुढे मात्र तो हरवतच गेला तो त्याच्या स्वप्नात, आणि त्याच्या महत्वाकांक्षेत! हे सारे यश तर मिळाले परंतु माझ्यासाठी त्याला कधी वेळच मिळाला नाही. माझ्या मर्यादित वेगात मी मात्र तशीच राहिले. फरफटल्यासारखी त्याच्यामागे ओढली गेले. आता तो थोडा स्लो डाउन करतोय, घरात वेळ काढतोय परंतु आता आमच्या तारा का कोणास ठाऊक जुळतच नाहीयेत! बघा जमले तर पुस्तक मिळवून वाचा!



असो तर माझ्या अशा सुरुवातीच्या दिवसात मी बसने ऑफीसला जायचो. अमेरिकत बसने प्रवास करणारे लोक फार कमी. तर बस थांबा आणि ओफीस ह्यामध्ये काही अंतर होते. वेस्टन इथल्या ह्या ऑफीसच्या आसपास दाट झाडी होती. दुसर्याच दिवशी डोक्याच्या जवळून एक मोठा पक्षी (कावळ्याच्या दुप्पट आकाराचा) गेल्याचा भास झाला. योगायोगाने तो उडत गेला असेल अशी मी समजूत करून घेतली. दुसर्या दिवशीही तोच प्रकार. मग मी हळूच नव्याने ओळख होत असलेल्या सहकार्यांकडे हा विषय काढला. त्यावेळी एक आश्चर्यकारक सत्य पुढे आले हे पक्षी आपल्या विणीच्या मोसमात आपल्या लहान पिल्लांविषयी अत्यंत जागरूक असतात. रस्त्याने मनुष्य क्वचितच जात असल्याने त्यांना मनुष्यांची सवय नसते. त्यामुळे हे कधीतरी जाणारी माणसे आपल्या घरट्यावर हल्ला तर करणार नाहीत ना ह्या भीतीने ते माणसांवर हल्ला करतात. त्यानंतरचे अजून एक दोन आठवडे मी बसने प्रवास केला तेव्हा कधी लांबचे वळण घेवून तर कधी डोक्यावर छत्री घेवून मी दिवस काढले.



ह्यावर्षी बायको आणि मुलाने चिमणीघरटे आणून बोरिवलीच्या घरी बसवायचा हट्ट धरला. घरटे आणून बसविणार्या माणसाने आम्हास व्यवस्थित समजाविले. पावसाळ्यात चिमण्या काही ह्यात येणार नाहीत. पावसाळा संपल्यानंतर त्या बहुदा येतील. मुलगा बराच अधीर झाला. चिमण्या बर्याच वेळा घरट्यात डोकावून जायच्या पण नंतर काही दिवस गायब व्हायच्या. नाताळच्या सुट्टीत आम्ही बोरिवलीला नव्हतो आणि परत आल्यावर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. चिमण्यांचे एक पूर्ण कुटुंब (मुलाच्या भाषेत टकलू पिल्लांसाहित) वास्तव्यास आले होते. ह्या आठवड्यात मुंबईत पडलेल्या मस्त थंडीच्या अशाच एका प्रसन्न सकाळी आई बाबा चिमणीचा काढलेला हा फोटो.




Thursday, January 17, 2013

जिद्दी लढवय्या सौमिक चटर्जी



बहुतांशी भारतीय लोक क्रिकेटचे चाहते असतात. त्यातील बरेचजण कडवे चाहते असतात. लोकांचा क्रिकेटमधला रस विविध कारणांसाठी असतो. काहीजण विशिष्ट संघाचे चाहते असतात, IPL नंतर चाहत्यांचा हा वर्ग थोडा गोंधळून गेला आहे. काहीजण विशिष्ट खेळाडूंच्या खेळाचे चाहते असतात. तर काही महिला चाहत्या विशिष्ट खेळाडूंच्या चाहत्या असतात. माझ्या माहितीतला असा सद्यकालीन खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. असे खेळाडू सामान्य पुरुषवर्गाच्या मनात असूया निर्माण करतात. काही चाहत्यांना क्रिकेटच्या आकडेवारीत बराच रस असतो. अमोल मुझुमदार हा रणजी मधला सर्वकालीन अधिक धावा जमविणारा खेळाडू आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर हे चाहते छातीठोकपणे देऊ शकतात.
मी १९८५ च्या अझहरच्या खेळाचा, १९९६ मधील विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या खेळाचा चाहता होतो. ipl येण्याआधी मी भारतीय संघाचा जबरदस्त चाहता होतो. परंतु माझा मुख्य प्रकार क्रिकेटच्या आकडेवारीचा! १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत विन्स्टन डेविसने ५१ धावात ७ बळी घेतले किंवा पाकिस्तानच्या जलालुद्दीनने एक दिवसीय सामन्यात पहिली HATTRIK घेतली हे मला लहानपणापासून लक्षात ठेवायला आवडते. बाकी HATTRIK ला मराठी प्रतिशब्द शोधायला हवा. पूर्वी क्रिकेट जरा कमी खेळले जायचे तेव्हा ही आकडेवारी लक्षात ठेवायला सोपे जायचे. आता कसं, जवळजवळ दर वर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारतात येतो आणि भारतीय संघ लंकेत जातो. त्यामुळे २००७ च्या भारताच्या लंका दौऱ्यात काय झाले आणि २००९ मध्ये काय झाले हे लक्षात ठेवायला बराच गोंधळ उडतो.
क्रिकेटच्या चाहत्यांचा अजून एक प्रकार म्हणजे ते रणजी सामने भक्तिभावाने FOLLOW करतात. FOLLOW ला सुद्धा मराठी शब्द हवा. अशा चाहत्यांसाठी क्रिकइन्फो हे संकेतस्थळ म्हणजे देवघर आहे. भारतीय घरगुती हंगामातील १९०० सालापासूनच्या सामन्यांची आकडेवारी त्यांनी उपलब्ध ठेवली आहे. त्यामुळे गावस्कर रणजीमध्ये सुद्धा कसा दादा होता हे आपण तिथे जाऊन पाहू शकतो. मुंबई दिल्ली ह्यांच्यातील अंतिम सामना म्हणजे पूर्वी पर्वणी असायची. दोन्ही संघाचे पहिले डाव सुद्धा पाच दिवसात पूर्ण व्हायचे नाहीत. एकदा बहुदा त्यांनी सहा दिवसांचा अंतिम सामना ठेवला होता. एकदा संदीप पाटील खेळत असताना संध्याकाळी सात वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत सामना चालू राहिला आणि मुंबईने तो अगदी जरया करता सामना हरला. ९० च्या आसपास कपिलच्या हरयाणाने मुंबईला अंतिम सामन्यात एका धावेने हरविले ह्याचे अजूनही मला वाईट वाटते. पूर्वी मुंबई ब वर मुंबईच्या रणजी सामन्यांचे धावते वर्णन असायचे आणि पुणे केंद्रावर महाराष्ट्राच्या सामन्यांचे! राजू भालेकर आणि मिलिंद गुंजाळ हे फार मोठे खेळाडू आहेत असा हे धावते वर्णन ऐकून झालेला समज अजूनही कायम आहे. बाकी मराठी समालोचना मुळे झालेला एक विनोद मी लहानपणी ऐकला होता. तो खरा की काल्पनिक हे माहित नाही. 'यष्टीरक्षकाने गलथान पणा दाखविला आणि त्यामुळे जिथे प्रतिस्पर्धी संघाला एकही बाय मिळाली नसती तिथे चार बाया मिळाल्या!
असो स्टार क्रिकेट रणजी सामन्याचे हल्ली थेट प्रक्षेपण करते. मी ते घरी शांतताभंग होणार नाही ह्याची काळजी घेत बघतो. तसा माझा मित्र चारुहास खामकरहि पाहतो. मुंबईने मध्य प्रदेशला गेल्या महिन्यात ६ धावेने हरविले त्यावेळी आमच्या दोघांचा आनंदाने कंठ दाटून आला. बाकी आर्थिक सुबत्तेने भारतीय मैदाने आता हिरवीगार झाली आहेत त्यामुळे सामना बघण्यास खूप मजा येते. मध्य प्रदेशचा पांडे हा गोलंदाज पुढे चमकेल ह्याचा मी आणि चारू ह्यांच्यासारख्या स्वयंघोषित जाणकार लोकांना आत्मविश्वास आहे. काल मुंबईच्या आदित्य तरे आणि पूर्वीचा होतकरू खेळाडू अजित आगरकर ह्यांनी सेनादलाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद शतके झळकविली. क्रिकेट कसा खेळ आहे पहा ना, आगरकरचे ह्या पूर्वीचे एकमेव प्रथम श्रेणीतील शतक क्रिकेटच्या मक्केवर लॉर्डसवर होते. आणि मुंबईच्या संघातील दुसरा महान खेळाडू सचिन ह्याला मात्र लॉर्डसवर शतक नोंदविता आले नाही.
रणजीच्या उपांत्यपूर्व एका सामन्यात सेनादलाने उत्तर प्रदेशचा अनपेक्षितरित्या पराभव केला. उत्तर प्रदेश संघाने साखळी सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व गाजविले होते आणि ते ह्या उपांत्य सामन्याचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. परंतु सेनादलच्या गोलंदाजांनी कमाल करून उत्तर प्रदेशला रोखले. तरीही चौथ्या डावात शंभरच्या आसपासचे लक्ष्य गाठताना सेनादलाची ५ बाद ५४ अशी नाजूक स्थिती झाली होती. त्यावेळी त्यांचा लढवय्या कप्तान सौमिक चटर्जी ह्याने जखमी अवस्थेतही उत्तर प्रदेशच्या संघाच्या गोलंदाजांना रोखून धरले. रनर बहुदा मिळाला नसावा त्याला, हल्लीच्या बदलेल्या नियमांमुळे. परंतु तो धावला, त्यांच्यावर गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा मारा केला तर त्याने त्या चेंडूंना सीमापार भिरकावून दिले. अशा जखमी अवस्थेत त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. अशा ह्या सेनादलाच्या जिद्दी खेळाडूला माझा सलाम.
आजचा हा ब्लॉग एकूणच भारतीय सेनादलाच्या जिद्दी जवानांना समर्पित. देशाने आदर्श ठेवायचे असतील, तर ह्या जिद्दी जवानांचे ठेवावेत!

 

Monday, January 14, 2013

आनंदठेवा!



हल्ली वसईत दोन तीन लग्नाला हजर राहिलो. पूर्वी मी लग्नाला जायला उत्सुक नसायचो. परंतु मग मला बऱ्याच गोष्टी समजावण्यात आल्या. जसे की प्रत्येक घराचा एक प्रतिनिधी गावातील लग्नाला उपस्थित असला पाहिजे. ही झाली आपली कौटुंबिक जबाबदारी. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मांडवाला शोभा आणण्यासाठी पुरुष उपस्थित हवेत. पुरुषांनी फक्त मांडवात जाऊन बसायचे. मग जे गावात चर्चा करणारे लोक असतात ते म्हणतात 'लग्नाला एवढा लोक आलेला, एवढा लोक जेवला' वगैरे वगैरे..तर ही झाली सामाजिक जबाबदारी. आपली सामाजिक जबाबदारी कोणती आणि ती आपणास पार पाडावयास हवी ह्याचे भान प्रत्येकास वेगवेगळ्या वेळी येते. मला ते थोडे उशिराने आले असो. तर असे मुद्दे ऐकल्यावर मी सुधारलो आणि आता लग्नाला जमेल तसे जातो. तरी जिच्या मुलाच्या लग्नाला मला उपस्थित राहता आले नाही अशा एका आत्याने मला शनिवारच्या लग्नात जोरदार ओरडा दिला. हल्ली कोणी हक्काने ओरडले की बरे वाटते, त्यामुळे मी दोन तीनदा तिच्यासमोर गेलो. तिसऱ्या वेळी मात्र ती शांत झाल्याने मी थोडा निराश झालो.
एकंदरीत शनिवारच्या लग्नात मस्त वातावरण होते. वसईची थंडी एकदम जोरात नसली तरी वातावरणात सुंदर गारवा होता. वाडीच्या भागात मोठा प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. शनिवारीची रात्र असल्याने सर्वजण फुरसतीत होते. प्रशस्त मंडपामुळे गर्दी विभागली गेली होती. पाटील कुटुंबियातील बरीच मंडळी ह्यावेळी भेटली. गावातील लोकांचे (आणि हल्ली माझेही) बरे असते त्यांना जीवनात आनंदी होण्यास फारसे काही लागत नाही. ओळखीची चार माणसे भेटली आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या की बरेच दिवस पुरणारा आनंदठेवा मिळतो. आणि ह्या गप्पांमध्ये बढाईचा लवलेशही नसल्याने आपण मोकळ्या मनाने गप्पा मारू शकतो.

एकंदरीत काय वयानुसार माणसाच्या आनंदाच्या संकल्पना बदलू लागतात. हळू हळू मी ही सामाजिक प्राणी बनू लागलो आहे. परंतु वयानुसार बदलण्यातच खरी मजा असते हे हल्ली मला हळू हळू जाणवू लागले आहे.
 

Sunday, January 13, 2013

अर्जुनाची निवड.


महाभारतातील एक गोष्ट. अर्जुन आणि एकलव्य दोन्ही निष्णात धनुर्धर. त्यावेळचे नावाजलेले गुरु द्रोणाचार्य एकलव्याचे धनुर्धारी क्षेत्रातील नैपुण्य पाहून चिंतीत होतात आणि त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांना माहितच आहे. शेवट असा होतो की अर्जुन हा पुढील स्पर्धांसाठी निवडला जातो तो त्याच्या घराणेशाही मुळे. त्याचे एकलव्यासारखे त्याच्या इतकेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी केवळ राजघराण्यातील नसल्याने डावलले जातात.

निरीक्षण असे की एकलव्य आजही आहेत. मुंबई रणजी संघाच्या १४ वर्षे खालील संघाच्या निवडीने प्रभावित अनामिक एकलव्या, तुझ्यासाठी हे सहानभूतीचे दोन शब्द!
 

Thursday, January 10, 2013

दिल्लीतील दुर्देवी घटना



गेल्या महिन्यात दिल्लीतील घडलेल्या दुर्देवी घटनेबद्दल बऱ्याच जणांनी लिहिले. त्यातील काही मुद्दे मला वेगळे वाटले. त्यांचा हा संक्षिप्त आढावा.
१> दिल्ली शहराची संरचना - लेखकाच्या म्हणण्यानुसार दिल्लीची जी गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे त्यात लांबलचक पसरलेले रस्त्यांचे जाळे आहे. ह्या रस्त्यांच्या आजूबाजूचा बराचसा भाग अजूनही मोकळा आणि निर्जन आहे. रस्त्याच्या नाक्यावरील किराण्याचे दुकान, रस्त्यावरील वर्दळ हा प्रकार तिथे अस्तित्वात नाही. रस्त्यावरील कान आणि डोळे उपस्थित नसल्यामुळे रात्री एकट्या स्त्रियांसाठी असा भाग धोक्याचा ठरू शकतो. अमेरिकतही अशी स्थिती आहे पण तिथे बहुतांशी लोकांकडे स्वतःची वाहने असल्याने तुम्ही सामान्य परिस्थितीत बर्यापैकी सुरक्षित असू शकता. माझे म्हणणे - थोडक्यात काय तर भारतातील शहरे हळू हळू फक्त श्रीमंत लोकांसाठी राहण्यायोग्य बनू लागली आहेत. अशा शहरात राहण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक ताकद असणे आवश्यक असते. अन्यथा तुम्हाला दुष्कर जीवनाचा मुकाबला करावा लागतो. जर तुमच्याकडे आर्थिक ताकद नसेल तर तुम्हाला खूप सतर्क राहावे लागते. एखाद्या शहरातील सुरक्षित ठिकाणे, वेळा ह्याची प्रथम माहिती करून मगच तिथे जाण्याचे धाडस करावे.
२> उत्तर भारतीय पुरुषांची मानसिकता - उत्तर भारतातीलच एका कवी / लेखकाने हा काहीसा चाकोरीबाहेरचा विचार मांडला. तो म्हणतो की उत्तर भारतीय पुरुषांनी बरीच वर्षे परकीयांचे आक्रमण सहन केले, फाळणीचा मोठा फटकाही त्यांना बसला. ह्या दोन्ही प्रकारात त्यांनी आपल्या नातलग स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचा विदारक अनुभव घेतला. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची कटुता निर्माण झाली. आपल्या कुटुंबावर ओढविलेल्या दुर्धर प्रसंगाला स्त्रिया जबाबदार आहेत अशी काहीशी मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या मनातील स्त्रियांविषयीची आदरभावना नष्ट झाली आहे. त्यांची ही मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशाची गरज आहे असे त्याचे म्हणणे होते. प्रथम दर्शनी मी हे म्हणणे अजिबात स्वीकारले नाही. परंतु नंतर मात्र ह्या विचाराचा थोडा खोलवर जाऊन विचार करावा असे मला वाटले. त्यावर पुन्हा कधीतरी.
आता माझे काही म्हणणे. स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या भारतातील लोकांचे मानसिकदृष्ट्या आधुनिकता स्वीकारलेले आणि न स्वीकारलेले असे दोन प्रकार आहेत. मानसिक आधुनिकता स्वीकारलेले लोक प्रथम आपल्या लक्ष्याला वश करून घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यात यश न आल्यास मग ते निषिद्ध मार्ग अवलंबितात. शहरातील स्त्रियांचा मुख्य प्रश्न म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनात मानसिक दृष्ट्या मागासलेल्या पुरुषवर्गाचा बऱ्याच वेळा सामना करावा लागतो. स्त्रियांच्या आधुनिक पेहरावाचा, बोलण्या चालण्याचा ते वेगळा अर्थ घेतात. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहावे लागेल.
एकंदरीत काय तर एक तर आर्थिक दृष्ट्या खूप सबळ बना आणि तसे जमत नसेल तर मग सार्वजनिक जीवनात खूप सतर्क राहा. एखाद्या समाजातील सर्वात दुर्बल घटकाच्या स्थितीवरून त्या समाजाच्या परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाल्यास आपली स्थिती झपाट्याने ढासळत चालली आहे हे मात्र नक्की.

Tuesday, January 8, 2013

पट मांडला - अंतिम भाग



निवेदन
ही कथा अचानक आटोपती घेतोय. मागचे काही भाग मनासारखे झाले नाहीत. कथानकातील रंगत काही वाढली नाही. वाचकसंख्या कमी होऊ लागली. एकंदरीत संदेश लक्षात घेऊन ही कथा / किंवा हे पर्व आज संपवतोय. पूर्ण कथा काही लिहित नाहीये. पण पुढील प्रमुख घटना अशा!
  1. आश्लेषा आणि संपत ह्यांची जुनी मैत्री भाऊरावांना समजते. तिला विपर्यस्त रूप देण्याचा ते आणि त्यांचे हस्तक प्रयत्न करतात. त्यामुळे संपतरावांच्या संसारात थोडे वादळ निर्माण होते. आपल्या मुलीच्या संसाराला वाचवायला विश्वासराव पुढे सरसावतात. भाऊरावांना ते वेळीच आवरतात.
  2. जाधवांचे फासे हळू हळू भाऊरावाभोवती पडतात. शेवटचा प्रयत्न म्हणून भाऊराव विश्वासरावांना त्यात अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यात यश न आल्याने भाऊरावास तुरुंगात जावे लागते.
  3. संपतराव अपेक्षेनुसार निवडणूक जिंकतो.
  4. निवडणुकीत कोणत्याही पक्षास निर्णायक बहुमत मिळत नाही. तरुण संपतरावांना आणि १० आमदारांच्या एका गटास फोडण्यास अण्णासाहेबास यश येते. ह्याचे पारितोषिक म्हणून संपतरावाचा मंत्रिमंडळात आश्चर्यकारकरित्या समावेश होतो. आणि अशा प्रकारे ह्या पर्वाचा गोड शेवट होतो.
lessons learned (ह्या प्रयत्नातून शिकलेले धडे)
  1. कथेचा मुख्य बिंदू जिथे भाऊरावांच्या हस्तकांकरवी विजयरावांचा अपघाती खून होतो हे फारसे काही पटण्याजोगे नव्हते.
  2. कथेत रहस्य निर्माण करण्यात अपयश आले. सर्व काही कथेत आधीच अप्रत्यक्षपणे सांगून टाकण्यात आले.
  3. राजकीय वातावरणाची खोलवर निर्मिती करण्यात अपयश आले.
दुसरे पर्व (पुढील वर्षी ह्याचा प्रयत्न करीन)
  1. पक्षाचे युवा नेते मुकुल ह्यांच्या आशीर्वादाने संपतराव पुढे येतात. १० वर्षात मुख्यमंत्री आणि अजून ५ वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतो. दुसर्या पर्वात ह्याचे वर्णन असू शकते.
 

Monday, January 7, 2013

व्यावसायिक दुष्परिणाम आणि मराठी मालिकेतील कलाकार



प्रत्येक व्यवसायाची चांगली तशी वाईट बाजूही असते. आपण ज्या व्यवसायात असतो तिची वाईट बाजू आपल्यास सतत दुःख देत असते आणि दुसर्यांच्या व्यवसायातील चांगल्या बाबींचा आणि त्या दुसऱ्याचा आपण हेवा करीत राहतो. उदाहरण द्यायची झाली तर माहिती आणि तंत्रज्ञान व्यवसायातील लोक बक्कळ पैसा कमवितात असे बाकीच्यांना वाटते परंतु त्या व्यवसायातील लोकांनी अकाली पिकेलेले केस, पडलेले टक्कल, सुट्टीच्या दिवशी संगणकावर बसल्यावर बायकोने केलेली कटकट ह्यांचा सामना करावा लागतो. डॉक्टर लोकांना बाकीचे लोक, नातेवाईक वेळी अवेळी फोन करून सतावतात. क्रिकेटर लोकांना आपल्या कुटुंबियांसमवेत कमी वेळ मिळतो, ते आपल्या मुलांच्या बालपणाला मुकतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना दोन पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो, तर फक्त गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना समाजमान्यता कमी प्रमाणात मिळते आणि त्यांना लवकर वैफ़ल्य येवू शकते. नवलेखकांची बाकीचे लोक टर उडवितात तरीही त्यांना आपला दांडगा आत्मविश्वास कायम ठेवावा लागतो वगैरे वगैरे..ही यादी न संपणारी आहे.
आज हा विषय सुचायचे कारण म्हणजे त्या दिवशी झी मराठी वाहिनीवर बघितलेला वार्षिक गौरव समारंभ! रविवारी संध्याकाळी असे गौरव समारंभ मी आवर्जून पाहतो. सगळे कसे चकचकीत आणि सुंदर असते. सेट, निवेदक, मंचावर येवून आपल्या कला सादर करणारे कलाकार आणि प्रेक्षक वर्गही. आयुष्यातील सर्व समस्या माझ्याभोवती रविवारी संध्याकाळी पिंगा घालायच्या. तशा अजूनही घालतात, पण असे गौरव समारंभ बघितल्यावर मात्र माझे मन गोंधळून जाते. बघ जग कसे सुंदर आहे, जगात कसा आनंद आहे आणि तू वेडा समस्यांचा विचार करीत बसला आहेस. असे मनाला गोंधळून टाकल्यावर रविवार संध्याकाळ निघून जाते.
असो लेखाचा विषय थोडा बाजूला पडला. त्या वार्षिक गौरव समारंभात होणाऱ्या अनेक नृत्यांमधील काही नृत्यांत मला कुलवधुची नायिका पूर्वा गोखले, कळत नकळत ची नायिका ऋजुता देशमुख दिसल्या. गेल्या वर्षी एकदम प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या ह्या नायिका आज फारशा कोठे दिसत नाहीत. मग आठवला तो आपली डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ अभिनयात शिरलेला निलेश साबळे आणि त्यानंतर कुंकुची गुणी नायिका मृण्मयी देशपांडे. ही सर्व गुणी कलाकार मंडळी, पण सतत नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या मराठी वाहिन्यांच्या धोरणामुळे ही कलाकार मंडळी आज थोडी मागे सारली गेली आहेत. आता नवीन कलाकार खरोखर गुणी आहेत की नाही हा वादाचा मुद्दा. असो बिचारे हे गुणी कलाकार आपले सर्वस्व ह्या अभिनयाच्या क्षेत्राला वाहून देतात आणि एक वर्ष दोन वर्षात नजरेआड जातात. बाकीच्या व्यवसायात तुमची साथ देण्यासाठी HR खाते तरी असते. इथे ह्या कलाकारांना तसे कोणी नाही असला तर वार्षिक गौरव समारंभ!

Sunday, January 6, 2013

मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैली



मागे अशाच एका चर्चेच्या वेळी एक मुद्दा बोलण्यात आला. कोणत्याही कालावधीत जुनी आणि नवीन पिढी यांत संघर्ष सुरूच असतो. ही इतिहासापासून परंपरा आहे. जुन्या पिढीला नवी पिढी बंडखोर आणि परंपरांचे पालन न करणारी वाटते तर नव्या पिढीला जुनी पिढी बुरसटलेल्या विचाराची वाटते. प्रत्येक कालावधीत जी पिढी जिंकते ती त्या कालावधीचे भवितव्य ठरविते . सध्याच्या कालावधीत हा संघर्ष थोडा असमान शक्तींचा सुरु आहे, कारण सध्याची जुनी पिढी नवीन तंत्रज्ञानाने हबकून गेली आहे. तिने आपला आत्मविश्वास गमाविलेला आहे आणि त्यामुळे नव्या पिढीला निर्बंध घालणारे जुन्या पिढीतील फारशी लोक नाही आहेत. परंतु चित्र वाटते तितके निराशावादी नाही आहे. तंत्रज्ञानाने शिकली सवरलेली पिढी आता चाळीशी ओलांडून गेली आहे. वयामुळे येणारी परिपक्वता ह्या पिढीत आली आहे आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाची भीतीही ह्या लोकांना नाही, त्यामुळे जुन्या आणि नवी पिढीतील संघर्षात ही चाळीशीच्या आसपासची लोक मोलाची कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.
जर आपण १९९० साल, हे भारतातील आर्थिक बदल सुरु होण्याचे प्रमाणभूत वर्ष मानले तर त्यानंतर गेल्या २० वर्षात आलेल्या नवीन गोष्टी कोणत्या? मॉल, पिझ्झा, IPL , विभक्त कुटुंबे, मैदानी खेळाकडून संगणकीय खेळांकडे संक्रमण, उंचावलेली जीवनशैली अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारतीयांचा एकंदरीत समाज म्हणून विचार केला तर ह्या सर्व गोष्टी पिढ्यानपिढ्या भारतीयांनी अनुभवल्या नव्हत्या त्यामुळे एक समाज म्हणून ह्या गोष्टींचे आकर्षण आपणास वाटणे स्वाभाविक होते. परंतु आता वीस वर्षांचा कालावधी ओलांडून गेल्यावर एक समाज म्हणून ह्या गोष्टींकडे एका प्रगल्भतेने बघण्याची आवश्यकता आहे. ह्यातील कोणत्या गोष्टी किती प्रमाणात स्वीकारणे सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थाच्या दृष्टीने योग्य आहे याचा वैयक्तिक पातळीवर विचार करणे आवश्यक आहे. आता वैयक्तिक पातळीवर का तर आज कोणीही दुसऱ्याचे सहजासहजी ऐकत नाही. काळ कितीही बदलो, तुमचे तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंध जर एकदम सुदृढ असतील तर बाकीच्या अन्य घटकांची प्रतिकूलता सहज सहन करू शकता. गेल्या काही वर्षात आपण आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित केल्यावर आता पुन्हा काही काळ वैयक्तिक नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करायला हवे. सध्याच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने प्रगती करण्याची गरज नाही आहे ती कायम ठेवली म्हणजे झाले.

Friday, January 4, 2013

पट मांडला - भाग दहावा


दिवेपुरच्या मतदारसंघाचे विस्तृत विश्लेषण देण्याची बातमी आश्लेषासाठी तशी अनपेक्षितच होती. मग तिला आठवला तो तिचा महाविद्यालयीन कालावधी. नगर जिल्ह्याच्याच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या गावात वाढलेली आश्लेषा गावात चांगले महाविद्यालय नाही म्हणून दिवेपुरला शिकण्यासाठी आली. कला शाखेत शिकणाऱ्या आश्लेषाला मराठीत फार रस होता, मराठीतील लिखाण, वक्तृत्व अशा दोन्ही पातळीत तिने लगेचच प्रसिद्धी मिळविली. कॉलेजातील स्पर्धांमध्ये तिने चांगलेच नाव कमावले होते. अशाच एका स्पर्धेत तिची ओळख बुजऱ्या संपतशी झाली होती. वाणिज्य शाखेतील संपत त्या स्पर्धेत स्वयंसेवकाचे काम करीत होता. ही ओळख हळूहळू मैत्रीत रुपांतरीत झाली. परंतु त्या पुढच्या पातळीवर हे नाते नेण्यासाठी ना बुजऱ्या संपतने पुढाकार घेतला ना आश्लेषाने धीटपणा दाखविला. आणि मग बघता बघता कॉलेजचे दिवस संपले आणि आश्लेषा लग्न करून मुंबईला निघून गेली. आणि आता दहा वर्षानंतर एका वळणावर आता हे दोघे परत भेटणार होते. हा बुजरा संपत अचानक इतका बंडखोर बनण्याइतपत धीट कसा झाला ह्याचेच आश्लेषाला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
जाधवांचा तपास जोरात चालू होता. रमाकांतनेच विजयरावांच्या जीपचे काम केले होते. त्या आधीच दोन दिवस विजयरावांनी जीपचे सर्विसिंग केले होते, आणि त्यात सर्व काही ठीकठाक असल्याचे कागदही जाधवांनी तपासून पाहिले. जीपच्या विश्लेषणानुसार तिचे ब्रेक फेल झाले होते. रमाकांतने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आणि रमाकांतला अन्नातून विषबाधा कोणी केली ह्याकडे आता जाधवांनी लक्ष केंद्रित केले. जाधवांची बाईक गराजमध्ये पोहचली. त्या दिवशी रमाकांत जीपवर काम करीत असताना त्याने जेवण कोठून घेतले ह्याचा त्यांनी तपास सुरु केला. रमाकांत घरूनच डबा आणायचा अशी माहिती त्यांना देण्यात आली. रमाकांतच्या घरी अजून शोकाकुल वातावरणच होते. परंतु जाधवांना आपले कर्तव्य बजावायचे होते, त्यांनी हळू हळू रमाकांतच्या बायकोकडे त्यादिवशीच्या घटनांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी रमाकांतच्या मुलानेच डबा नेवून दिला होता. मुलगा कोपऱ्यात पुस्तक घेवून बसला होता. जाधवांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. 'डबा नेवून देताना वाटेत कोठे थांबला होतास का?' जाधवांनी त्याला विचारले. मुलाने आठविण्याचा प्रयत्न केला. 'हो हो, मध्येच एक काका भेटले होते आणि त्यांनी मला बोलावून चॉकलेट दिले आणि एक लिफाफा समोरच्या दुकानदाराला द्यायला सांगितला'. तो म्हणाला. तू काय कोणीही सांगितले की ऐकतोयस का? जाधवांनी थोड्या रागाने विचारले. ' असं कसं, मी त्यांना नेहमी सभेला वगैरे बघतो आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते', मुलगा म्हणाला. 'लिफाफा दुकानदाराला देईपर्यंत तू डबा त्यांच्या हाती दिला असशील ना?' जाधवांच्या ह्या प्रश्नाला मुलाने होकारार्थी उत्तर दिले. जाधवांच्या ह्या भेटीची बातमी योग्य (अयोग्य) ठिकाणी पोहचली होती.
राज्यातील स्थिती एकदम दोलायमान होती. सत्ताधारी पक्षाला बहुमताची खात्री वाटत नव्हती आणि विरोधी पक्षांच्या युतीचे कडबोळे काही चांगल्या स्थितीत नव्हते. जितेंद्ररावांचा पक्ष युतीतील मुख्य घटक असला तरी जागावाटपात त्यांच्या पक्षाला मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर समीकरण कसे असणार ह्याचेच आडाखे बांधण्याचा जितेंद्रराव विचार करीत होते. इथे अण्णासाहेब आणि सुजितकुमारांची स्थिती काही वेगळी नव्हती. आपआपल्या गटाला कमीच जागा मिळाल्या असे दोघांनाही वाटत होते. युवाशक्तीला पुढे आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते आणि युवाशक्ती कितपत यशस्वी होणार ह्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्या बुजुर्ग नेत्यांना संपतरावांच्या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले होते.
संपतरावांच्या प्रचाराने हळूहळू वेग घेतला होता. विरोधी पक्षाची यंत्रणा तर त्यांच्या साथीला होतीच वर त्यांनी ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केले त्या कार्यकर्त्यांनीही पक्षांची बंधने झुगारून त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राहता राहिला प्रश्न तो निधीचा. थोड्या तंगीत सापडलेल्या संपतरावांना एके रात्री माहेरी जावून आलेल्या सगुणाबाईंनी एक सूटकेस दिली. ती उघडल्यावर त्यातील नोटांची पुडक्यांकडे संपतराव आ वासून बघतच राहिले!