Sunday, March 6, 2011

Switching techniques आणि बहुरूपी



कार्यालयात काम करताना एखादी उच्चपदस्थ व्यक्ती वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. ह्या प्रत्येक भूमिकेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कधी कधी मला असे वाटते की अशा एकच व्यक्तीच्या आत त्याच माणसाची अनेक रूपे दडलेली असतात आणि भूमिकेनुसार ती व्यक्ती आपले योग्य रूप बाहेर काढत असते.
आता रूप म्हणजे काय?
प्रत्येक भूमिकेनुसार त्या व्यक्तीला आपल्या मेंदूतील आवश्यक माहितीचा साठा access करावा लागतो.
त्या भूमिकेत ज्या व्यक्तींशी संपर्क साधावा लागतो त्या व्यक्तीविषयीची माहिती ताजी करावी लागते
आणि त्या त्या प्रसंगानुसार योग्य धोरण स्वीकारावे लागते.
जसे जसे जबाबदारीच्या शिडीवर वर जात जावे, तसतसे व्यक्तीला वठवाव्या लागणाऱ्या रूपांची संख्या आणि वारंवारता वाढत जाते. त्यामुळे एका रूपांतून दुसर्या रुपात शिरण्यासाठी मिळणारा वेळ जवळजवळ शून्यावर येतो. ह्या प्रत्येक स्थित्यंतरात ह्या बहुरूप्याची शक्ती त्याच्या नकळत कामी येत असते.
दिवसाअखेरी हा बहुरूपी एका वेगळ्या प्रकारच्या रूपांच्या पोतडीला सामोरा जाणारा असतो, ती असतात आदर्श पालकाची, सह्चार्याची! बहुरूप्याची ह्या वेगवेगळ्या रूपांमधील तारेवरची कसरत त्याच्या मनाच्या एका कोपर्यात बसून शांतपणे पाहत असतो बालपणाचा बहुरूपी! बहुरुप्याला माझे एकच सांगणे, ह्या बाल बहुरुप्याला जिवंत ठेव रे बाबा!

प्रगल्भता


आता पर्यंतचे ब्लॉग आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचता वाचता एक अस्पष्टशी शंका मनात डोकावून गेली. माझी मते एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात काय? आधींच्या पिढ्यांनी शेतीचा व्यवसाय केला. शिक्षणाचा आमच्या कुटुंबातील म्हणण्याजोगा प्रवेश वडीलांच्या पिढीपासूनचा! शिक्षण क्षेत्रातील माझी ही दुसरी पिढी. व्यावसायिक क्षेत्रातील मुरब्बीपणा अजून अंगात न भिनलेला. प्रत्येक माणसाला काही स्वभाववैशिष्ट्य अनुवांशिकरित्या मिळतात, माझी ही अनुवांशिकरित्या मिळालेली स्वभाववैशिष्ट्य ज्ञानाच्या ह्या सामर्थ्याने भारावून गेली. मला आलेले हे ज्ञानाच्या सामर्थ्यांचे हे अनुभव कुणाबरोबर तरी वाटून घ्यावेत असे मला वाटले आणि मी ब्लॉग लिहण्यास सुरुवात केली. ह्यातील कित्येक अनुभव साधे साधे, पण माझ्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भतेच्या प्राथमिक पातळीमुळे मला त्यावर सुद्धा लिहावयास वाटले.
दुसरा एखाद्या ज्ञानक्षेत्रातील प्रगल्भ झालेल्या एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर तो ह्या विषयांवर लिहिणार सुद्धा नाही कारण ते विषय त्याच्या दृष्टीने एकदम प्राथमिक पातळीवरचे असतील. ती व्यक्ती आपली उर्जा, शक्ती एखाद्या अधिक प्रगत विचारांवर खर्च करेल.
हा साक्षात्कार झाल्यावर मला जरा बरे वाटले. एकंदरीत मोठ्या चित्रात आपला ब्लॉग कोठे बसतो हे समजल्याचे समाधान लाभले!

Saturday, February 26, 2011

भावना आणि व्यवहार



मनुष्यजातीचा भावना आणि व्यवहार यातील संघर्ष पुरातन कालापासून चालू असावा अशी माझी समजूत आहे. हल्लीच्या काळात मात्र हा संघर्ष थोडा तीव्र झाला इतकेच. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या दोघांत समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या भावना त्याचे जन्मस्थळ, जवळचे नातेवाईक, मित्र यांच्याशी निगडीत तर व्यवहार हा पैसा, नोकरी आणि जीवनाच्या संघर्षाशी संबंधित! काही उदाहरणे तात्कालिक पातळीवरची तर काही उदाहरणे आयुष्यातील मोठमोठे निर्णय घेतानाची!

उदाहरणे द्यायची तर कित्येक, आपल्या मातापित्यांना सोडून नोकरीनिमित्त परदेशी निघालेलं अपत्य, वार्षिक APPRAISAL च्या वेळी होणारी संवेदनशील व्यवस्थापकाची स्थिती. काही भोळीभाबडी माणसे हा संघर्ष सुप्रसिद्ध लोकांपर्यंत नेवून ठेवतात. पहिल्या IPL च्या वेळी मुंबई इंडिअन संघात सचिनने विनोद कांबळीला संघात घेण्यासाठी वजन टाकावे, बोरिस बेकार आणि स्टेफी ग्राफ यांचा विवाह व्हावा ही मराठी माणसाची भावनात्मक होऊन पाहिलेली स्वप्ने.

ह्या संघर्षाला सामोरे जाण्याची तंत्रेसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी. व्यवहाराच्या बाजूने निर्णय घेताना परिस्थितीला दोष देणे हे एक नेहमीचे तंत्र. या जागी मी नसतो आणि दुसरा कोणी जरी असता तरी त्याला सुद्धा हाच निर्णय घ्यावा लागला असता असे स्पष्टीकरण देणे हा सर्वात सोपा उपाय. काही माणसांना मात्र आयुष्यात कधी व्यवहार जमत नाही आणि व्यवहार न जमल्याची त्यांना खंतही नसते. 'दिल का राजा' असलेली अशी लोकं आपल्या मर्जीने आयुष्य जगात असतात. 3 Idiot मधला आमीर खान हे त्याचे उदाहरण. काही उच्च पदावरील माणसांचा एक गुण मात्र वाखाणण्याजोगा आणि तो म्हणजे 'switching technique'. एक काम झाल्यावर त्यातील आपल्या भावना, विचार तत्काळ बंद करून लगेच नवीन कामाच्या भावना, विचार मनात आणायचे हे ते तंत्र. त्या विषयी पुढे कधी तरी!

Friday, February 25, 2011

वटवृक्ष



वसईत आणि एकंदरीत आमच्या समाजात वावरताना अनेक एकत्र कुटुंबांना जवळून पाहण्याचा योग आला. एकत्र कुटुंबाचा चेहरा म्हणजे त्या कुटुंबातील कर्ता पुरुष! ह्या कर्त्या पुरुषावर कुटुंबांची वाटचाल अवलंबून असायची. असायची म्हणायचे कारण म्हणजे आता एकत्र कुटुंब ही संस्था जवळपास नामशेष झाली आहे. हा कर्ता माणूस कुटुंबातील बर्याच गोष्टींवर आपले नियंत्रण ठेवू शकत असे.

ह्यात दोन प्रकारची कुटुंबे पाहण्यात आली. पहिल्या प्रकारात हा कर्ता माणूस समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेला असे. समाजातील बर्याच लोकांची ह्या घरी उठबस असे. एकंदरीत हे कुटुंब आणि घर ह्या कर्त्या माणसाच्या कर्तुत्वाने भारावून गेले असे. टोकाची भूमिका घेत मी ह्या माणसांना स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसे असे म्हणतो. ह्याचा एक परिणाम कुटुंबातील बाकीच्या सदस्यांवर होत असे. ह्या कुटुंब प्रमुखाची मुले, भाऊ ह्यांच्या व्यक्तीमत्वाची वाढ काहीशी खुरटली जात असे.

दुसर्या प्रकारात कर्ता माणूस हा सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा असे. ह्या माणसाने आपले आयुष्य एका धोपटमार्गाने जगलेले असते. पापभीरू असा हा माणूस पहिल्या प्रकारातील व्यक्तींच्या कामगिरीने भारावून गेलेला असे. आपल्याला न गाठता आलेली यशाची शिखरे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या रूपाने गाठण्यासाठी जीवनात वाटेल तितका त्याग करण्याची त्याची तयारी असे.

अर्थात ह्या दोन टोकाच्या उदाहरणामध्ये मधल्या बर्याच छटा आहेत. आज एकत्र कुटुंब नाहीत. छोट्या कुटुंबात नवरा बायकोला विविध भूमिका निभावाव्या लागतात. ह्यातून एकाच मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आयुष्यात कोणत्या क्षणी तुमची PRIORITY ही तुमच्या स्वतःच्या कार्य क्षेत्राकडून निघून तुमच्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या सर्वागीण विकासावर येवून स्थिरावते. हा क्षण ओळखणे आणि तो पकडणे फार महत्वाचे असते. परंतु ह्या क्षण ठरविण्याचे प्रत्येकाचे मापदंड वेगवेगळे हे मात्र लक्षात येते!

Friday, February 18, 2011

आयुष्य



जगाच्या पाठीवर अनेक बहुरंगी बहुढंगी घटना घडत असतात. त्यातील काही आपल्या वाट्याला येतात. आपापल्या स्वभावानुसार आपण या घटनांचे विश्लेषण करतो आणि या अनुभवानुसार पुढे असे झाले तर काय करावे म्हणून उपाययोजना करतो.

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने दोन भाग मानता येतील. एक भाग जो आपण नियंत्रित करू शकतो असा आणि दुसरा म्हणजे ज्या भागावर आपले काही नियंत्रण नसते तसा. ह्या भागांची टक्केवारी वगैरे करण्याच्या फंदात पडण्याचा काही उपयोग नाही. नियंत्रण नसणाऱ्या भागांची उदाहरणे म्हणजे आजार, अपघात आणि आजच्या युगात काही प्रमाणात नाती. हाच भाग अगदी टोकाला खेचायचा झाला तर आपल्या घरावर विमान कोसळू शकते, पृथ्वीवर एक मोठी शीला कोसळून पृथ्वी नाश पावू शकते किंवा सर्व पृथ्वी कृष्णविवरात खेचली जाऊ शकते.

आयुष्याच्या बर्याच कालावधीत आपण नियंत्रित करू शकणार्या भागाशी सामना करत असतो. दुसरा भाग प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवावा लागतो. परंतु ह्या भागाची क्षमता मात्र पहिल्या भागाचे आपले विश्व पूर्ण व्यापून टाकण्याची असते.

दैनंदिन जीवनातील आपला संघर्ष पहिल्या भागासाठीचा असतो. अधिकाधिक मेहनत करून बर्या वाईट मार्गाने ह्या भागावर आपण नियंत्रण आणू पाहतो. थोडक्यात म्हणायचे झाले तर आपणाजवळील संपत्ती ह्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपणास मदत करते. समजा अंबानी बंधूचे उदाहरण घेतले तर त्यांचा ह्या भागावर पूर्ण ताबा असतो.

काही जणांना बर्याच वेळा असे वाटते की आपण पहिल्या भागाच्या जोरावर दुसर्या भागावर सुद्धा नियंत्रण करू शकतो. लहानपणी वाचलेली एका राजाची गोष्ट, त्याला ज्योतिष्याने सांगितले की पाच दिवसाच्या आत तुला सर्पदंशाने मृत्यू येणार. तो बिचारा स्वतःला राजवाड्यात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. शेवटच्या दिवशी मात्र फळातून एक कीड निघून तिचे सापात रुपांतर होऊन तो राजाला दंश करतो आणि राजा मरतो. आता समजा हीच गोष्ट दररोज शेतात काम करून भाकरी मिळवणाऱ्या शेतकर्याची असती तर? तो बिचारा पाच दिवस स्वतःला बंद करून तर घेवू शकत नाही?

दुसर्या भागाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. काहीजण आस्तिक बनून दैवी शक्तीचा ह्या भागातील हस्तक्षेप अपेक्षितात. काही जण मात्र ह्या भागावर काही केल्या नियंत्रण करता येत नसल्याने आला क्षण मजेत जगावा अशा वृत्तीचे असतात.

लिहिता लिहिता असे जाणवले की काही गोष्टी मात्र ह्या दोन्ही भागांना समाविष्ट करतात. आपली मुलं पुढे काय करणार, कसे नागरिक बनणार? ही बाब म्हटली तर काही प्रमाणात आपल्या हातातली तर काही प्रमाणात आपल्या हाताबाहेरील. अशी अजून काही उदाहरणे असतील

दीपकने ह्या ब्लॉगची स्थापना करून १७ फेब्रुवारीला एक वर्ष झाले. एका वर्षात ७८ ब्लॉग! Not Bad at all!

Tuesday, February 15, 2011

चौथी पास


गेल्या महिन्यात आम्ही सर्व नातेवाईक अलिबाग जवळील आक्शी येथे एका वीकएंडला गेलो होतो. नातेवाईक म्हणजे माझ्या सर्व चुलत, आत्ये भाऊ आणि बहिणी, आणि त्यांची कुटुंबे! माझा मोठा भाऊ आणि आत्येभाऊ कार्यबाहुल्यामुळे येवू न शकल्याने मी एकटा भाऊ आणि बाकी सर्व बहिणी आणि त्यांचे यजमान अशी परिस्थिती उदभवली. धाकटी चुलत बहिण पंचविशीतील तर मोठीने नुकतीच पन्नाशी गाठलेली.

रविवारी सकाळी नास्ता करताना कशावरून तरी आजच्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा विषय निघाला. चर्चेला मजेशीर वळण देण्यासाठी मी विधान केले की यावर उपाय म्हणून मी एका नवीन संस्थेची स्थापना करीत आहे. चौथी पास झालेल्या मुलींना यात प्रवेश दिला जाईल. त्यांना पुढील १०- ११ वर्षे भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, पारंपारिक पद्धतीचे जेवण याबरोबर आधुनिक जगाचेही शिक्षण दिले जाईल. मोठ्यांशी कसे वागावे हे ही त्यांना शिकवले जाईल. २१- २२ व्या वर्षी या संस्थेतून बाहेर पडलेल्या मुली एक आदर्श पत्नी म्हणून संसार करण्यासाठी सज्ज असतील आणि उच्च विद्याविभूषित मुलांचे आई वडील त्यांना सून बनविण्यासाठी संस्थेच्या दारापुढे रांग लावतील. मी हे विधान करताच माझ्या लहान चुलत बहिणींनी माझ्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला, कर्मठ, बुरसटलेल्या विचाराचा म्हणून माझी बोळवण केली.

ह्या हल्ल्यामुळे हतबल होऊन मी माझ्या संस्थेची घोषणा माघारी घेणार इतक्यात माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी माझ्या मदतीला धावून आल्या. त्यांची मुले आता २३- २४ वर्षांची आहेत. त्या म्हणाल्या की आम्ही मात्र आदुच्या संस्थेपुढे रांग लावू. त्या दोघींच्या यजमानांनी त्यांना पाठींबा दर्शविला. त्यानंतर मात्र माझ्या धाकट्या बहिणींनी माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करीत तुला तुझे बाबा चौथी पास बायको करून देतील असा नारा चालू केला.

वर वर मजेत चालू झालेल्या ह्या विषयावर काही वेळानंतर माझ्या दोन ज्येष्ठ भगिनी गंभीर चर्चा करताना मला दिसल्या!

(Disclaimer - या लेखातील विचार हे केवळ एक विचार म्हणून पाहावेत. त्यावरून लेखकाच्या मनोवृत्तीचा निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न करू नयेत ही विनंती! )

Friday, February 4, 2011

संघर्ष


हल्ली बरेचजण भ्रष्ट्राचाराविरुद्ध बोलत असतात, राजकारणी लोक कसे देशाचे नुकसान करीत आहेत याविषयी तळमळीने बोलत असतात. अर्थात याला मीही अपवाद नाही. प्रश्न अशा आहे की हा संघर्ष लढायचा तर आपला शत्रू कोण आहे हे प्रथम ओळखणे आवश्यक आहे. नाहीतर मूळ कारण सोडून आपण फक्त त्या कारणाच्या परिणामांशी (outputs) लढत बसू आणि मूळ कारण मात्र तसेच राहील.

राजकारणी लोक किंवा भ्रष्ट लोक आले कोठून? ते तर आले आपल्यातून. ते आपले प्रतिनिधी. भ्रष्ट वृत्ती ही आपल्यातील प्रातिनिधिक लोकांची वृत्ती. मग अर्थात ती आपल्यात सुद्धा असणार. या भ्रष्ट वृत्तीचे कारण काय? तर समाजात मानाचे स्थान मिळविण्याचा अट्टाहास. येन केन प्रकारे मी समाजात प्रतिष्ठित बनणार ही प्रत्येकाच्या मनातील इच्छा! आता यासाठी मी प्रत्येक व्यक्तीला सुद्धा दोष देणार नाही. समाजात दोन प्रकारचे लोक. एक आधीच प्रतिष्ठित घरातून आलेले आणि दुसर्यांच्या घराणे आता पर्यंत प्रतिष्ठा न पाहिलेली. प्रतिष्ठित घरातून आलेल्या माणसांच्या गुणसूत्रात आपली प्रतिष्ठा टिकविण्याची सुप्त इच्छा तर अप्रतिष्ठित घरातून आलेल्या व्यक्ती मध्ये आतापर्यंत राहून गेलेला मान मिळविण्याची तीव्र धडपड! हा संघर्ष तर पूर्वीपासून असणार. परंतु पूर्वी सामान्य लोकांच्यात प्रारब्ध स्वीकारण्याची प्रवृत्ती होती, आज त्यांनी प्रारब्धाला झुगारून दिले आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे प्रयत्नवादी बनणे ही, परंतु त्यात आपला मार्ग कोणता याचे सारासार भान असणे आवश्यक आहे.

थोडक्यात भान ठेवा की भ्रष्ट्राचाराचा लढा आहे तो आपल्यातील वृत्तीशी, कोण्या एका व्यक्तीशी नव्हे! आणि म्हणूनच हा संघर्ष मोठा कठीण आहे. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूशी संघर्ष केव्हाही कठीणच असतो!

Sunday, January 9, 2011

To Do List

२०११ सालच्या सर्वांना शुभेच्छा!

कार्यालयीन काम करताना एक सवय लागून गेली, ती म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्यासमोर असलेल्या कामाची यादी बनविणे. दररोज काम सुरु करण्याआधी या यादीकडे लक्ष द्यायचे. त्यातील कामांना प्राधान्य प्रदान करून त्यानुसार ही कामे पार पडण्याचा प्रयत्न करायचा. कामकाजाची वेळ संपली की या यादीतील अपूर्ण कामांकडे नजर फिरवायची आणि मग ती कामे दुसर्या दिवशी पुढे ढकलता येतील की नाही याचा निर्णय घ्यायचा, काही न ढकलता येण्याजोगी कामे असल्यास कार्यालयात थांबायचे किंवा घरी काम घेवून यायचे. कार्यालय आणि घरगुती आयुष्य यात समन्वय साधायचा प्रयत्न करायचा. यात कौशल्याच्या दोन गोष्टी, १> समोरील बर्याच कामांना योग्य प्राधान्य प्रदान करणे २> दिवस अखेरीस कोठे थांबायचे याचा निर्णय घेणे.

हीच बाब काही प्रमाणात मग घरी लागू होते. बाजारात जाताना भाज्यांची यादी बनविणे आणि बरेच काही..असेच आयुष्य पुढे जात राहते, दिवस, महिने, वर्ष भराभर निघून जातात.

कधीतरी या जीवनातून फुरसतीचा क्षण मिळतो. मग डोळ्यासमोर येते ती आयुष्यातील 'TO DO LIST' . ही बहुदा मनातच असते. यात असतात आपली काही स्वप्ने, एका निर्मनुष्य जागी जावून निसर्गाच्या सानिध्यात राहायचे वेड, कोणाला सांगायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी आणि बरेच काही. परंतु इथे मात्र ही कामे पार पाडण्यासाठी दुसरा दिवस येणार नसतो, ही 'TO DO LIST' carry forward करण्यासाठी नसते. पण इथेही वरती नमूद केलेल्या कौशल्याच्या दोन गोष्टी लागू होतात. १> आयुष्यातील कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे आणि २> दैनंदिन 'To Do List' मध्ये कोठे थांबून केव्हा ह्या मनातील 'To Do List' च्या हाकेला साद द्यायची!

आहे का अशी तुमची 'To Do List'?

Wednesday, December 15, 2010

What is your buffer?

व्यावसायिक जीवनाचा एक अलिखित नियम म्हणजे बफर! ज्यावेळी आपला बॉस आपणास एखादे काम सोपवतो त्याच वेळी तो आपणास काम पूर्ण करण्यासाठी आपणास किती वेळ लागेल याचा अंदाजही विचारतो. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार काम पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधतो आणि त्यात काही अधिक वेळ मिळवून येणारा एकूण वेळ हा बॉसला काम पूर्ण करण्यासाठीचा अंदाजित वेळ म्हणून देतो. हा जो काही अधिक वेळ मिळविला गेला त्याला बफर असे म्हणतात. याचा उपयोग कामात येवू शकणारे अडथळे, अडचणी पार पाडण्यासाठी होतो.

वैयक्तिक जीवनात सुद्धा प्रत्येक जण आपल्याला जगण्यासाठी किती पैसा लागेल याचे ठोकताळे बांधतो आणि मग त्यात आपला बफर मिळवितो. जो पर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळविण्यासाठी लागणारा पैसा मिळविणे हे व्यक्तीचे ध्येय असते तो पर्यंत सर्व काही आलबेल असते. परंतु ज्यावेळी या मुलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन चैनीसाठी पैसा मिळविणे हे ध्येय बनते त्यावेळी मात्र परिस्थिती बदलते. माणूस सदैव बिकट परिस्थिती उद्भवली तर काय (म्हणजेच बफर) याचा विचार करून अधिकाधिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न करतो. सद्य युगात असुरक्षिततेच्या भावनेमुळे आणि स्पर्धेमुळे ह्या बफरचे प्रमाण अवास्तव वाढले आहे.

आपले जसे वैयक्तिक जीवन असते तसेच सार्वजनिक जीवनही आहे. भूमातेवरील उपलब्ध साधने ही वैयक्तिक जीवनासाठी लागणारी साधने आणि समाज स्वाथ्य टिकविण्यासाठी लागणारी साधने यात विभागली गेली आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासाठी लागणारी साधने आणि समाज स्वाथ्य टिकविण्यासाठी लागणारी साधने यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. ज्या क्षणी आपल्या वैयक्तिक जीवनातील बफरचा हव्यास आपल्या सामाजिक जीवनावर परिणाम करतो त्यावेळी समाजस्वास्थ्य बिघडण्यास सुरुवात होते. आज नेमकी हीच परिस्थिती उदभवली आहे. प्रश्न असा आहे की What is your buffer?

Sunday, December 5, 2010

Punching Bag अर्थात पोते

आपण व्यावसायिक जीवनाच्या सुरवातीला कंपनीमध्ये प्राथमिक पातळीवर काम करण्यास आरंभ करतो. कनिष्ठ पातळीवर काम करताना आपल्याला फक्त वरिष्ठांनी दिलेले काम पार पाडावे लागते. हे काम पार पाडत असताना आपल्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचा मुलभूत हक्क आपणास बहाल होतो. समदुःखी मित्रांसमवेत आपण हा हक्क कंपनीच्या कॉफी मशीनवर, कॅन्टीन मध्ये उपभोगतो.

जसजसा आपला अनुभव वाढत जातो, आपल्या कुवतीनुसार आपली क्षमता वाढत जाते, तसतसे आपण व्यवस्थापनाच्या शिडीवर वर चढू लागतो.
आता आपला बॉस हा एक वरिष्ठ व्यवस्थापक असतो आणि आपण Junior पातळीवरच्या एका गटाच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत असतो. या स्थितीमध्ये आपली विविध स्वभावाच्या, विविध वयोगटातील व्यक्तींशी सुसंवाद साधण्याची कला अत्यंत महत्वाची बनते. सोप्या भाषेत त्या कलेस Communication Skill असे बनले जाते. समोरच्या व्यक्तीची मनोस्थिती जाणून घेवून, कामाच्या सद्यस्थितीचे योग्य विश्लेषण करून त्या व्यक्तीशी कशा प्रकारे वागावे याचा निर्णय घ्यावा लागतो. कोणता संवाद समूहाशी साधायचा, कोणता संवाद व्यक्तिगत पातळीवर साधायचा, तो कोणत्या वेळी साधायचा आणि लेखी स्वरुपात साधायचा की तोंडी असे बरेच निर्णय अचूकपणे घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यासाठी बरेचसे अलिखित नियम अस्तित्वात असतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला संयम कधीही ढळू न देणे किंवा संत बनणे. याच पातळीवर असताना आपल्याला वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर सुद्धा कित्येक बैठकींना उपस्थित राहावे लागते. इथे जरी आपण कनिष्ठ असलो तरी आपणास वरिष्ठ लोकांचे आदेश शांतपणे ऐकावे / पाळावे लागतात.

ह्या वर्गास दोन्ही बाजूने फटके खावे लागत असल्यामुळे गमतीने ह्या मधल्या व्यवस्थापकीय वर्गास कधी कधी Punching Bag असे म्हटले जाते. ह्या स्थितीकडे जर सकारात्मक दृष्टीकोनातून बघायचे झाले तर ही स्थिती आपणास एक व्यक्ती म्हणून संयमी बनविते आणि व्यक्तिगत जीवनात आपणास त्याचा फायदा करून घेता येवू शकतो.

Sunday, November 21, 2010

आशियाई स्पर्धा



सध्याच्या आशियाई स्पर्धा पहाणे हा एक माझ्यासाठी आनंददायी अनुभव ठरतोय. गेल्या आठवडाभर भारतीयांची कामगिरी बेताचीच होत होती. पण आज मात्र भारतीयांनी कमाल करत ३ सुवर्णपदकांची कमाई केली.

चीनच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून पदकांची लयलूट केली. चीनने गेल्या काही वर्षांपासून क्रीडा क्षेत्रामध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कामगीरीमागे त्यांची जबरदस्त मेहनत तर आहेच पण अजून एक घटक कारणीभूत असावा असे मला वाटते. चीनच्या राजसत्तेला ज्याप्रमाणे राजकीय विरोध आवडत नाही त्याप्रमाणे तेथील क्रीडा अधिकार्यांना त्यांच्या खेळाडूंचे अपयश कितपत पचनी पडत असावे याचा मला प्रश्न पडतो.

शनिवारी जपान आणि चीनच्या महिला खेळाडूंमध्ये टेबल टेनिसचा उपांत्य फेरीचा सामना खूप रंगला. सातव्या गेममध्ये चीनची खेळाडू मागे पडली असताना देखील तिने यंत्रवत खेळ करीत शेवटचे काही गुण खेचून आणीत सामना जिंकला. गेल्या आठवडाभर बरेच वेळा हे चित्र पहावयास मिळाले. आज मात्र पुरुषांच्या डबल Trap स्पर्धेत भारताच्या सोधीने शेवटच्या काही फेर्यात पिछाडी भरून काढीत सुवर्णपदक पटकावले. त्या वेळी आनंदित होतानाच मला मात्र शेवटच्या क्षणी ढेपाळलेल्या चीनी खेळाडूची दया आली. त्याला आता कोणत्या प्रकारची वागणूक मिळेल या विचाराने मी चिंतातूर झालो.

या बाबतीत चीन परवडला असा एक देश आहे. उत्तर कोरिया हे त्याचे नाव. या वर्षी जूनमध्ये फुटबाल स्पर्धेत पोर्तुगालने त्यांचा ७ -० असा धुव्वा उडविला. हा पराभव त्यांच्या राज्यकर्त्यांच्या इतका जिव्हारी लागला की संघाच्या प्रशिक्षकास परतल्यावर एका बांधकाम कामावर बिनपगारी काम करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. मध्यंतरी त्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही व्यक्त केली होती.

शेवटी काय तर अतिरेक प्रत्येक ठिकाणी आहेच. त्यांचा शिस्तीचा अतिरेक तर आपला भ्रष्ट्राचाराचा! आज Times मध्ये भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांची जी यादी देण्यात आली आहे ती वाचून हा देश चालला तरी कसा आहे हा प्रश्न पडतो. हा देश चालला आहे तो काही समंजस, प्रामाणिक लोकांमुळे!

Tuesday, November 16, 2010

समंजस, असमंजस


समाजातील लोकांचे साधारणतः ४ प्रकारात वर्गीकरण करता येते. शिक्षित समंजस, शिक्षित असमंजस , अशिक्षित समंजस, अशिक्षित असमंजस हे ते चार प्रकार होत. काही लोक समंजस आणि असमंजसपणाच्या कुंपणावर बसलेले असतात. परिस्थितीनुसार ते समंजस अथवा असमंजसपणा दाखवितात. आता समाजमनावर या चार प्रकारातील कोणता वर्ग अधिक प्रभावशालीपणे वर्चस्व गाजवितो यावर त्या समाजाचा बौद्धिक प्रवास सुरु राहतो.

७० - ८० च्या दशकात महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजाचे एकूण सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण होते. ह्या वर्गाला आपण शिक्षित समंजस म्हणूयात. हा वर्ग एकंदरीत साधेपणाने राहणारा, नैसर्गिक स्तोत्रांवर कमी ताण देणारा असा वर्ग. समाजमनावर वर्चस्व गाजविण्यासाठी ह्या वर्गास काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. बहुतांशी शिक्षकी पेशात असणाऱ्या या वर्गाने शाळेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय विचारसरणीचा प्रसार केला. समाजातील वरच्या बौद्धिक पातळीतील लोक शिक्षकी पेशात असल्याने हा प्रसार अतिशय प्रभावशाली पद्धतीने झाला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही मध्यमवर्गीय विचारसरणी जोपासली गेली.

त्यानंतरच्या कालावधीत खुल्या आर्थिक धोरणांमुळे मध्यमवर्गीयांच्या पुढील पिढीस अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे आणि राखीव जागांच्या धोरणांमुळे बौद्धिक गुणवत्ता शिक्षकी पेशापासून दुरावली गेली. समाजमनावर मध्यमवर्गीय विचारसरणीचा प्रसार करण्याचे एक माध्यम शिक्षित समंजस वर्गाने हळूहळू गमावले. ह्या वर्गाची पुढील पिढी मेंढपाळाच्या भूमिकेतून मेंढ्याच्या भूमिकेत शिरली. असमंजस वर्गाने ही संधी बरोबर हेरली. मोकळी झालेली मेंढपाळाची भूमिका ह्या वर्गाने बघता बघता हेरली. दूरदर्शन, चित्रपट, मासिके आणि mall ह्या माध्यमावर असमंजस वर्गाने वर्चस्व प्रस्थापित केले. प्रसारमाध्यमात थिल्लरपणा बोकाळला. कोकणातील एका प्रसिद्ध गावाचे नाव आपल्या आडनावात समाविष्ट केलेली आणि एका वाहिनीवर लग्नाचे नाटक करणारी तथाकथित अभिनेत्री हे अशिक्षित असमंजस वर्गाचे मूर्तिमंत उदाहरण होय. अशा व्यक्तीस समाज सहन करतो हे समाजात मेंढ्याची भूमिका किती खोलवर रुजली आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे.

अजूनही समंजस वर्ग मेंढ्याच्या रुपात का होईना पण अस्तित्वात आहे. असमंजस वर्ग brainwashing ने समंजस पणा नष्ट करण्या आधी, समंजस वर्गाने विविध माध्यमातून आपल्या विचारसरणीचा प्रसार करणे आवश्यक बनले आहे. आजही समंजस वर्ग बहुसंख्येने अस्तित्वात आहे. विखुरलेल्या ह्या वर्गाने एकमेकास साद देवून आपल्या सामर्थ्याची जाणीव समाजास करून देण्याची आज नितांत गरज आहे.

ह्या लेखावरील आपले अभिप्राय जरूर कळवा

Sunday, October 24, 2010

परिपूर्णता, आदर्श, वास्तवता आणि इतर काही



बाकी आपण मराठी मध्यमवर्गीयांचे एक मात्र बरे असते. आपण आपल्या मुलांना परिपूर्ण जगात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तु चांगले वाग की तुझे भले होईल. चोर, गुंड लोक वेगळे आणि आपण चांगले. बाळ अशा उपदेशात पहिली ३-४ वर्षे घालवते आणि बालवाडीत / NURSERY मध्ये प्रवेश करते. मग त्याचा जगातील अपरिपूर्ण गोष्टींशी संपर्क येण्यास सुरुवात होऊ लागतो.

७८ - ८८ या वर्षांत वसईत बालपण घालवलेली आमची पिढी, आम्हाला आदर्शांची कमतरता नव्हती. इतिहासातील राम, कृष्ण, शिवाजींपासून ते थेट वसईतील म्हापणकरसर, परुळेकरसर, नाचणकरसर, फडकेसर, म्हात्रे गुरुजी यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे आदर्श आमच्या डोळ्यासमोर होते. त्या आदर्शांचे बाळकडू आज कधीतरी उफाळून बाहेर येते आणि मग ब्लॉग लिहिला जातो. परंतु आज वाढणार्या पिढीचे काय? त्यांचा राम, कृष्ण POGO वरून त्यांच्या समोर येतो. त्यांचे वडील वसईशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करीत त्यांना बोरिवलीत शिकवितात.

दुनियेत परिपूर्ण असे काहीच नाही, दुनिया कधी परिपूर्ण नव्हती आणि बनणारसुद्धा नाही पण परिपूर्ण जग निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ते आदर्श. जगात असे कोणीतरी आहे ही भावना मध्यमवर्गीयांना सत्मार्गाने जगण्यास प्रेरणा देते. पण जर का असे आदर्शच मुलांच्यासमोर नसतील तर मात्र परिस्थिती बिकट आहे. Your thoughts?

Saturday, October 23, 2010

कर्मठ बना



वाचकहो मराठी मध्यमवर्गीय संस्कृती शेवटच्या घटका मोजू लागली आहे. दिवाळीत घरी बनवला जाणारा फराळ, अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, एरव्ही संध्याकाळी म्हटली जाणारी शुभंकरोति सर्व काही नाहीसे होत चालले आहे. कर्मधारय समास, संधी, अनुप्रास अलंकार माहित असलेली आपण मानव जातीच्या इतिहासातील शेवटची मराठी पिढी आहोत.
म्हणूनच मी म्हणतो आहे, मराठी संस्कृतीचे तारणहार बना, मराठी संस्कृती जाणून घ्या, तिला आपल्या घरात रुजवा. प्रगल्भ, सम्यक, मूल्याधारित अशा शब्दांचा घरी वाक्यात प्रयोग करायला शिका. स्वामी, ययाती, छावा, तुंबाडचे खोत ह्या कादंबर्या वाचून काढा. मनाचे श्लोक पुन्हा एकदा वाचून काढा, त्यांचे मनन करा. 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' म्हणजे नक्की काय याचा विचार करा. पुलं, सावरकरांची छायाचित्रे घरी भिंतीवर लावा.
नवीन युगातील प्रगतीची शिखरे काबीज करता करता आपल्या मुळांना घट्ट पकडून ठेवा आणि त्यांना बळकट बनवा.

Wednesday, September 1, 2010

Ownership

शनिवारी सकाळी वर्तमानपत्र उघडले. चतुरंगमध्ये ‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’ या स्पर्धेचा निकाल लागल्याचे जाहीर झाले होते. सर्व प्रथम विजयी लेखकांच्या यादीत माझे नाव आहे का हे पाहिले. तिथे नाव नसल्याने स्पर्धेतील लेखांचा आढावा घेणाऱ्या लेखाकडे माझी नजर वळली. त्यातही माझे नाव नव्हते, पण एक दोन संदर्भ माझ्या लेखाशी संबंधित असल्याची शंका मला आली. निराशेचे काळे ढग मनावर दाटून आले. आता ही लेखणी कायमची म्यानात बंद करून ठेवावी असे विचार येवू लागले. अशा या बिकट प्रसंगी धर्मपत्नी गरम चहाचे कप घेवून दिवाणखान्यात प्रवेश करत्या झाल्या. एकंदरीत वातावरण गंभीर असल्याचे तिच्या ध्यानात आले. काही क्षणात निराशेचे कारण कळताच तिने पुरवणी हातात घेतली. विजेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकून ती बोलती झाली, अरे या तर सर्व स्त्रियाच आहेत. परीक्षक पण स्त्री आणि विजेत्या पण स्त्रियाच! एका स्त्रीकडून हे उदगार ऐकताच अस्मादिक धन्य झाले. लेखणी बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय रद्द झाला. मराठी साहित्य एका उभारत्या लेखकास मुकण्याची शक्यता त्या वेळेपुरता तरी टाळली गेली.

असो! आजचा विषय आहे ownership अर्थात स्वामित्वाची भावना. हा शब्द आधुनिक कार्यालयात बर्याच वापरला जातो. प्रत्येक कर्मचार्याला एक भूमिका (role) दिली गेली असते आणि त्यानुसार त्याला जबाबदार्या (responsibilities) दिल्या जातात. भूमिका आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या या लेखी स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला जातो. बर्याच वेळा हा लेखी कागद दैनंदिक व्यवहार सुरुळीत पणे पार पडण्यास पुरेसा असतो. Boss आणि Team Member दोघेही ह्या लिखित कागदाकडे पाहून आपापले कामकाज पार पडत असतात. काही क्षण मात्र असे येतात की ज्यावेळी Team Member ला या लिखित जबाबदार्यांच्या पलीकडे जावून काम करावे लागते. एखादा प्रश्न सुटेपर्यंत दिवस रात्रीची पर्वा न करता कार्यालयात थांबणे, एखादा सहकारी काही कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास त्याची कामे पार पाडणे ही काही उदाहरणे ownership ची! वार्षिक appraisal च्या वेळी ह्या गोष्टी चर्चिल्या जातात.

कार्यालयाच्या बाहेर ही संकल्पना अस्तित्वात आहे काय? उत्तर आहे होय. आपल्या batch चे काही जण स्नेहसंमेलनासाठी जी मेहनत घेतात त्यात असते ही ownership ची भावना. सार्वजनिक गणेशउत्सवात काम करणारा कार्यकर्ता हा ownership चे प्रतिक असतो. प्रत्येक नात्याला असतो एक owner. काही नाती केवळ त्या नात्याला owner नसल्याने फुलण्याआधीच मिटतात.

Saturday, August 21, 2010

कसा मी, असामी? कसा मी? असा मी

आपल्याला स्वतःची बरेच रूपे पहावयास मिळतात. ही रूपे कधी कधी स्वतःला चकित सुद्धा करतात. अशीच काही उदाहरणे माझ्या बाबतीतली.

१> रविवार संध्याकाळी मी एक दुःखी आत्मा असतो. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पाच दिवसांचा आठवडा समोर उभा असतो. शुक्रवारी रात्री पुढील आठवड्यासाठी ढकललेली कामे आठवत असतात. अशा वेळी झी मराठीवर कोणतातरी सिनेमा अथवा पुरस्कार कार्यक्रम पाहत असलेल्या बायको मुलाबरोबर क्रिकेट सामना न बघायला मिळाल्यामुळे वाद होण्याची शक्यता जास्त असते. ह्याच्या उलट शुक्रवारी संध्याकाळी दुनिया मेरी मुठ्ठी में याची प्रचीती घेत मी उत्साही बनलेला असतो.

२> बोरीवलीला राहताना मी एकदम जबाबदार गृहस्थ असतो. घराच्या सर्व जबाबदार्या पार पाडत, मुलाच्या अभ्यासाला हातभार लावत मी माझी सर्व कर्तव्य पार पाडत असतो. मुलासमोर वागताना आपण बर्यापैकी जबाबदारीने वागले पाहिजे असे माझे मत! त्यामुळे एकंदरीत शांत राहण्याचा माझा प्रयत्न असतो. पण हेच वसईला आल्यावर घरात माझे वागणे वेगळे असते. आई वडील, काका काकी यांच्या सहवासात मी लगेचच थेट १९८० च्या दशकाशी जोडला जातो. तेच घर, तीच माणसे यामुळे मला एकदम शालेय जीवनाशी जोडल्याची अनुभूती मिळते. त्यानंतर ज्या रविवारी सकाळी शालेय मित्र क्रिकेट खेळतो तो तर थेट बालपणात नेऊन ठेवल्याचा क्षण!

३> हल्ली एखादे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या पुस्तकी विषयावरील १ तासापेक्षा अधिक चालणारे प्रवचन एकाग्रतेने ऐकण्याची माझी क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रवचनात मी एकदम असुरक्षिततेची जाणीव महसूस करीत असतो. 'So Aditya what are your thoughts on this?' असा प्रश्न कोणत्याही क्षणी माझ्यावर चाल करून येईल हा विचार मला तासभर छळत असतो. त्यामुळे अशा प्रवचनात एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याची मी नोंद करून ठेवतो आणि असा प्रश्न माझ्या दिशेने आल्यास 'To an extend, I agree with what you just mentioned, but I have one question on' अशी प्रस्तावना करून मी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतो. आता वक्त्याला आपल्या प्रवचनावर कोणीतरी प्रश्न विचारतो आहे ही भावनाच इतकी सुखावह असते की पुढचा विचारलेला खरा प्रश्न कितपत चांगला आहे हा मुद्दा बर्याच वेळा गौण ठरतो. या उलट Excel मध्ये कोणास formula लिहून हवा असेल, एखाद्या आज्ञावलीत काही मदत हवी असेल तर मात्र मी उत्साहाने त्यात सहभागी होतो.

४> मला सर्व गोष्टी नियंत्रणात असलेल्या आवडतात / आवडायच्या. ७:४३ ची गाडी पकडण्यासाठी मी ७:३० वाजता स्थानकावर हजर असतो आणि ५ मिनटे उशिरा आलेली ७:२५ ची गाडी पकडतो. (या उलट माझी बायको, ७:४३ ची गाडी ७:५० लाच येणार असा हिशोब करून घरातून निघणारी) . शालेय जीवनापर्यंत हे 'सर्व गोष्टी नियंत्रणात असणे' वगैरे विचार ठीक होते. त्यावेळी परीक्षेच्या आदल्या दिवशी वर्षभराच्या अभ्यासाची उजळणी करणे जमायचे. बारावीत ते कसेबसे जमले. अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या वेळी हा विचार पूर्णपणे अशक्य होती. तिथे बराचसा अभ्यासक्रम आदल्या दिवशी प्रथमच वाचला जायचा. हे तंत्र मला फारच थोड्या प्रमाणात झेपले. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री १० वाजताची मर्यादा आखून तिथे अभ्यास थांबविण्याचे धोरण मी स्वीकारले. हे काहीसे भारतीय क्रिकेट संघासारखे झाले. आपण जिंकणाऱ्या बर्याच सामन्यात आपण सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित करतो आणि सामना जिंकतो. परंतु अवघड परिस्थितीतून बाजी मारण्याचे प्रसंग फार थोडे.

५> आयुष्यात मला काय बनायला आवडले असते? आजही हा प्रश्नाचे उत्तर आहे क्रिकेट खेळाडू, त्यातही फलंदाज. माझा कसोटी सामन्यातील पदार्पणाचा सामना, पहिल्या डावात माझी आणि संघाची कामगिरी बेताची, भारताला फोलोऑन मिळालेला. २०० हून अधिक धावांनी पिछाडलेल्या भारतीय संघाची दुसर्या डावात स्थिती ७ बाद १५० आणि मी तळाच्या खेळाडूंना घेवून सामना भारतास जिंकून देतो अशी स्वप्ने बघण्यात कित्येक मे महिन्याच्या सुट्ट्या गेल्या.

६> मध्यंतरी मी राजकारणाचा फार विचार करीत होतो. देशातील सुशिक्षित लोकांची एक चळवळ उभारून १० वर्षांनी तिचे राजकीय पक्षात रुपांतर करण्याचा माझा मानस होता. विचार उत्तम, पण आजूबाजूच्या परिस्थितीविषयी माझे ज्ञानाविषयी नसलेली खात्री, आजूबाजूच्या लोकांशी सामावून घेण्याची माझी क्षमता या मुद्द्यांचा विचार करून हा विचार मागे पडला. आयुष्याची होळी करण्याची तयारी असेल तरच माणसाने ह्या गोष्टी कराव्यात या निदानापर्यंत मी पोहोचलो.

७> मला मान्य करायला कठीण गेले, पण मला ego (आत्मसन्मानाची खरी खोटी भावना) फार. पण ज्या क्षणी मी हे मान्य केले त्या क्षणापासून जीवन काहीसे सोपे झाले. Ego वर मत करणे शक्य नाही, पण आपणास ego आहे हे मान्य करणे हे उत्तम.

मी असे बरेच लिहू शकतो , परंतु कुठे तरी थांबावयास हवे. मुद्दा असा आहे की आपण स्वतःला ओळखले आहे काय? आपल्यात अनेक रूपे दडलेली आहेत , ती जर आपणासच माहित नसतील तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे काय ? प्रयत्न करा स्वतःला ओळखायचा आणि त्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना ओळखायचा . आयुष्य सुखदायक होण्याची शक्यता बरीच वाढेल !

Monday, August 16, 2010

ब्लॉग पण कशासाठी ? काही प्रतिक्रिया

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

1> तुझा ब्लॉग वाचला. वाचून गम्मत वाटली. पण गमतीचा भाग सोडला आणि थोडा गंभीरपणे विचार केला तर तुलाही काही गोष्टी जाणवतील. समाजात कायमस्वरूपी बदल घडवणे कोणत्याही हुकुमशाहाला शक्य झाले नाही हा इतिहास आहे. मुळातच बदल एका रात्रीत घडत नाही त्यासाठी खूप चिकाटी, संयम आणि सातत्याने केलेले प्रयत्न यांची गरज असते. जबरदस्तीने कोणत्याही गोष्टीची केलेली अंमलबजावणी नेहमीच अल्पायुषी ठरते म्हणूनच संतानी सांगितलेल्या विधायक मार्गावरून वाटचाल करणे केव्हाही श्रेयस्कर. आपल्यासारख्या सुशिक्षित आणि संवेदनशील माणसांनी आपल्या घरातच चांगले बदल घडवून आणून त्याची सुरुवात करावी. इच्छाशक्ती आणि संघटना ह्यांच्या जोरावर ते सहज शक्य आहे. शांततेचा हा मार्ग खडतर आहे पण समाजावर होणारे त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील. हा मार्ग चोखाळताना एक मात्र निश्चित लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे संतांची शिकवण आणि आताच्या काळातील व्यवहारीपणा यांची उत्तमरीत्या सांगड घालणे.

2> या हुकुम शाहीची भारताला अत्यंत गरज आहे आणि माझा पूर्ण पाठींबा ( तुला किव्हा तुझा सादर ( Proposed) हुकुमशहा साठी

3> Incidentally, communism was supposed to be dictatorship of proletariat and supposed to have benevolent motive.
However dictatorship comes for and with power. And power and corruption are almost synonyms.

Sunday, August 15, 2010

ब्लॉग कशासाठी ?

आपण अथवा मी ब्लॉग का लिहितो? सुरुवातीला ब्लोग हे आपल्या बैचच्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याचे साधन म्हणून मी सुरुवात केली. त्यानंतर आजूबाजूच्या समाजावर भाष्य करण्याचे उत्तम साधन म्हणून मी ब्लॉग कडे पाहिले, भूतकाळाला उजाळा देत काही आठवणी लिहिल्या. अजून तात्कालिक घटनांवर भाष्य करण्यासाठी काही अपवाद वगळता (Best Of Five) हे माध्यम मी वापरले नाही. अचानक आज मला जाणीव झाली की हे सर्व ब्लॉग लिहिले गेले आहेत सुशिक्षित मध्यमवर्गीय दृष्टीकोनातून, सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून. समजा एखादा गरीब शेतकरी, कुख्यात डाकू, भष्ट्राचारी राजकारणी किंवा गर्भश्रीमंत उद्योगपती हे ब्लॉग वाचता झाला तर त्याला काही फरक पडेल का? (तसा फरक आपल्याला सुद्धा पडत नाही). त्या माणसाच्या संवेदना क्षणभर तरी जागृत होतील का? उत्तर स्पष्ट पणे नाही असे आहे.

समजा एखाद्याला हे ब्लॉग समाज परिवर्तनाचे साधन म्हणून वापरायचे झाले तर सर्व समाज सुशिक्षित आणि संवेदना जागृत असलेला हवा. परंतु दुर्देवाने तशी परिस्थिती नाही. मग असा समाज बदलायचा तरी कसा? माझ्या मनात सुप्त इच्छा आहे एक तर मी हुकुमशाह व्हावे किंवा या देशाला कोणी तरी एक हुकुमशाह मिळावा.

आता मी हुकुमशाह झालो तर काय करीन?
लोकसंखेवर आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करीन अगदी संजय गांधीने केले तसे!
सर्व राजकारणी लोकांच्या मागे आयकर खात्याला लावीन.
भारताच्या दुर्गम / ओसाड भागात नवीन सुयोजित शहरे उभारीन. प्रत्येक कंपनीस तिच्या आकारमानानुसार ह्या नवीन शहरांत आपली कार्यालये उभारण्यासाठी भाग पाडीन. ह्या शहरांभोवती दाट जंगले उभारण्यासाठी बेकार लोकांना बोलावीन.
आधीच्या एका ब्लॉग मध्ये लिहिल्याप्रमाणे (कृषिक्षेत्र) शेतीकडे एक उद्योग म्हणून बघीन.
आणि ...










माझ्याविरुद्ध ब्लोग लिहिणाऱ्या व्यक्तीस तुरुंगात टाकीन!

Naaneghat

After a long gap of almost three years, I ventured into one more life time experiences in the Sahyadri’s. This time it was Naaneghat. Trekking has always stimulated me and gave that peace and fun all together, when I allow myself to be one with the nature and get as deep inside the nature as possible.

After the gap and lot of restrictions due to my back problem, my confidence level had gone drastically down and wasn't really sure about trying myself against such tough test. But then these are the times you can prove to yourself and gain that confidence back. Naaneghat did exactly that for me. Off course I took all the precautions and remained as realistic as possible in terms of adventures, that I can take up on my way.

A point to point bus journey adds a bit of comfort to the trekkers, considering the efforts they have to put up in climbing the peak, they have embarked on. A bit of luxury and cohesion of a group and off course the musical tug of war, exposing many of the talents within trekkers. Those "Marathmoli" and inspiring songs, take you directly into 17th century and you actually start feeling like one of Shivaji Maharaj's brave knight, sent out on an overnight mission of capturing the most difficult fort with your entire valor.

After starting at 1 am sharp from Vasai road we reached “Vaishakhare” at 4 am via Bhiwandi Phata, Kalyan and Murbad. After taking a nap for one more hour, we got into the business of making tea. You can't really rely on local hotels here at this hour of the day and hence VAC had all the necessary arrangements. But then we got little too loose and lost some time out here. Started the trek at exactly 7 am, after reverberating to the tunes of " Praudh pratap purandar, kshtriya kulavatans, gobrahman …." and creating that environment and emotion of inspiration as well as joy.

All these treks do give me a vicarious experience of reliving those moments, that Shivaji's "Mavale” lived few hundred years earlier, that urge, that ecstasy, that confidence of a tiger of Sahyadri’s, that genuine love for mother land, the feeling is difficult to capture in words. I don't really find enough words to describe that, off course the reason can also be my limited vocabulary :-) but even then any genius in any language may probably be able to capture those emotions.

The whole of Konkan drapes itself with eye-soothing greenery during monsoon and every place becomes a picnic spot. As we landed on to the top of the Naaneghat Platue, clouds had already hijacked the place and we were prisoners to the thickness of clouds and heavy wind. We had plans to have a birds eye view of the surrounding area, including Kukdi river and the lake, the other peaks like Thakoba, Gorkha - Machindra, Bhairav gadh and the distant Harishchandra gadh. But alas, all those plans were tarnished and we were left to the mercy of the cloudy weather.

A person at a distance of 5 feet was not visible. The foggy experience was interesting and something, I had never experienced before. The combination of heavy wind, rain and thick fog gave an experience of "lost in nowhere". After reaching the cave at Naaneghat, as we crossed the actual pass and reached the Platue, I could see nothing but the fog and the heavy wind was literally dragging me along.

Somehow after balancing myself and getting used to the fog, I was able see the huge stone vessel, a Ganapati temple, a small hut and few cars. I was aware that there is road path from the “Nagar” end to this pass, but never expected cars to come so far. A feeling surged through my mind, that the distance that we covered with huge efforts and took 3 hours and struggled with the weather so much, people can reach the same peak comfortably sitting in their cars and experiences the same beauty as us. But then buddy, the effort that we had put, gave us that sense of accomplishment and what’s the fun in reaching a destination that does not have an interesting journey.

The stone vessel and the cave had been there for last 2000 years and one can see “Brahmi” inscriptions on the walls of the cave. This pass which connects konkan to deccan platue has been in use since 200 BC. This route was developed during Satawaahaana period and served as trade route between Kalyan, Naala Sopara in konkan to Pratishthan (modern day Paithan), the capital of the Saatwaahaan dynasty. The stone vessel was used for collecting taxes during this period.

Naaneghat looks like a thumb from distance and is called as "Nanacha Angtha", few privileged could have a glimpse of that thumb in the midst of the those mighty clouds. “Vanarlingi” was much more prominently visible. This rocky pinnacle serves as an attractive challenge for the rock climbers and an amazing view is guaranteed when you reach this 150 meter high pinnacle.

The opportunity to listen to few of the vadval punch lines (folklore of vasai) was a joy. These are few things of antiquity that you happen to stumble upon unexpectedly, but gives you a joy equivalent of meeting an old friend or reaching a place where you have spend considerable amount of time in life.

During our way up, we saw the Murphy's Law in action. You may take all the care to make sure things turn out well, but then things that have to go wrong they would always go that way. Sheetal had picked up her old shoes, which she had got for our US trip and considered to be good quality shoes. But then looks like they had decided to take an early retirement or rather were not meant for the tough route of Naaneghat.

In a less than half an hour of our way up one of them had left its “sole”. The other one too gave way at much later instance. This slowed us down a lot and gave a good chance for Suhas to torture me for not giving my shoes to my wife. In fact we lost our way up and took a little while to get onto the track again. Nevertheless Aditi, Sachin and Suhas helped a lot and made sure we reach the top, under all those circumstances.

Subodh gave us good company during our way down, because climbing down is always more challenging and chances of slipping and stepping on a loose rock are more. Heavy rains and the gushing water through the rocky route aggravated our challenge. We were back to our base camp in another 3 hours, a bit tired and happy about the whole adventure.

The “Malshej ghat” is equally beautiful and lot of people enjoy the nature along with cold water and hot drinks, a relatively cheaper enjoyment. Well having completed the trek to Naaneghat few minutes back, we were having more sense of achievement though. Immersing inside the roadside waterfall is definitely a fun, but not as satisfying as soaking yourself in nature and getting deep into it with 3 hours of challenging route.

Nitant proved to be good "bakra" for leg pulling. As is common in all the cultures, every eligible bachelor goes through all this at some point of time. We had ample pranks, jokes, songs solely devoted to his bachelorhood and his search for bride. You can imagine how creative people can get, in these kinds of situations and when we had people like Yogesh and few others in the gang, it proved to be a good entertainment for all.

The tunes of some of the famous Marathi inspirational songs, "Bhaavgeets" and "Lavnya” made us nostalgic about those AM/MW days when radio was really a part of everyday life and I remember getting up in the morning to nice "Bhoopali"'s and "Abhanga"'s of Ajit kadkade and Lata Mangeshkar, as my mom used to put on those "Suprabhat Geet"s as early as 6 am in the morning.

The highlight of the trek was 4.5 years old Krish. He did the trek without much help from anybody and along with his daredevil dad, incidentally sharing the same name as mine. Never did he got tired and probably was more enthusiastic than many of us. A strong trekker in making, I would say.

In all one more interesting Sahyadri experience, close to the nature and taking me back to in our brave and inspiring history.



Naaneghat-Malshej

Friday, August 13, 2010

Infinite Loop

हे जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. आपल्या आधीच्या अवतारात पडलेले एक स्वप्न! त्या अवतारातून आपण स्वप्न पाहत इथे आलो. स्वप्न संपल्यावर परत आपण जाणार ते आधीच्या अवतारात! पण आधीचा अवताराचे काय? ते एक स्वप्न त्या आधीच्या अवतारातून पडलेले स्वप्न. अशी हे साखळी चालूच राहणार. Infinite अर्थात अनंतापर्यंत! ह्या जीवनातील १०० वर्षे म्हणजे आधीच्या अवतारातील १ सेकंद आणि असेच पुढे!

शनिवार सकाळ सकाळी असे खतरनाक विचार येण्याचे कारण काय? शिस्तीत राहून राहून कंटाळा आला, I wanna break free! Should be able to do it without reason, but the upbringing makes me look out for so called valid reason! ब्लोग लिहूनच मुक्ततेची अनुभूती मिळवायची!

Sunday, August 8, 2010

क्रिकेट आणि मी (भाग २)

दहावीची परीक्षा संपल्यावर क्रिकेट पाचूबंदरच्या समुद्रकिनारी सुरु झाले. संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास आमच्या batch चे साधारणतः १२-१४ जण क्रिकेट खेळण्यासाठी गोळा होत. काही वर्षांनी ह्या सुंदर समुद्रकिनार्याचे डम्पिंग ग्राउंड मध्ये रुपांतर करण्यात आल्यावर मला फार दुःख झाले.

अकरावीत रुपारेल कॉलेज मध्ये प्रवेश केल्यावर पहिले सहा महिने क्रिकेटशी संबंध तुटला. आयुष्यात प्रथमच वसईबाहेर वास्तव्य असल्यामुळे मी आधीच काहीसा नाराज होतो आणि त्यातच क्रिकेटही बंद झाले. दिवाळी सुट्टीनंतर मात्र चित्र पालटले. रुपारेलच्या भव्य मैदानात सर्व प्रकारचे खेळ खेळले जाऊ लागले आणि त्यात अर्थात क्रिकेटचाही समावेश होताच. आमच्या डिविजनच्या वर्गाच्या संघात माझी निवड झाली. एक दोन सराव सामन्यात माझी सुंदर फलंदाजी झाली. ती पाहून वर्गातील मुले खुश झाली. काही कारणास्तव आंतरवर्गीय स्पर्धा त्या वर्षी झाल्या नाहीत. त्या वर्षी न्यूझीलंड संघ भारतात आला होता. त्या सामन्यात आमच्या कंपूने बर्यापैकी रस घेतला.

बारावीच्या वर्षी मी रुपारेल होस्टेल वर प्रवेश घेतला. माझ्या खोलीसमोर असणाऱ्या वरांड्यात उभे राहिले की समोरच्या मैदानात सुरु असलेले सामने दिसत. आधीच बारावीचे वर्ष आणि त्यात रुपारेल सारखे अभ्यासू आणि बारावीच्या परीक्षेला जीवन मरणाचा प्रश्न मानणाऱ्या मुलांचे होस्टेल. पण अशा होस्टेलवर सुद्धा क्रिकेट मध्ये रस घेणारी मुले होती. त्यांच्या बरोबर उभे राहून मी समोरच्या मैदानात चालणाऱ्या सामान्यांचं इंग्लिश मधून धावते समालोचन करी. हा आमचा एक चांगला विरंगुळा झाला होता. कॉलेज खानावळीत एका कोपर्यात दूरदर्शन संच होता. १९८९ साली भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. संजय मांजरेकरच्या काही अविस्मरणीय खेळ्या आणि सचिन तेंडूलकरचे कसोटी सामन्यातील पदार्पण ह्याच दूरदर्शन संचावर आम्ही पाहिले. होस्टेल वर तीन मजले होते. तळमजला पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव होता, पहिला मजला अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा मजला बारावीच्या विद्यार्थांसाठी! उद्देश्य असा की बारावीच्या मुलांना कमीत कमी त्रास व्हावा. तर ह्या होस्टेलचे देखील आंतर-मजलीय सामने होत. आता पर्यंतच्या माहित असलेल्या इतिहासात पदवीच्या विद्यार्थानीच ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. परंतु आमच्या संघाने मात्र दोन्ही संघांचा पराभव करीत ह्या स्पर्धेचे विजेतपद पटकावले. मी आमच्या संघाचा आघाडीचा फलंदाज होतो. बारावीत दिवाळीनंतर आम्ही कॉलेजला जाणे बंद केले. भारतीय संघ न्यूझीलंड दोर्यावर गेला होता. अझहरुद्दीनची संघाच्या कप्तानपदी आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. दिलीप वेंगसरकरचा हा शेवटा दौरा होता. हे सामने आम्ही सकाळी उठून अभ्यास करता करता रेदिओवर ऐकले.

बारावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी वसईत असूनही आम्ही क्रिकेट का खेळलो नाहीत हे मला आठवत नाही. बारावीचे वर्ष संपले आणि अभियांत्रिकी अभ्यासासाठी मी सरदार पटेल कॉलेज महाविद्यालयात प्रवेश केला. ह्या कॉलेजमध्ये सुद्धा मी होस्टेल मध्ये प्रवेश केला. पावसाळ्यानंतर क्रिकेटचे वारे महाविद्यालयात वाहू लागले आणि एके दिवशी संघनिवडीसाठी आम्ही भवन्स कॉलेजच्या भव्य मैदानावर कूच करते झालो. आमच्या वर्गात सचिन कन्नडकर नावाचा उत्तम खेळाडू होता आणि त्याने बारावीत त्याच्या कॉलेजचे क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्या दिवशी नंबर पडताना त्याने शेवटचा नंबर मागून घेतला आणि बाकीचे नंबर पडण्यास सांगितले. माझा नंबर पहिला आला. मी त्याच्यासमोर फलंदाजीसमोर उभा राहिलो. मी बिनधास्तपणे त्याच्या गोलंदाजीचा मुकाबला केला आणि पुढे जाऊन चेंडू उंचावरून टोलवले देखील. ह्या एका खेळीच्या जोरावर मी पुढील चार वर्षे वर्गाच्या संघात राहिलो. ह्या चार वर्षातील सामन्याविषयी आणि कॉलेज होस्टेल संघातील माझ्या कामगिरीविषयी पुढील भागात!

Saturday, July 31, 2010

क्रिकेट आणि मी (भाग १)

आमचे कुटुंब तसे प्रातिनिधिक वसईचे कुटुंब. लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळावे, वसई मैदानावर जाऊन होळी विरुद्ध पारनाका या संघातील मे महिन्यातील दोन दिवसांचा अंतिम सामना पाहावा, ऑस्ट्रेलिया मध्ये खेळल्या जाणार्या सामन्यासाठी सकाळी साडेचार वाजता उठून दूरदर्शन समोर जाऊन बसावे (माझे वडील तर सामन्याच्या अर्धा तास आधी उठून चहा बनवून मग TV पुढे बसत), जुन्या जमान्यातील खेळाडूंच्या आठवणी तासंतास काढाव्यात हे काही आमच्या कुटुंबीयांतील पुरुष मंडळींचे गुणधर्म! आमच्या आधीची पिढी (वडील, काका) ही एकदम बिनधास्त, कौटुंबिक शांततेसाठी क्रिकेटचा त्याग करावा असा विचार त्यांच्या मनाला शिवलासुद्धा नाही. पण मी आणि माझा भाऊ मात्र नवीन पिढीतील, आमचे क्रिकेट वेड बदलत्या काळानुसार (सुज्ञानी समजून घ्यावे) आटोक्यात आले. तर अशा या क्रिकेट वेडाच्या या काही आठवणी

क्रिकेटची पहिली आठवण पहिलीतील (साल १९७९) , इंग्लंडचा संघ भारतात आलेला, बोथम एकदम जोरदार फॉर्ममध्ये होता पण आपला कपिल सुद्धा त्याच्या तोडीस तोड. साडेचारच्या १० मिनिटांच्या सुट्टीत अनुप बरोबर जाऊन पिंगळे सरांच्या घरांच्या बाहेरून त्यांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संचावरील दिवस अखेरीचा स्कोर बघण्याची मजा काही औरच! त्यावेळी घरी TV नसल्याने सगळा शौक वोल्वच्या रेडिओवर धावते समालोचन ऐकून घेवून भागवावा लागत असे. १९८१ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला असताना तिसर्या कसोटी सामन्यात सुनील गावस्करला चुकीच्या पद्धतीने पंचाने बाद ठरविल्यावर त्याने चेतन चौहानला आपल्यासोबत मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. नशिबाने संघ व्यवस्थापनाने त्याला वेळीच रोखले. आता ही गोष्ट धावते समालोचन ऐकून आम्हाला कळली नाही ती बाब वेगळी. शेवटच्या दिवशी कपिलने वेदनाशामक injection घेवून घावारीच्या मदतीने ऑस्ट्रेलिया संघाला ८३ धावांत गारद केले. हे पूर्ण समालोचन रेडिओवर मी ऐकले. क्रिकेट आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही बहुदा एकत्रच असतात. त्या दिवशी कपिल आणि घावरी ऑस्ट्रेलियाला गारद करत असताना ज्या वेळी आम्ही समालोचन ऐकत होतो त्यावेळी विकेट पडत नव्हती आणि रेडिओ बंद केल्यावर मात्र पटकन विकेट पडायची. त्यामुळे रेडिओ बंद / चालू करत करत आम्ही ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्यात मोलाचा हातभार लावला.

भारतीय संघाबरोबर आमचे गल्लीतील क्रिकेट सुद्धा जोरात होते. गल्लीतील प्रत्येक घरात एक दोन क्रिकेट वीर होते. माझ्या भावाच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली माझी जडणघडण (?) झाली. आमच्या गल्लीच्या संघाचे मैदान म्हणजे आमचे अंगण. स्टम्पच्या उजव्या बाजूला बाग. बागेतील झाडांना ही मुले कितपत हानी पोहचवतात यावर कडक नजर ठेवून असणारी आजी आणि डाव्या बाजूला चेंडू मारल्यास ओरडणारे शेजारी यामुळे V मध्ये खेळण्याची मला सवय लागली. समोरच आमच्या घरांच्या काचा होत्या. नरेंद्र हिरवानीने सनसनाटी कसोटी पदार्पण केल्यावर मी देखील गल्ली क्रिकेट मध्ये लेग स्पिन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मला ३-४ विकेट मिळाल्या. परंतु शेवटी आमच्या एका शेजार्याने माझ्या गोलंदाजीवर फटका मारून घराची काच फोडली. त्या फटक्यानंतर त्या दिवशीचा खेळ अकस्मात संपला, त्या नंतर घराच्या तपास समितीपुढे (अध्यक्ष्य आजी), मला आणि माझ्या भावाला हजर करण्यात आले. तिथल्या चौकशीला तोंड देवून बाहेर पडताच माझ्या भावाने माझी कान उघाडणी केली. कशाबद्दल तर लेग स्पिन करून काच फोडण्यास अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरल्याबद्दल! गोलंदाजीच्या टोकाला असणारे आमचे जांभळाचे झाड मे महिन्यात जांभळाच्या भाराने वाकलेले असायचे. ती जांभळे तोडण्याचा बहाणा म्हणून आमचा शेजारी विजय वेगवान गोलंदाज झाला. जाम्बुंचा तोंडात बकाणा भरून जोरात धावत येणाऱ्या विजयला पाहून यष्टीरक्षण करणाऱ्या माझ्या छातीत धडकी भरत असे. विजय आणि मी एका संघात आणि माझा भाऊ आणि विजयचा भाऊ स्टीफन विरुद्ध संघात अशी संघ रचना असे.

शाळेत सातवी पर्यंत क्रिकेट खेळले जायचे ते PT च्या तासाला. बर्याच वेळा नारळाच्या झावळीचा थोपा आणि कोनफळ हीच आमची क्रीडा साहित्ये होती. आठवीच्या सुमारास अ विरुद्ध ब वर्गाचे सामने सुरु झाले. हे सामने शनिवारी शाळा सुटल्यानंतर लगेच आयोजित केले जायचे. राकेश आमचा त्यावेळेचा तथाकथित वेगवान गोलंदाज होता. वेगवान अशासाठी कि बर्याच लांबून येवून धावत येवून गोलंदाजी टाकायचा म्हणून. बाकी त्याची ही सवय अजून कायम आहे! राहुल साठेने आठवीत केव्हा तरी या सामन्यात पदार्पण केले आणि त्या दिवशी पहिल्याच ३-४ षटकात ब वर्गाच्या ५ विकेट घेवून त्यांना जोरदार हादरा दिला. का कोणास ठावूक पण मला आघाडीच्या फलंदाजाचे स्थान देण्यात यायचे. डावखुर्या योगेश पाटीलला एक चौकार मारल्यावर दुसर्याच चेंडूवर त्याने माझा उडविलेला त्रिफळा अजून लक्ष्यात आहे. त्या वेळी मी फेकी गोलंदाजी करत असल्याचे आमच्या गल्लीत जाहीर करण्यात आले होते, पण आमच्याच अंगणात खेळले जात असल्याने मी बिनधास्त गोलंदाजी करत असे. शाळेत ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली होती कि नाही हे माहित नाही पण जर सर्व मुख्य गोलंदाज थकले तर माझ्याकडे चेंडू सोपविला जात असे. अश्या एका क्वचित क्षणी सुहास पाटीलचा उडविलेला त्रिफळा हा माझ्या गोलंदाजीच्या कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण!

१९८३ सालच्या prudential विश्वचषकाच्या वेळी साखळीचे सर्व सामने BBC रेडिओवर मी ऐकले. त्यावेळी ८ संघ विश्वचषक स्पर्धेत भाग घेत. ते दोन गटात विभागले गेले असत. एकाच दिवशी प्रत्येक गटातील २ याप्रमाणे एकूण ४ सामने खेळवले जात. त्या विश्वचषक वेळी मी सहावीत होतो. आणि गानू सरांनी दिलेले हिंदीच्या धड्यावर स्वतःच एका वाक्यातील उत्तरांचे १० प्रश्न आणि १५ गाळलेल्या जागा भरण्याचे गृहपाठ करीत हे सर्व सामने ऐकत होतो. समालोचनासाठी एकच स्टेशन, त्यामुळे प्रत्येक सामन्याचे १५ मिनिटे वर्णन केले जात असे. त्यामुळे रेडिओवर भारताच्या सामन्याची पाळी येण्यासाठी पुन्हा ४५ मिनिटे थांबावे लागत असे. भारतीय संघाचा ८३ सालची कामगिरी कोणालाच अपेक्षित नव्हती अगदी दूरदर्शनला देखील. भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यावर अचानक त्यांना जाग आली आणि थेट प्रक्षेपणास सुरुवात झाली. त्यावेळी आमच्या एकत्र कुटुंबात TV आला. आम्ही सर्व भावंडांनी HALL मध्ये झोपण्यासाठी वास्तव्य केले. उपांत्य आणि अंतिम सामने आम्ही सर्वांनी मध्ये येणाऱ्या दूरदर्शनच्या बातम्या, खंडित होणारा वीजपुरवठा याचा मुकाबला करत पाहिले.
भारतीय संघाकडून पराभूत झालेला वेस्ट इंडीज संघ लगेचच १९८३ साली भारतात आला. त्या वेळी पहिलाच सामना श्रीनगर येथे खेळविला गेला. त्या सामन्यात प्रेक्षक चक्क विंडीज संघाला पाठींबा देत होते. त्या मुळे वैतागलेल्या कपिलच्या एका उत्कृष्ट क्षेत्र रक्षणाला ज्यावेळी प्रेक्षकांनी दाद दिली त्यावेळी कपिलने रागाने उलट प्रेक्षकांकडे पाहत टाळ्या वाजविल्या. १९८५ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन पाकिस्तान संघाचा पराभव करीत बेन्सन आणि हेजेस चषक पटकाविला. हा अंतिम सामना स्कॉलरशिप परीक्षेच्या दिवशी (१० मार्च १९८५) खेळविला गेल्याने मी मोठ्या संकट सापडलो होतो. परंतु माझ्या वडिलांनी त्यावर उत्तम तोडगा काढला. माणिकपूर च्या ऑगसतीन शाळेजवळ असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीच्या घरी दोन पेपर मध्ये जात आम्ही या सामन्याचा आनंद लुटला. आईच्या होणार्या संतापाकडे आम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्ष्य केले.

आठवी / नववीच्या सुमारास शालेय क्रिकेट संघाची स्थापना झाली. सुजित देवकर, मिलिंद पाटील (लेग स्पिनर) हे दिग्गज (?) खेळाडू ह्या वेळी झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत उदयास आले. शाळेचे सामने बघण्यासाठी आम्हाला मैदानवर सोडले जात असे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच आपल्या शाळेच्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी ह्याचे मार्गदर्शन करतात असा आरोप करीत प्रतिस्पर्धी संघाने काही काळ मैदान सोडले. त्यामुळे थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर शाळेने स्पर्धा जिंकताच मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. नववीत असताना ऑस्ट्रेलिया संघाचे भारतात आगमन झाले. त्यावेळी २ ऑक्टोबर च्या सुट्टीच्या दिवशी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसाचा सामना असताना भिडे सरांनी भौतिक शास्त्राच्या प्रयोगासाठी बोलाविल्यामुळे आम्हा क्रिकेट रसिकांमध्ये नाखुशीचे वातावरण पसरले होते. ह्याच दौर्यात एक कसोटी सामना टाय झाला. त्या दिवशी शाळा असल्यामुळे आम्ही सर्व बेचैनिनेच शाळेत होतो. दहावीच्या वर्षी माझे गल्ली क्रिकेट पूर्ण बंद झाले (केले गेले). फडके सरांच्या क्लास मध्ये जात असल्यामुळे माझे बर्याच वेळ त्यांच्या घरी अभ्यासासाठी वास्तव्य असे. १९८७चा विश्व चषक याच वेळी असल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढावला. गावस्करचे एक दिवशीय सामन्यातील एकमेव शतक, ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवरील लाहोर येथील उपांत्य सामन्यातील अविस्मरणीय विजय अशा न टाळता येणाऱ्या क्षणासाठी क्लासला दांडी मारत फडके सरांचा ओरडा खाण्याचे धाडस मी केले. १९८८ मार्च साली १० परीक्षा संपली. आणि आम्ही तयार झालो आमचे क्रिकेट प्रेम बाह्य जगतात घेवून जाण्यासाठी!

(क्रमश)

Sunday, July 25, 2010

जीवन प्रत्यक्षातील / फेसबुकातील, बाकी काही

आपण मान्य करो अथवा न करो फेसबुकाने आपल्याला व्यापून टाकले आहे. उद्या दहावीच्या मराठीच्या परीक्षेत 'फेसबुकाविना एक दिवस' असा निबंधाचा विषय ठेवला तर आश्चर्य वाटावयास नको. फेसबुक आपल्याला का मोहित करते ह्याचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न.

फेसबुक म्हणजे प्रत्यक्षातील जीवनापासून काढलेली पळवाट. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी नाहीशा करून निर्माण केलेले एक काल्पनिक विश्व. सर्वात महत्वाचे म्हणजे इथे आपल्याला नको असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याचे बंधन नाही. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच इथे दिसणार. आपल्याला आवडले जाईल असेच इथे बोलले जाणार. अगदीच टोकाची भूमिका घेवून बोलायचे झाले तर माणसाला लाडावणारे विश्व म्हणजे फेसबुक. आधुनिक जगातील कमकुवत मनोशक्तीला कुरवाळणारे ते हे फेसबुक.

मध्येच माझ्या मनात एक विचार आला की जर ह्या फेसबुकावर शत्रू हा प्रकार अस्तित्वात आला तर मग काय होईल? आपण काही जणांना शत्रू म्हणून घोषित करू, काही जण आपणास त्यांचे शत्रू म्हणून घोषित करतील. आपल्या शत्रूला अजून कोणी शत्रू म्हणून घोषित केले तर आपल्याला त्याची मैत्रीची विनंती येईल आणि बरेच काही! अजून कल्पनाविलास करायचा झाला तर आपला शत्रू जर online दिसला तर युद्ध नावाचे application चालू करण्याचा आपणास किंवा शत्रूस पर्याय असेल. आणि मग त्यात विविध हत्यारे (त्यात शिवी ह्या प्रकारचा समावेश आलाच) वापरली जाऊ शकतील. विनोदाचा भाग सोडला तर एक गोष्ट आपणास लक्षात येईल की जर शत्रू फेसबुकावर अस्तित्वात आले तर फेसबुकाची लोकप्रियता घसरू शकेल.

फेसबुकाचेच सोडा, आजच्या जगातील प्रत्येक गोष्टीचे काही दिवसांनी स्वरूप कसे असेल याचे भाकीत करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाने कोणत्या क्षेत्रात भवितव्य घडवावे हे ठरविणे आज शक्य नाही, त्याला शिक्षणाला किती पैसा लागेल याविषयी ठोकताळे मांडणे हे ही शक्य नाही. ही एक असुरक्षिततेची भावना मग आपल्यात जागृत होते आणि मग आपण एकच गोष्टीचा निर्धार करतो, तो म्हणजे जमेल तेवढा पैसा कमावणे आणि साठवणे.

बहुदा आपल्या पुर्वजांनी या गोष्टीचा अंदाज बांधला होता आणि त्यामुळेच त्यांनी या युगाला कलियुग म्हणून नाव दिले होते. समाजावर बौद्धिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याची क्षमता विद्वान बाळगून असतो, परंतु ज्या युगात विद्वानांचे महत्व कमी होऊन बळाच्या मार्गे काही लोक समाजावर वर्चस्व प्रस्थापित करतात ते कलियुग. आपल्या पुर्वजांनी कलीयुगानंतर कोणते युग येईल याचे भाकीत केले आहे याचे मला ज्ञान नाही.

प्रश्न असा आहे की आपण सगळे पडलो मध्यमवर्गीय मनोवृत्तीचे. आजूबाजूला घडणार्या कित्येक गोष्टी पटत नाहीत पण त्याला संघटीतपणे विरोध करण्याची क्षमता आपल्यात नाही. आपला विरोध असणार तो दिवाणखान्यातील चर्चेत चहाचे घोट घेत किंवा blog वर. मी अतिरेकी वृत्तीचं अजिबात समर्थन करीत नाही पण एक ध्येयासाठी (मग ते कितीही चुकीचे असो) आपल्या सर्वस्वाची कुर्बानी देण्याच्या त्यांच्या क्षमतेविषयी मात्र मी आदर बाळगतो. आज bank balance च्या मोहाने आपली हीच क्षमता आपण पूर्णपणे गमावून बसलो आहोत. आजूबाजूला न पटणारे एवढे बदल होत असताना आपण केवळ फेसबुकाच्या मोहमायेत गुरफटून जात आहोत.

Saturday, July 24, 2010

Dakshinayan - By Meena Prabhu

This time Meena Prabhu has teamed up with her Daughter Varsha and Son Tushar to explore the normally unexplored part of the world "The South America". The two months of extensive traveling has resulted into an interesting travel story, giving a good perception of this totally different world called as "Latin America".

At times the trip gets real hectic and there have been few tough moments and bad patches due to adamant visa authorities and bad means of transportation etc, but the writer has kept the ball running and came out of all such difficulties and made most out of her trip.

The countries she visits out here are Peru, Chile, Argentina, Brazil, Bolivia and Columbia. The storyline starts right from the different experiences at different embassies, the travel preparations and then the writer takes you through each country along with her and makes us acquainted with the astonishingly different cultures and pre-Columbian civilizations. The flora and fauna, the animals and birds peculiar to this region, the landscapes and the history associated with each of these countries are totally different and still we can see few similarities there.

Among all Peru seems to be the most interesting place in terms of places related to ancient civilizations. Its has various wonders of nature and you to get an idea of culture in this part of the world. The Machu Picchu still has many of the Inca ruins, quite well preserved, as they are situated in quite hilly area and so the Spanish conquistadors could not reach them. Cusko was the center place for the Inca civilization and Inca's believed that its the center of earth too. There are many Inca ruins around Cusko and one of the architecture wonders is the Sun Temple.

The Llama and alpaca are the most useful animals here. Llamas and Alpacas are to South American's as Cows and Goats are to us. The condor bird seems to be the largest flying bird and makes you remember the Sindabad stories, talking about such huge bird who could pick up humans in their claws. The locals out there say that the condors lay only one egg in their lifetime and the mating partners don't change over their lifetime. Currently this bird is on the verge of extinction. This region seems to have given "corn" to the world and one can find different colors of corn out here.

Iguazu Waterfall is the most enchanting and fascinating waterfall. Writer has become quite poetic and emotional at this place. This fall is multifold and gets beautiful at each level. Just like Niagara this also spans over the border of two countries Argentina and Brazil.

Chile has some of the astonishing sites like huge standing granites stones called Torres Del Paine, the Andes mountain range, some of the great National Parks and Punta De Arenas, the breeding grounds for Penguins.

Buenos Ayres seems to be a buzzing city and has its distinct architecture inspired from Europe. The Tango dance is one of the contributions of this city to the world and you can see many Tango theatres out here. The Beef being the staple food out here, sight of restaurants with a life-size Bull statue and the parts of freshly cut bull at display is common site out here. Argentina is quite famous for its grazing grounds and has meat as its top export items. Writer talks about a drink called matte, quite close to our tea, but the taste is not quite as interesting.

The burial grounds in Argentina seem to be worth visiting and there is ample artwork that goes into the beautification of those rich, famous and dead in Argentina. In fact there have been incidences of dead bodies being kidnapped and exchanged against each other. Isn't that quite funny.

The Brazilian capital Rio de Janeiro seems to be famous for its night life and not quite a place for family people. Those interested in enjoying the night life, this seems to be the most interesting place. The people out here are a mix breed of indigenous and African slaves and the Spanish rulers. While the Rio indulges you into its dark nights, a tall statue of Christ called "Christ De Redeemer" teaches salvations and gives that divine sanity to the Rio's skyline. Rio is also famous for its Carnivals and Samba dance.

The Peruvian Capital does not carry that western charm and is quite chaotic and exhibit its third world characteristics. The Chilean capital is quite close to New York and quite adapted to American lifestyle. Argentina seems to lack the local charm and indigenous population. On the contrary, it is quite European, as its been populated by most of the migrated Europeans. The Bolivian capital, La Plaza seems to be one of the cities situated much at a height and carries the charm of typical Latin American cities, ample population being indigenous out here.

It's interesting to know, that people out here were quite sophisticated in terms of architecture, food, traditions and customs but never had a script to write, unlike other ancient civilizations in other parts of the world. The Spanish came with horses, modern weapons, which these people had never seen. The Spanish destroyed all these age old civilizations, their culture and religion, used them as slaves and converted them to Catholicism.

Colombia, although is well known for its drug lords and mafia's, seems to be quite scenic and worth visiting place. Simon Bolivar, the leader of independence movement in Latin America, has high regard in this country and this was one of the first countries to get out of Spanish rule. The salt cathedral seems to be one of the worth visiting places out here and is actually a salt mine been converted to a cathedral.

All these countries have Catholicism as the religion, every city has Plaza De Armas in the center of the City. Plaza De Armas is generally a huge square area in the center of the city and is generally a market place and has surrounding historic structures. There are beautiful catholic churches all around and the lavish use of gold in those churches reminds you that this land was pouring with gold at some point of time. Although Inca's never got to know what iron is, they had all their instruments made out of gold.

Patagonia and Galapagos seem to be interesting places to visit. Galapagos being the volcanic islands, the flora and fauna out there is quite unique. The interesting thing about Galapogas is that they came into existence quite recently and so the evolution of birds and animals out here, have attracted many scientists, including Darwin. The Blue footed boobie birds, the huge turtles and many such animals have been point of study and attraction out here. The sanity of the place is maintained by strict rules and definitely a place worth visiting. Patagonia is the south most end of this continent and generally the Penguins come down to this area for breeding from Antarctica.

So although, not so called "top of the list" tourist destinations, these countries and places are worth visiting for their uniquely different cultures, flora and fauna and some of the thickest and most adventures trails like Amazon river and the Amazon forest. The ruins of the ancient civilizations acquaint us with some of the parallel cultures that existed and flourished in this totally unknown part of the world. Happy Traveling!!!

Saturday, July 17, 2010

Gajalee

Although I am not such a big fan of restaurant food or even to that extent a frequent visitor of restaurants, I do like to try out different tastes from different parts of the world. The name Gajalee has been around my ears for some time now and had heard a lot of good things about it. Now since I am writing about it, you guyz probably would have guessed that, I have finally earned the privilege of being Gajalee's customer as well as admirer. Well, I might not be the first person to admire about Gajalee, but then the experience is so exquisite, it compels me to share my "opinions".

You can find that typical konkani-marathi hospitality out here and atmosphere is quite casual, as if you are at home. The location is again a typical Parle locality, with lot of people on the streets probably because of Sunday evening, few youngsters grouping around on the footpath and enjoying the evening. Parle being a cultural centre of Mumbai especially for Marathi speaking community, this gives that typical marathi touch to the whole scene. The restaurant is quite spacious, well lit with few antique lamps hanging over each table.

Out full course meal started with a crab soup. This hot soup, much thinner, as it should be, with tender pieces of crab meat, no extra frills and additives and just a few spices to add that extra taste, beating all the starchy thickness of those Chinese soups. May be I am little biased over here, but then I did like it more. After activating your taste buds for something nice, this soup leaves you with a raised appetite and ample digestive fluids activated around your digestive pathway just waiting for more to come.

The fish tikka, garnished with a thin layer of spices, (not deeped in spices as in most other cases), keeps lingering on you tongue. When these soft pieces of "Surmai" fish grilled to the perfection arrive on your table, in a banana leaf, with the mouth watering aroma, it just starts giving a tinkling sensation at your tongue, going down the stomach, serves to be real appetizers. As you relish small pieces of this delicacy and it starts melting down your gastric passage, you are sure there is more to come and you are in right place for sure.

I am not going to use the word authentic over here. This word is quite overused and lost its meaning long back. It's even difficult for the original community who invented the dish and who cook that food in their kitchens, to say what is authentic. The word authentic is quite subjective and I strongly believe that consistent taste is what matters more, than going down the roots of where the dish has come from or whether its been recommended by some expert. Real experts are the people and the people flocking around any restaurant can give you a genuine opinion rather then the news paper and magazine articles.

We had Ghavane, Amboli and a tangy fish curry for our next course. Although the Ghavane and Amboli have similar looks and taste to their South-Indian cousins like "Neer dosa " and "Uppam", their combination with a coconut rich "Malvani" fish curry is unique. The perfect blend of spices, just enough to give that little sour and tempting taste. We had to order more Ghavane and ended up eating more than usual. Well, again my wife pulling my legs on, how my appetite suddenly doubles, when I see such exquisite delicacies in front of me.

Just to divert a little from all fish meal, we opted for mutton dum biryan and it came as a sweet surprise. Dum biryani is speciality of hydrabad, but gajalee has got its own innovation in this area. The mutton dum biryain cooked in a earthan pot called as "Handi", has its catchy flavour and added more variety to our dinner.

The "Sole Kadhi" is the best digestive and has that unique tangy taste of "Kokkam" and thickness of coconut. So after stuffing yourself with all the delicacies, make sure to have a glass of "Sole kadhi". I found the "Sole Kadhi" in "Malvan Haiser" to be more interesting than this, but then, that's again a personal opinion.

One more uniqueness of this restaurant is that, the prawns, pomfrets and lobsters and crabs are available for your selection, before they go to the kitchen and cooked for you. We got little disappointed when we didn't get baby lobsters, but then they are quite seasonal and you got to be lucky to get them. So for the Connoisseurs of good food go ahead and add this experience of "Malvani Coastal Food" to your list.

http://www.gajalee.com/

Friday, July 16, 2010

बावखल


आमच्या वसईच्या घराजवळील छोटे तळे म्हणजे बावखल. आता ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन करण्यासाठी मी भाषातज्ञ नव्हे तरी देखील बाव म्हणजे विहीर आणि खल हा शब्द खोल या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला असावा असे माझे मत. या बावखलाशी निगडीत अशा काही आठवणी सांगण्याचा हा प्रयत्न.

माझी आजी १९९९ साली गेली त्यावेळी ती साधारणतः ९२ - ९३ वर्षांची असावी. तिच्याकडून मी जुन्या काळाच्या आठवणी मिळवण्याचा प्रयत्न करीत असे. ही बावखले मानवनिर्मित असावी असा एकंदरीत तिचा निष्कर्ष. जलसिंचनासाठी पूर्वीच्या पिढीने खणलेले हे जलाशय. त्यातील काही जलाशय भूभागाने पूर्णपणे वेढलेले तर काही बाकीच्या जलस्तोस्त्रांशी जोडलेले. आमचे बावखल वसईच्या खाडीला जोडलेले. भूभागाची रचना अशी की जोराचा पाउस पडला की आजूबाजूचे छोटे छोटे जलप्रवाह या बावखलात पाणी आणून ओततात. ते सर्व गढूळ पाणी एकत्र बावखलात साठले की त्याच्या रंगामुळे ते थोडेफार चहासारखे दिसते. या बावखलात सर्वात प्रथम एक रहाट होता. शाळेच्या दिवसात या रहाटाची उर्वरित लाकडे मी पाहिली होती काळाच्या ओघात तीही नाहीशी झाली.

साधारणतः ६० - ७० च्या दशकात ह्या बावखलाच्या एका कोपर्यात आमच्या कुटुंबीयांनी विहीर खणली आणि त्यावर पाण्याची मोटार बसवली. हि विहीर बावखलापासून पूर्ण विभक्त नाही त्यामुळे बावखलाचे पाणी एका विशिष्ट पातळीच्या वरती गेले की ते ह्या विहिरीत जाऊन मिळते. तर आधी म्हटल्याप्रमाणे जोरदार पाऊस झाला की या बावखलात पाणी येते पण त्यानंतर मात्र काही महिने बावखलातून पाणी बाहेर वाहत राहते. आता मासे हे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असल्यामुळे ह्या बावखलात त्यांचे आगमन होते. बावखलात माशांच्या विविध जाती सापडतात. निवटी, कोलंबी, चिवडा, कलकत्ता, चिंबोरी ही त्यांची नावे, त्यातील काही नावे स्थानिक.

६०-७० च्या दशकात आमच्या घरातील सुना या बावखालाच्या काठी भांडी घासण्यासाठी जात असत. साधारणतः एप्रिल महिन्याचा मध्यावर या बावखलात पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होते. मग घरी मासे पकडण्याच्या गोष्टी सुरु होत. या बावखलावर माझ्या आजोबांच्या दोन भावांचाही काही हिस्सा. त्यामुळे आमचे ते कुटुंबीय देखील मासे पकडण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत. एप्रिल मे महिन्यात साधारणतः दोन वेळा हा मासे पकडण्याचा कार्यक्रम होत असे. आमची आजी ही सर्वात मोठी सून असल्यामुळे ह्या पूर्ण कार्यक्रमाचे ती नियंत्रण करे. मोठी माणसे जाळ्याने मासेमारी करीत. त्यातील काही मासे हाताने देखील पकडून बावखलाच्या काठावर फेकले जात. हे मासे पकडून बादलीत टाकण्याची जबाबदारी आमची असे. एकदीच राहवले नाही तर बावखलाच्या काठाकाठाने फिरणारे छोटे मासे हाताने पाण्याबाहेर उडवून त्यांना आम्ही पकडीत असू. सकाळी १० च्या आसपास सुरु झालेला हा मासेमारीचा कार्यक्रम एक दीड च्या आसपास आटपे. मोठी मग सुरु होई तो मासे वाटपाचा कार्यक्रम. आजीचा इतक्या वर्षीचा मुत्सद्दीपणा या मासे वाटपात परिवर्तीत होत असे. आजीच्या जावयांना हे मासे फार आवडत असल्यामुळे त्यांना या मासेमारीच्या दिवशी खास जेवणाचे आमंत्रण असे. एके वर्षी या कोलंब्या खाल्ल्यामुळे माझ्या अंगावर पुरळ उठल्यामुळे काही वर्षे मला कोलंबी वर्ज्य करण्यात आली होती.

मे महिन्याच्या मध्यावर बावखलातील पाणी पूर्ण आटून जाते. मग मे महिन्याच्या सुट्टीत उद्योगाच्या शोधात असलेली आम्ही मुले संध्याकाळी चार नंतर या बावखलात उतरत असू. पाणी पूर्ण आटल्यामुळे जमिनीला भेगा पडत. माझ्याहून तीन वर्षे मोठा असलेला माझा आत्येभाऊ ह्या भेन्गामुळे झालेल्या आकारांना महाराष्ट्राचे जिल्हे असे संबोधित असे. ह्याच वेळी बावखलात झरसे नावाची पालेभाजी उगवित असे. माझे आजोबा जे १९७२ च्या फेब्रुवारी मध्ये निवर्तले त्यांना ह्या पालेभाजीची भाकरी फार आवडत असे. मलाही ही भाकरी आवडू लागली होती. एक दोन वर्षे या बाव खलात पीच बनवून क्रिकेट खेळण्याचा उद्योगहि आम्ही केला. त्यावेळी उंचावर मारलेला फटका जमिनीवर जाऊन पडत असे. मार्च महिन्याआधी अंगणात खेळताना मारलेला फटका या बावखलातील पाण्यात पडल्यास तो चेंडू काठीने काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत असत. या पाण्यावर सपाट पृष्ठभागाचे दगड क्षितिजसमांतर पातळीत जोरात फेकल्यास ते त्याच दिशेने बर्याच वेळ उड्या मारत पुढे जात. हा खेळ खेळण्यास खूप मजा येई. एके वर्षी आमच्याकडे काम करणाऱ्या गड्याच्या मुलाने केळीच्या दोन खोडांना (ज्यांना स्थानिक भाषेत लोद असे म्हटले जाते) एकत्र जोडून त्याची पाण्यावर तरंगू शकणारी संरचना बनवली होती. त्यावर उभे राहून बावखलात मुक्त संचार करणाऱ्या त्याला पाहून मी धन्य झालो होतो.

९०च्या दशकात वसईत इमारतींचे प्रस्थ वाढू लागले. परंतु सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी न घेता हे पाणी नैसर्गिक जलप्रहावात सोडण्यात आले आणि तेथून ते आमच्या बावखलात शिरले. तेव्हापासून बावखलाच्या पाण्याचे प्रदूषण सुरु झाले. त्याच वर्षीच्या मे महिन्यात बावखलातील मासे खाल्ल्यामुळे घरातील बर्याच जणांना पोटाचे विकार झाले आणि तेव्हापासून आम्ही हे मासे खायचे सोडून दिले.

आज मी देखील बोरिवलीत राहतो. जमल्यास शनिवार रविवार आणि दिवाळी, मे महिन्यात वसईला जातो. प्रत्येक भेटीच्या वेळी ५ मिनटे का होईना शांतपणे या बावखलाच्या जवळ जाऊन उभा राहतो. जुन्या आठवणींना उजाळा देत!

Sunday, July 11, 2010

Fearless

What’s really fear? Right from childhood till you really get into your old age everyone is afraid of some or the other thing. Fear is not bad, it anyway a feeling, a symbol of being human. But then what is bad about fear is you get addicted to this fear habit and create some kind of mental monster in your mind, which takes up all the space of your mind and there is no space left out to actually tackle this fear. All this happens so subconsciously, that it appears quite natural and common. But if you really see people who are fearless or who have gotten quite a lot of control on their fears, don't have to put any Herculean effort.

Few characteristics of fearless people are they are always calm, composed, well organized and always in control of their life, on the contrary a fearful person, appears quite normal on the onset, but behaves quite abnormally in particular situations depending on his fear.

Few might be afraid of death or even the word death, few people of afraid of public speaking or interacting with people. Few people develop fear of water and few might be afraid to fly in air. Some people might even spoil their careers, as they can't face their bosses, while few might never enjoy swimming, even if they want to, as they are afraid of drowning. Few people take all the initiative and arrange a great ceremony, but back out from the front as they are too timid to talk in from of audiences.

The reason people develop fear can be attributed to their upbringing or mental makeup or even their childhood memories. Everyone, however strong, a person gets really shaky and uncomfortable under situations that they are afraid of. We can really get quite deep into the analysis of why this happens, or how a particular bitter experience can cause lifetime of scare in your mind, but lets concentrate more on, how we can deal with it.

The first step would be to accept the fear. Get little conscious about the process, how it develops and in case if you can put a mental check on it, during the time it develops, just do it. Understand that it’s just a mental projection. The other most important thing people are afraid of is failure, what if I fail. Here you need to do a bit of self preaching and convincing self that, everyone fails and failure is much better than never trying the thing you always wanted to. Facing the fear head-on has always been a best way of tackling fear. Rather than living with the fear for life long and repenting on the death bed that, why didn't I try this thing at least once, try it out today.

After facing the back problem in my early age, quite sincerely, things were quite gloomy for me. But the worst thing is, I found myself getting into a mental trap of being afraid of happening it again. The pain was so horrible that, it wasn't ready to leave my mind. Thanks to some family support and few inspirational books that I came across during that time. The realization was thinking about the same situation or being afraid of the same situation, is making me more and more weak and just helping me add more manure to the mental monster of my fear.

The right approach was to accept the facts and take all the precautions I can. The next step was to work on the problem through getting right advises, doing right exercises, so that life is normal and it’s no more a problem. Thinking about the same situation and how it happened and why it happened and what if it happens again, were some of the metal traps which were not allowing me to come out of my mental trauma and start living normal life. But the day I got rid of these questions and started asking questions like, how can I improve the situation, what changes I need to do on professional front and what can be done on personal front, I had overcome my fear.

So work on the worst fear of your life, today onwards and experience how it feels like.

Saturday, July 10, 2010

कृषिक्षेत्र

आज आपली सर्व प्रसिद्धी माध्यमे केवळ शहरांवर लक्ष्य केंद्रित करून आहेत. किंवा आपण सुशिक्षित वर्ग केवळ शहरांतील बातम्यावर लक्ष्य देत असतो. विविध आर्थिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे लक्ष्य देताना आपण भारतातील मूळ उद्योगाकडे म्हणजेच कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष्य करीत आहोत याचे आपणास भान नाही. इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे उपलब्ध असलेला आर्थिक निधी कृषी क्षेत्राचा पाया भक्कम करण्यासाठी वापरण्याचा दूरदृष्टीपणा आपल्याकडे नाही. कृषी क्षेत्राचा पाया भक्कम करणे म्हणजे पावसावर असलेली आपली अवलंबिता दूर करणे. त्यासाठी भारतातील विविध नद्यांना जोडण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना कित्येक वर्षे इच्छाशक्तिअभावी तडीस जाऊ शकली नाही.

आपण आज विविध क्षेत्रातील विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताने केलेल्या प्रगतीचे गुणगान गातो. आता ही संधी आपणास काहीशी आपसूक उपलब्ध झाली. त्यासाठी एक राष्ट्र म्हणून आपण काही विशेष प्रयत्न केले असे मला वाटत नाही. आणि ह्या क्षेत्रातील संधी पुढील किती वर्षे उपलब्ध राहतील याविषयीची खात्रीलायक माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. या उलट सर्वात खात्रीचे उद्योगक्षेत्र म्हणजे कृषिक्षेत्र. आता या क्षेत्राकडे आपली बघण्याची दृष्टी बदलून केवळ भूक भागविण्याचे क्षेत्र म्हणून न बघता भविष्यात एक जबरदस्त आर्थिक फायदा करून देवू शकणारे क्षेत्र म्हणून या कडे बघणे आवश्यक आहे. आणि हो असा विचार करणे म्हणजे पाप नव्हे. जगाची लोकसंख्या वाढतच जाणार आहे. या वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी लागणारे अन्न निर्माण करण्यासाठी लागणारी जमीन आपल्याकडे आहे, पाऊस देखील आहे फक्त पाणी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी नियोजनासाठी लागणारा निधी सुद्धा आहे फक्त तो आपण नागरीकरणासाठी वापरतो. आज एक मोठी संधी आपण गमावत आहोत आणि त्याचे आपणास भानसुद्धा नाही.

मागच्या ब्लॉगचा संदर्भ देवून असे म्हणावेसे वाटते की एक तर आपण एक राष्ट्र म्हणून big picture बघण्यास असमर्थ ठरत आहोत किंवा एक चुकीचे big picture रेखाटून त्याच्या मागे धावत आहोत.

Monday, July 5, 2010

Bigger Picture (मोठे चित्र)

आपण बर्याच वेळा 'Bigger Picture' हा शब्द ऐकतो. हल्ली क्रिकेट खेळाडू हा शब्द वापरताना दिसतात. ५ सामन्याच्या मालिकेत ३-० अशी विजयी मालिका घेतल्यावर चौथ्या आणि पाचव्या सामन्यात ज्यावेळी आपणास अशोक दिंडा आणि वर्धमान साहा हे खेळाडू खेळताना दिसतात त्यावेळी भारतीय निवड समितेने मोठे चित्र अर्थात २०११ सालचा विश्वचषक लक्षात घेवून हा निर्णय घेतल्याचे आपण खुशाल समजावे.

आता ही संकल्पना वैयक्तिक जीवनात योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. शालेय जीवनात केवळ गुणांना महत्त्व देवून तात्कालिक बाबींना महत्त्व द्यावे की मुलभूत संकल्पनाकडे लक्ष देवून मोठ्या चित्राकडे ध्यान द्यावे हा प्रत्येकाचा प्रश्न! आपल्या जीवनाचे समजा आपण महत्त्वाचे ध्येय ठरविले आणि छोटे मोठे निर्णय ह्या ध्येयाशी सुसंगत असे घेतले तर आपण मोठे चित्र लक्षात घेतले असे खुशाल समजावे.

आता ह्या मोठ्या चित्राची संकल्पना येण्यासाठी अजून एक संकल्पना समजणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे १०००० फुटांवरून घेतलेला आढावा! हा आढावा आपल्या मनाने घ्यावा लागत असल्याने मनाला मोठी भरारी घेता येणे आवश्यक आहे!

थोडक्यात म्हणजे आपल्या मनाने उंच भरारी घेवून १०००० फुटांवरून आपल्या आयुष्याचे मोठे चित्र रेखाटा आणि महत्त्वाचे निर्णय हे मोठे चित्र लक्षात ठेवूनच घ्या!

Thursday, July 1, 2010

कोऽहं

२०६० सालची एक रम्य पहाट. चितळे कुटुंबीय उठले आणि आपापल्या फेसबुक खुर्च्यांवर जाऊन बसले. खुर्चीवरची कळ दाबताच प्रत्येक जण हा मनाने फेसबुकच्या विश्वात प्रवेश करता झाला.

या युगाचा हा नियमच होता. सकाळी उठताच प्रत्येक जण फेसबुकमध्ये प्रवेश करता व्हायचा. शरीर खुर्चीवर पण मन मात्र फेसबुकच्या विश्वात. शरीर बनायचे अचेतन आणि मन सक्रीय व्हायचे फेसबुकच्या विश्वात. दुनियेचे सर्व व्यवहार फेसबुक मध्ये चालायचे! शाळा, कॉलेज, ऑफिस, मैदाने सर्व काही त्या विश्वात. या मुळे भूतलावरील बर्याच समस्या फेसबुकच्या विश्वात शिरल्या होत्या. लोकसंख्या, वाहतूक कोंडी सर्व काही. आपापली कामे आटपून लोक मग logout करायचे आणि जेवून झोपी जायचे. अजूनही काही गोष्टींवर मनुष्यजात शरीरावर अवलंबून होती. येत्या काही वर्षात मनुष्यदेहावरील अवलंबिता पूर्णपणे नष्ट करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न होता. परंतु त्याआधीच फेसबुकातून भूतलावर परत येण्याचा मार्ग तोडून टाकण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्याची वदंता होती.

रमेश चितळेचे फेसबुकातील कॉलेज संपले, तिथल्याच कॅन्टीन मध्ये थोडाफार वेळ घालवून तो भूतलावर येण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु काही कारणास्तव बर्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा परतू शकला नाही. त्याने आपल्या वडिलांशी संपर्क केला. त्यानाही तोच प्रश्न पडला होता. थोड्याच वेळात फेसबुकच्या विश्वात खळबळ माजली. अवघी मनुष्यजात देहाविना फेस्बुकात अडकून बसली होती. पृथ्वीवर उरले होते मनुष्यांचे अचेतन देह!

वरती विधाता मात्र स्मितहास्य करीत होता. मनुष्यजातीला पृथ्वीवर आणून बरीच युगे झाली होती. तिथले मनुष्याचे विश्व त्याला भावेनासे झाले होते आता एका झटक्यात देह विरहीत मनुष्यजातीला फेसबुकच्या विश्वात आणून पुढील कित्येक युगाच्या करमणुकीची त्याने सोय केली होती. कोऽहं चा शोध फेसबुकाच्या विश्वात सुरूच राहणार होता!